28/10/2013 (फेसबुक पोस्ट )
सिकंदरच्या विश्वविजेत्या सैन्याचा पराभव बिहारच्या भूमीवर बिहारींनी केला असे वक्तव्य मोदिनी केले , त्याबद्दल....
सिकंदरने इ.स.पूर्व ३२६ मध्ये सिंधू नदी ओलांडून भारतावर आक्रमण केले. त्याने पंजाब मध्ये राजा पोरसला पराभूत केले परंतु पोरसच्या शौर्याने सिकंदर थक्क झाला. इथेच त्याच्या सैन्याने पुढे जाण्यास नकार दिला.
सिकंदर इ.स.पूर्व ३२३ मध्ये परतीच्या मार्गावर बाबिलोन इथे मृत्यू पावला.
मगध (बिहार) मध्ये तेव्हा नंद साम्राज्य होते आणि ते भारतातील सर्वात शक्तिशाली राज्य होते.
चंद्रगुप्ताने इ.स.पूर्व ३२१ मध्ये नंद साम्राज्याचा पराभव केला.
चंद्रगुप्ताने इ.स.पूर्व ३०५ मध्ये सेलुकस निकेटर चा पराभव केला.
अर्थात सिकंदर किंवा अलेक्झांदर द ग्रेट ह्याचा मगध साम्राज्याशी युद्ध किंवा लढाई व्हायचा प्रश्नच उद्भवला नाही.
चंद्रगुप्ताने नंद साम्राज्य ताब्यात घेऊन ग्रीक सत्रापाना आणि सेलुकस निकेटर ला परास्त करण्याचा पराक्रम सिकंदरच्या मृत्युनंतर केला आहे.
म्हणून बिहारने (मगध) सिकंदरला पराभूत केले असे म्हणणे चुकीचे आहे. कारण सिकंदरचा नंद किंवा चंद्रगुप्त ह्यापैकी कुणाशीही संघर्ष झालाच नाही !
असो...
मोदींचे इतिहासाचे ज्ञान किंवा आकलन चुकीचे असू शकते आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता निवडून येण्याची क्षमता आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता ह्या बाबी जास्त महत्वाच्या असल्याने 'ज्ञान' हा निकष फारसा महत्वाचा राहिलेला नाही. अशा ज्ञान विषयक मुद्द्यावर तथाकथित पंतप्रधान पदाच्या उमेदवारांचे बुरखे फाटले तर त्यात काही विशेष नाही;
...चालायचेच...समजून घ्या...
सिकंदरच्या विश्वविजेत्या सैन्याचा पराभव बिहारच्या भूमीवर बिहारींनी केला असे वक्तव्य मोदिनी केले , त्याबद्दल....
सिकंदरने इ.स.पूर्व ३२६ मध्ये सिंधू नदी ओलांडून भारतावर आक्रमण केले. त्याने पंजाब मध्ये राजा पोरसला पराभूत केले परंतु पोरसच्या शौर्याने सिकंदर थक्क झाला. इथेच त्याच्या सैन्याने पुढे जाण्यास नकार दिला.
सिकंदर इ.स.पूर्व ३२३ मध्ये परतीच्या मार्गावर बाबिलोन इथे मृत्यू पावला.
मगध (बिहार) मध्ये तेव्हा नंद साम्राज्य होते आणि ते भारतातील सर्वात शक्तिशाली राज्य होते.
चंद्रगुप्ताने इ.स.पूर्व ३२१ मध्ये नंद साम्राज्याचा पराभव केला.
चंद्रगुप्ताने इ.स.पूर्व ३०५ मध्ये सेलुकस निकेटर चा पराभव केला.
अर्थात सिकंदर किंवा अलेक्झांदर द ग्रेट ह्याचा मगध साम्राज्याशी युद्ध किंवा लढाई व्हायचा प्रश्नच उद्भवला नाही.
चंद्रगुप्ताने नंद साम्राज्य ताब्यात घेऊन ग्रीक सत्रापाना आणि सेलुकस निकेटर ला परास्त करण्याचा पराक्रम सिकंदरच्या मृत्युनंतर केला आहे.
म्हणून बिहारने (मगध) सिकंदरला पराभूत केले असे म्हणणे चुकीचे आहे. कारण सिकंदरचा नंद किंवा चंद्रगुप्त ह्यापैकी कुणाशीही संघर्ष झालाच नाही !
असो...
मोदींचे इतिहासाचे ज्ञान किंवा आकलन चुकीचे असू शकते आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता निवडून येण्याची क्षमता आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता ह्या बाबी जास्त महत्वाच्या असल्याने 'ज्ञान' हा निकष फारसा महत्वाचा राहिलेला नाही. अशा ज्ञान विषयक मुद्द्यावर तथाकथित पंतप्रधान पदाच्या उमेदवारांचे बुरखे फाटले तर त्यात काही विशेष नाही;
...चालायचेच...समजून घ्या...
No comments:
Post a Comment