16/11/2013 (फेसबुक पोस्ट )
शेवटी सचिन निवृत्त झाला. त्याची शेवटची कसोटी गाजली ती त्याच्या भावनोत्कट निवृत्तीसाठीच. संपूर्ण देशच नव्हे तर अवघे क्रिकेट विश्व सचीनोत्सवात सामील झाले. ज्या खेळ पट्टीवर त्याने २४ वर्षे राज्य केले त्याच २२ यार्डाच्या खेळ पट्टीला अभिवादन करून त्याने क्रिकेटचा निरोप घेतला. एक डाव संपला...पण आता दुसरी इनिंग सुरु होणार हे देखील ओघाने आलेच!
क्रिकेटसन्यासा नंतर सचिन ने काय करावे? ह्याच्या चर्चा सुरु झाल्यात.
त्याने शास्त्री, गावस्कर प्रमाणे समालोचक व्हावे का?
त्याने कपिल, श्रीकांत प्रमाणे व्यावसायिक व्हावे?
कि त्याने सनी डेज सारखे एखादे पुस्तक लिहावे?
त्याने वेंगसरकर प्रमाणे क्रिकेट अकादमी चालू करावी?
चर्चा अशीच आहे कि त्याने क्रिकेट संबधित काहीतरी करीत राहावे.
सचिन देखील म्हणतो क्रिकेट माझा ऑक्सिजन आहे! अंजली म्हणते कि सचिन शिवाय क्रिकेट चा विचार करू शकते पण क्रिकेट शिवाय सचिनचा विचार ती करू शकत नाही!
इथेच माझ्या मते टर्निंग पोइन्ट आहे!
जे इतर सर्वांनी केले तेच सचिन ने करावे का? कि सचिन ने काही परिवर्तन घडवून आणावे?
क्रिकेट ह्या खेळाने सचिनला सर्व काही दिले आहे. अफाट श्रीमंती, प्रसिद्धी, प्रेम, इ. सर्व काही...
आता परत त्यातून काहीतरी मिळवण्याची अपेक्षा केली तर तेही सहज शक्य आहे. इतर सर्वजण ते करीत आहेतच.
मला वाटते कि इथेच सचिनचे वेगळेपण उठून दिसल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या देशात क्रिकेट आणि सिनेमा ह्या दोन प्रचंड व्याप असलेल्या एन्टरटेनमेंट इंडस्ट्री आहेत. शे-सव्वाशे करोड लोकांच्या देशात क्रिकेट आणि सिनेमा ह्या क्षेत्रातील स्टार लोकांची प्रचंड रेलचेल आहे. अर्थातच ह्या सर्व स्टार ना महानियता मिळवून देण्याचे काम ह्या देशातील लोकांचे आहे. भारतीय समाजाचे ते श्रेय आहे हे वादातीत सत्य आहे!
परंतु दुर्दैवाने असे दिसून येते कि क्रिकेट आणि सिनेमा क्षेत्रातून प्रचंड यश, प्रसिद्धी, संपत्ती मिळवून देखील हे तथाकथित स्टार ज्या समाजाने आपल्याला महानतां दिली त्या समाजाला विसरून जातात.
सामाजिक ऋण आणि त्याची परतफेड अशी समाज भावना कुठेही दिसून येत नाही. ह्या कृतघ्नते मुळे त्यांच्यावर समाजाचा रोष देखील आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टीव वौ आपल्या देशात येउन काही सामाजिक कार्य करताना दिसतो परंतु आपले क्रिकेटपटू क्वचितच अशा कार्यात दिसून येतात हि खेदजनक बाब आहे. कपिलदेव, गावस्कर सारखे महान क्रिकेटपटू सामजिक कार्यापासून अलिप्तच राहताना दिसून येतात.
एखादा सलमान खान क्वचित काही सामाजिक कार्य करताना दिसतो परंतु सिनेमा क्षेत्रातून समाजाप्रती उदासीनताच जास्त दिसून येते. अमिताभ राजकारणात थोडासा येतो पण परत सिनेमाच्या च मागे आयुष्य व्यतीत करतो. दिलीपकुमार, लता मंगेशकर, सारखे प्रथितयश कलाकार देखील अभिनय, गायन, संगीत, इ. पलीकडे सामाजिक विचार करताना दिसत नाहीत, हि शोकांतिकाच आहे!
सचिन तेंडूलकर ह्या महान खेळाडूने इथे बदल घडवून आणावा अशी अपेक्षा आहे. कदाचित हे परिवर्तन त्याच्याच हस्ते घडून येण्याचे विधिलिखित असावे!
जर सचिन ने सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात भरीव कार्य करायचे ठरवले तर त्यात तो यशस्वी होणार ह्या कुणालाही शंका नसावी. त्याचे कारण म्हणजे ह्या माणसाची निष्ठा, एकाग्रता आणि प्रचंड मेहनत कार्याची तयारी. त्यामुळेच तो क्रिकेट मध्ये देखील देवपण प्राप्त करू शकला.
कार्य-निष्ठा अशी कि तो रात्री झोपू शकत नाही कारण दुसर्या दिवशी फलंदाजी करायची असते!
निस्वार्थी वृत्ती अशी कि तो गांगुली ला किंवा धोनी ला कर्णधारपद देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली खेळतो!
तो राज्यसभेचा खासदार आहेच, त्याने लोकसभेची निवडणूक लढवावी, राजकारणात झोकून द्यावे. त्या क्षेत्रात आपला प्रभाव पडावा. परिवर्तन घडवावे. त्याद्वारे सामाजिक ऋण फेडावे! असे माझे मत आहे.
इथेही स्पर्धा असेल. इथे स्लेजिंग होईल. चेंडू कुरतडल्याचे खोटेनाटे आरोप होतील. अझर-मोंगिया पाय ओढतील. कुणीतरी सायमंड जातीयवादाचे वितंड घालतील. एखादा जयवंत लेले आधीच पनौती लावेल! पण सचिन ह्या सर्वाना पुरून उरेल, हे नक्की!
शेवटी सचिन निवृत्त झाला. त्याची शेवटची कसोटी गाजली ती त्याच्या भावनोत्कट निवृत्तीसाठीच. संपूर्ण देशच नव्हे तर अवघे क्रिकेट विश्व सचीनोत्सवात सामील झाले. ज्या खेळ पट्टीवर त्याने २४ वर्षे राज्य केले त्याच २२ यार्डाच्या खेळ पट्टीला अभिवादन करून त्याने क्रिकेटचा निरोप घेतला. एक डाव संपला...पण आता दुसरी इनिंग सुरु होणार हे देखील ओघाने आलेच!
क्रिकेटसन्यासा नंतर सचिन ने काय करावे? ह्याच्या चर्चा सुरु झाल्यात.
त्याने शास्त्री, गावस्कर प्रमाणे समालोचक व्हावे का?
त्याने कपिल, श्रीकांत प्रमाणे व्यावसायिक व्हावे?
कि त्याने सनी डेज सारखे एखादे पुस्तक लिहावे?
त्याने वेंगसरकर प्रमाणे क्रिकेट अकादमी चालू करावी?
चर्चा अशीच आहे कि त्याने क्रिकेट संबधित काहीतरी करीत राहावे.
सचिन देखील म्हणतो क्रिकेट माझा ऑक्सिजन आहे! अंजली म्हणते कि सचिन शिवाय क्रिकेट चा विचार करू शकते पण क्रिकेट शिवाय सचिनचा विचार ती करू शकत नाही!
इथेच माझ्या मते टर्निंग पोइन्ट आहे!
जे इतर सर्वांनी केले तेच सचिन ने करावे का? कि सचिन ने काही परिवर्तन घडवून आणावे?
क्रिकेट ह्या खेळाने सचिनला सर्व काही दिले आहे. अफाट श्रीमंती, प्रसिद्धी, प्रेम, इ. सर्व काही...
आता परत त्यातून काहीतरी मिळवण्याची अपेक्षा केली तर तेही सहज शक्य आहे. इतर सर्वजण ते करीत आहेतच.
मला वाटते कि इथेच सचिनचे वेगळेपण उठून दिसल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या देशात क्रिकेट आणि सिनेमा ह्या दोन प्रचंड व्याप असलेल्या एन्टरटेनमेंट इंडस्ट्री आहेत. शे-सव्वाशे करोड लोकांच्या देशात क्रिकेट आणि सिनेमा ह्या क्षेत्रातील स्टार लोकांची प्रचंड रेलचेल आहे. अर्थातच ह्या सर्व स्टार ना महानियता मिळवून देण्याचे काम ह्या देशातील लोकांचे आहे. भारतीय समाजाचे ते श्रेय आहे हे वादातीत सत्य आहे!
परंतु दुर्दैवाने असे दिसून येते कि क्रिकेट आणि सिनेमा क्षेत्रातून प्रचंड यश, प्रसिद्धी, संपत्ती मिळवून देखील हे तथाकथित स्टार ज्या समाजाने आपल्याला महानतां दिली त्या समाजाला विसरून जातात.
सामाजिक ऋण आणि त्याची परतफेड अशी समाज भावना कुठेही दिसून येत नाही. ह्या कृतघ्नते मुळे त्यांच्यावर समाजाचा रोष देखील आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टीव वौ आपल्या देशात येउन काही सामाजिक कार्य करताना दिसतो परंतु आपले क्रिकेटपटू क्वचितच अशा कार्यात दिसून येतात हि खेदजनक बाब आहे. कपिलदेव, गावस्कर सारखे महान क्रिकेटपटू सामजिक कार्यापासून अलिप्तच राहताना दिसून येतात.
एखादा सलमान खान क्वचित काही सामाजिक कार्य करताना दिसतो परंतु सिनेमा क्षेत्रातून समाजाप्रती उदासीनताच जास्त दिसून येते. अमिताभ राजकारणात थोडासा येतो पण परत सिनेमाच्या च मागे आयुष्य व्यतीत करतो. दिलीपकुमार, लता मंगेशकर, सारखे प्रथितयश कलाकार देखील अभिनय, गायन, संगीत, इ. पलीकडे सामाजिक विचार करताना दिसत नाहीत, हि शोकांतिकाच आहे!
सचिन तेंडूलकर ह्या महान खेळाडूने इथे बदल घडवून आणावा अशी अपेक्षा आहे. कदाचित हे परिवर्तन त्याच्याच हस्ते घडून येण्याचे विधिलिखित असावे!
जर सचिन ने सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात भरीव कार्य करायचे ठरवले तर त्यात तो यशस्वी होणार ह्या कुणालाही शंका नसावी. त्याचे कारण म्हणजे ह्या माणसाची निष्ठा, एकाग्रता आणि प्रचंड मेहनत कार्याची तयारी. त्यामुळेच तो क्रिकेट मध्ये देखील देवपण प्राप्त करू शकला.
कार्य-निष्ठा अशी कि तो रात्री झोपू शकत नाही कारण दुसर्या दिवशी फलंदाजी करायची असते!
निस्वार्थी वृत्ती अशी कि तो गांगुली ला किंवा धोनी ला कर्णधारपद देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली खेळतो!
तो राज्यसभेचा खासदार आहेच, त्याने लोकसभेची निवडणूक लढवावी, राजकारणात झोकून द्यावे. त्या क्षेत्रात आपला प्रभाव पडावा. परिवर्तन घडवावे. त्याद्वारे सामाजिक ऋण फेडावे! असे माझे मत आहे.
इथेही स्पर्धा असेल. इथे स्लेजिंग होईल. चेंडू कुरतडल्याचे खोटेनाटे आरोप होतील. अझर-मोंगिया पाय ओढतील. कुणीतरी सायमंड जातीयवादाचे वितंड घालतील. एखादा जयवंत लेले आधीच पनौती लावेल! पण सचिन ह्या सर्वाना पुरून उरेल, हे नक्की!
No comments:
Post a Comment