लोकसत्तामधील बातमी "हिंदू धर्मातील ओबीसींचे इस्लाम मध्ये धर्मांतर" अशी असती तर?
काही निरीक्षणे:
तमाम ओबीसीं समाजाला असं नागवंशीय किंवा पुर्वबौद्ध म्हणून लेबल चिकटवणं पटत नाही. ओबीसी हा प्रवर्ग अगदी अलीकडे आरक्षण संदर्भात पुढे आला. विशिष्ठ जातींचा मागास समूह. प्रत्येक जातीच्या चालीरीती, परंपरा, देव-देवता, पुजपद्धति, बोलीभाषा वेगवेगळ्या, प्रत्येक कोसावर बदलणाऱ्या. प्रचंड मत-मतांतरे. ओबीसी हिंदू धर्म मानीत असले तरी हिंदू हि जीवनपद्धती आहे असं म्हणायला लागते ते ह्यामुळेच.
धर्मांतराच्या अजेन्ड्याखाली असं सरसकट एखादा वंश (नाग) म्हणून किंवा पूर्वधर्म (बौद्ध) म्हणून प्रचंड मोठ्या मानवसमूहाच्या डोळ्यात धूळफेक होते कि काय असा प्रश्न पडतो. तसा ओबीसी हा मुळातच अत्यंत बेफिकीर, तेवढाच अज्ञानी, भोळाभाबडा समाज आणि म्हणून सर्वांचे सोफट टार्गेट.
हिंदू धर्मातून ओबीसींना बौद्ध धर्मात धर्मांतरित करण्याच्या बातमीवर फारसा गहजब माजलेला दिसत नाही. आधीही ह्या विषयात हिंदूंच्या कैवारी समजल्या जाणार्यांनी उदासीनताच दाखविल्याचे दिसेल किंवा त्यांची मूकसंमती असावी.
हेच हिंदूधर्मकैवारी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मांतराविषयी किती जागरूक असतात हे वेगळं सांगायला नको. अलीकडेच ह्या धर्माभिमान्यांचे घर-वापसीचे उद्योग प्रसिद्धीत आहेत.
कदाचित जे धर्म हिंदुस्तानोद्भाव आहेत उदा. बौद्ध, जैन, शीख, इ. त्यामध्ये हिंदूंचे धर्मांतर त्यांना मान्य असावे. अर्थात इस्लाम, ख्रिश्चन इ. धर्म हिंदुस्तान-बाह्य (आक्रमक) असल्याने त्यांना विरोध असावा.
किंवा कदाचित एकूण जागतिक लोकसंख्येच्या गणितात इस्लाम, ख्रिश्चन आणि हिंदू ह्या तिघांमध्येच विभागणी असल्याने आणि इतर धर्मीय त्यामानाने अल्पसंख्य असल्याने कदाचित तशी मानसिकता बनली असावी.
म्हणजेच हिंदूमधील ह्या ओबीसी मागासवर्गीय किंवा शूद्रांच्या धर्मांतराविषयी हिंदू-कैवार्यांना कळवळा आहे का? अर्थात नाही.
त्यांचा विरोध त्या इस्लाम-ख्रिश्चन विरोधी क्षुद्र मानसिकते पुरताच मर्यादित असल्याचे दिसून येईल. "पिके" मध्ये अमीर खान नावाचा यवनी नायक आहे म्हणून विरोध पण परेश रावल असता तर विरोध नाही!
बाबासाहेबांनी धर्मांतर केले तेव्हाही हिंदू धर्मकैवार्यानी घेतलेली भूमिका हि "इस्लाम-ख्रिश्चन नको, पण बौद्ध-शीख चालेल" अशीच क्षुद्र मानसिकते पुरती मर्यादित होती.
मुळात ओबीसी किंवा मागासवर्गीय किंवा कथित हिंदू धर्मातील जतिसमुह ह्यांचा धर्म कोणता? हिंदूंच्या धर्मकैवार्यांना त्यांचा कळवळा का नाही, त्याचे उत्तर तिथेच स्पष्ट होते. हे धर्म कैवारी किंवा सवर्ण हिंदू ज्या वैदिक किंवा सनातन धर्माचा जागर करतात त्याचा ओबिसिंशी काडीचाही संबंध नाही हे सिद्ध होतेच.
आणि त्या ओबीसींचा कोणताही नागवंश किंवा बौद्ध धर्माशीही दुरान्वये संबंध नाही हि देखील काळ्या दगडावरची रेख आहे.
हे सर्व विविध जात समूह भिन्नभिन्न कुलपुरुष, कुलदैवते, मातृका, ग्रामदैवते, शिवलिंगे, देव-देवता पूजणारे मूर्तिपूजक समाज आहे हे त्यांच्या आजही अस्तित्वात असलेल्या परंपरा, धर्म-श्रद्धांतून सिद्ध होते.
कदाचित त्या प्रत्येक जातीसमुहाचा स्वतंत्र धर्म असल्याचे विधान केले तरी त्यात काही वावगे ठरू नये. आणि ह्या सर्व धर्मांचे कडबोळे म्हणजे प्रचलित कथित हिंदू धर्म असे विश्लेषण होऊ शकते. म्हणूनच हिंदू हा धर्म नसून, ती एक जीवनपद्धती असल्याचा निष्कर्ष प्रसिद्ध आहे.
असो.
मूळ मुद्दा हा आहे कि हिंदू-बौद्ध धर्मांतर चालते आणि हिंदू-मुस्लिम किंवा हिंदू-ख्रिश्चन चालत नाही ह्यातूनच त्या ओबीसी मागास्वर्गीयानी आपली धार्मिक ओळख नक्की करावी. नाहीतर आगीतून फुफाट्यात एवढेच त्या धर्मांतराचे स्वरूप असल्याचे पुढे लक्षात येईल. कारण इथे तो महामानव बाबासाहेब नाही; तर कुणीतरी उपरे नावाचा फक्त एक सामान्य माणूस तो धर्मांतराचा बुरसटलेला मुद्दा घेऊन उभा आहे! आज जेव्हा धर्म हा विषयच बाद व्हायला हवा, तेव्हा हे धर्मांतर म्हणजे (गुलजारने म्हटल्याप्रमाणे) एक्सपायरी डेट संपलेल्या औषधाची विषारी मात्रा आहे, एवढेच.
काही निरीक्षणे:
तमाम ओबीसीं समाजाला असं नागवंशीय किंवा पुर्वबौद्ध म्हणून लेबल चिकटवणं पटत नाही. ओबीसी हा प्रवर्ग अगदी अलीकडे आरक्षण संदर्भात पुढे आला. विशिष्ठ जातींचा मागास समूह. प्रत्येक जातीच्या चालीरीती, परंपरा, देव-देवता, पुजपद्धति, बोलीभाषा वेगवेगळ्या, प्रत्येक कोसावर बदलणाऱ्या. प्रचंड मत-मतांतरे. ओबीसी हिंदू धर्म मानीत असले तरी हिंदू हि जीवनपद्धती आहे असं म्हणायला लागते ते ह्यामुळेच.
धर्मांतराच्या अजेन्ड्याखाली असं सरसकट एखादा वंश (नाग) म्हणून किंवा पूर्वधर्म (बौद्ध) म्हणून प्रचंड मोठ्या मानवसमूहाच्या डोळ्यात धूळफेक होते कि काय असा प्रश्न पडतो. तसा ओबीसी हा मुळातच अत्यंत बेफिकीर, तेवढाच अज्ञानी, भोळाभाबडा समाज आणि म्हणून सर्वांचे सोफट टार्गेट.
हिंदू धर्मातून ओबीसींना बौद्ध धर्मात धर्मांतरित करण्याच्या बातमीवर फारसा गहजब माजलेला दिसत नाही. आधीही ह्या विषयात हिंदूंच्या कैवारी समजल्या जाणार्यांनी उदासीनताच दाखविल्याचे दिसेल किंवा त्यांची मूकसंमती असावी.
हेच हिंदूधर्मकैवारी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मांतराविषयी किती जागरूक असतात हे वेगळं सांगायला नको. अलीकडेच ह्या धर्माभिमान्यांचे घर-वापसीचे उद्योग प्रसिद्धीत आहेत.
कदाचित जे धर्म हिंदुस्तानोद्भाव आहेत उदा. बौद्ध, जैन, शीख, इ. त्यामध्ये हिंदूंचे धर्मांतर त्यांना मान्य असावे. अर्थात इस्लाम, ख्रिश्चन इ. धर्म हिंदुस्तान-बाह्य (आक्रमक) असल्याने त्यांना विरोध असावा.
किंवा कदाचित एकूण जागतिक लोकसंख्येच्या गणितात इस्लाम, ख्रिश्चन आणि हिंदू ह्या तिघांमध्येच विभागणी असल्याने आणि इतर धर्मीय त्यामानाने अल्पसंख्य असल्याने कदाचित तशी मानसिकता बनली असावी.
म्हणजेच हिंदूमधील ह्या ओबीसी मागासवर्गीय किंवा शूद्रांच्या धर्मांतराविषयी हिंदू-कैवार्यांना कळवळा आहे का? अर्थात नाही.
त्यांचा विरोध त्या इस्लाम-ख्रिश्चन विरोधी क्षुद्र मानसिकते पुरताच मर्यादित असल्याचे दिसून येईल. "पिके" मध्ये अमीर खान नावाचा यवनी नायक आहे म्हणून विरोध पण परेश रावल असता तर विरोध नाही!
बाबासाहेबांनी धर्मांतर केले तेव्हाही हिंदू धर्मकैवार्यानी घेतलेली भूमिका हि "इस्लाम-ख्रिश्चन नको, पण बौद्ध-शीख चालेल" अशीच क्षुद्र मानसिकते पुरती मर्यादित होती.
मुळात ओबीसी किंवा मागासवर्गीय किंवा कथित हिंदू धर्मातील जतिसमुह ह्यांचा धर्म कोणता? हिंदूंच्या धर्मकैवार्यांना त्यांचा कळवळा का नाही, त्याचे उत्तर तिथेच स्पष्ट होते. हे धर्म कैवारी किंवा सवर्ण हिंदू ज्या वैदिक किंवा सनातन धर्माचा जागर करतात त्याचा ओबिसिंशी काडीचाही संबंध नाही हे सिद्ध होतेच.
आणि त्या ओबीसींचा कोणताही नागवंश किंवा बौद्ध धर्माशीही दुरान्वये संबंध नाही हि देखील काळ्या दगडावरची रेख आहे.
हे सर्व विविध जात समूह भिन्नभिन्न कुलपुरुष, कुलदैवते, मातृका, ग्रामदैवते, शिवलिंगे, देव-देवता पूजणारे मूर्तिपूजक समाज आहे हे त्यांच्या आजही अस्तित्वात असलेल्या परंपरा, धर्म-श्रद्धांतून सिद्ध होते.
कदाचित त्या प्रत्येक जातीसमुहाचा स्वतंत्र धर्म असल्याचे विधान केले तरी त्यात काही वावगे ठरू नये. आणि ह्या सर्व धर्मांचे कडबोळे म्हणजे प्रचलित कथित हिंदू धर्म असे विश्लेषण होऊ शकते. म्हणूनच हिंदू हा धर्म नसून, ती एक जीवनपद्धती असल्याचा निष्कर्ष प्रसिद्ध आहे.
असो.
मूळ मुद्दा हा आहे कि हिंदू-बौद्ध धर्मांतर चालते आणि हिंदू-मुस्लिम किंवा हिंदू-ख्रिश्चन चालत नाही ह्यातूनच त्या ओबीसी मागास्वर्गीयानी आपली धार्मिक ओळख नक्की करावी. नाहीतर आगीतून फुफाट्यात एवढेच त्या धर्मांतराचे स्वरूप असल्याचे पुढे लक्षात येईल. कारण इथे तो महामानव बाबासाहेब नाही; तर कुणीतरी उपरे नावाचा फक्त एक सामान्य माणूस तो धर्मांतराचा बुरसटलेला मुद्दा घेऊन उभा आहे! आज जेव्हा धर्म हा विषयच बाद व्हायला हवा, तेव्हा हे धर्मांतर म्हणजे (गुलजारने म्हटल्याप्रमाणे) एक्सपायरी डेट संपलेल्या औषधाची विषारी मात्रा आहे, एवढेच.
No comments:
Post a Comment