Friday, 23 June 2017

गोब्राह्मणप्रतिपालक ? ! ...

गोब्राह्मणप्रतिपालक :
देव-धर्म , देव-ब्राह्मण, गो-ब्राह्मण, देव-धर्म-गोब्राह्मण ह्या आशयाचे शब्द धर्मविषयक बाबीत सर्वसाधारणपणे वापरले जातात. ह्यातील प्रत्येक उपशब्द हा 'धर्म' ह्या व्यापक अर्थाने वापरला जातो. "देवाब्राह्मणांच्या साक्षीने वचन दिले" इ. धार्मिक अर्थाने 'गोब्राह्मणप्रतिपालक' शब्दाचे विश्लेषण केल्यास गुंता सुटतो. हे शब्द देव, गाय, ब्राह्मण असे शब्दश: न घेता 'धर्म' ह्या व्यापक अर्थाने योजले असतात. धर्माचा प्रतिपालक असा साधारणतः: अर्थ असायला हरकत नाही. स्वराज्यात गोहत्या बंदी किंवा गोवंशहत्याबंदी होती का? वैदिक ब्राह्मणांसाठी स्पेशल कायदेकानून होते काय? शेतकऱ्यांची भाकड जनावरे, गाई-गुरांचे बाजार, चर्मोद्योग करणारे कारागीर ह्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आजच्यासारखी गोरक्षक नावाची जमात वगैरे राजांनी नियुक्त केली होती का? ह्या प्रश्नांची उत्तरे शोधली तर 'गोब्राम्हणप्रतिपालक' ह्या शब्दातुन फसवणूक होणार नाही. 

धर्मनिरपेक्ष (सेकुलर) :
महाराज स्वतः: लिंगपुजक होते, शिवाचे उपासक होते, तुळजाभवानीचे (शक्तीचे) भक्त होते. परंतु केळशीचे बाबा याकूत ते सज्जनगडाच्या समर्थ रामदासस्वामी पर्यंत अनेक संत-सत्पुरुषांना त्यांनी धर्म-आश्रय दिला होता. महाराजांच्या लष्करातही हा सर्वसमावेशक हिंदू-मुस्लिम, अठरापगड जातींचा समुच्चय दिसून येतो. त्या अर्थाने महाराज सर्वसमावेशक विचाराचे होते. सांप्रत कालसंदर्भात राजांचे वर्तन धर्मनिरपेक्ष (सेकुलर) स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट दिसते.

शिवाजीराजे मुस्लिमविरोधी?
राजकीय दृष्ट्या महाराज अदिलशाही-मुघलांशी लढले कारण ते प्रस्थापित सत्ताधारी होते. परंतु राजांना जावळीच्या चंद्रराव मोरेंशी लढावे लागले. राजांचे अनेक स्वकीय उदा. चुलते भोसले, बाजी घोरपडे, व्यंकोजी भोसले वगैरे आदिलशहाच्या बाजूने लढत होते. बंगळुरात स्वतः: शहाजीराजे अखेरपर्यंत आदिलशाहीचे मनसबदार होते. कोकणातले खेमसावंत, शिर्के प्रभूती स्वराज्याच्या विरोधात कारवाया करण्यात कोणतीही कुचराई करीत नव्हते. (त्यांचा बंदोबस्त करताना संभाजीराजे औरंगजेबाच्या हाती सापडले.) दक्षिणेत राजांनी मदुराई, तंजावर आदी प्रांतातल्या हिंदू नायक राजांशी लढाया करून ते प्रदेश स्वराज्यात जोडले. कुतुबशाहीशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेले दिसतात. जयसिंग, जसवंतसिंग आदी राजपूत सरदार मोगलांच्या बाजूने राजांशी लढले. म्हणजे महाराजांचा तत्कालीन मुस्लिम शासकांशी असलेला लढा राजकीय स्वरूपाचा होता हे सुस्पष्ट आहे. त्याला हिंदू-मुस्लिम धार्मिक आणि मुस्लिमद्वेषाचा सोईस्कर रंग फासण्याचे राजकारण फसवे आहे.

कुळवाडीभुषण :
हिंदवी स्वराज्य म्हणून राजांची एक व्यापक संकल्पना नक्कीच होती. आपल्या प्रजेची सुव्यवस्था, रक्षण ह्याबाबतीत राजे "शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका" असा सज्जड कायदा राबविताना दिसतात. स्वराज्याची महसूल-मुलकी व्यवस्था, न्यायप्रणाली ह्याबाबत राजांची धोरणे आदर्शवत होती. म्हणून शिवराय 'रयतेचा राजा' म्हणून ओळखले जातात. त्याअर्थाने 'कुळवाडीभुषण', बहुजनप्रतिपालक हे प्रतीकात्मक शब्द 'गोब्राह्मणप्रतिपालक'च्या प्रतिवादासाठी वापरले गेले.

Thursday, 22 June 2017

क्रिकेटचे वादविवाद & कोच कुंबळे शास्त्री वगैरे

कोहली आणि कंपनीने कुंबळेची 'कोचगिरी' नाही पटली तर त्याला बाहेरचा रास्ता दाखवला ह्यात काय गैर आहे? ग्रेग चॅपल केसमध्ये गांगुली, सचिन वगैरे लोकांनी ह्याच मुद्द्यावर त्याला बाहेरचा रास्ता दाखवला होता. गावस्कर वगैरे मंडळींना लगेच कुंबळे किती महान खेळाडू होता इत्यादी फालतू गोष्टी आठवू लागल्या. त्याच्या महानपणाचा काय संबंध कोच असण्याशी? तसंतर कोहली'ऑलटाइम ग्रेट' होण्याच्या मार्गावर आहे! कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने भारतात झालेल्या दोनतीन मालिका जिंकल्या म्हणून कुंबळेची कामगिरी कोच म्हणून चांगली दिसते, एवढेच. मुळात कुंबळेची गेल्यावर्षी झालेली निवड निकष डावलून झाली होती आणि तिथेच भारतीय क्रिकेटमधली अनप्रोफेशनल वृत्ती पुन्हा स्पष्ट झाली होती. तेव्हाच नापास उमेदवार शास्त्रीला गांगुलीने त्याच्या व्यवसायकितेच्या अभावाचे खडे बोल व्यवस्थित सुनावले होते. बरं 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट' ह्या निकषांवर तर ह्यांची व्यावसायिकता सदैव साफ उघडी पडलेली असते, तो वेगळा मुद्दा. कुंबळे कोच म्हणून दादागिरी (intimidating) करतो अशी तक्रार काही खेळाडूंची होती, असं म्हणतात, ह्यात तथ्य असावे. कारण "first choice unfit players will have to prove their fitness in the same (not one day) format!!!" असले असंबद्ध जाचक नियम कुंबळेने खेळाडूंवर बंधनकारक केले होते. म्हणजे रोहित, शिखर, शमी हे फिट असूनही आणि स्थानिक वनडे क्रिकेटमध्ये खेळूनही कुंबळेच्या निकषानुसार कसोटीसाठी पात्र नव्हते कारण त्यांचा एकदिवसीय सामन्यातील फिटनेस कुंबळेच्या तथाकथित निकषांमध्ये बसत नव्हता! हे ऑस्ट्रलिया दौऱ्याच्यावेळी दिसले होते. हे असले सुलतानी किंवा सरकारी किंवा फडणविषी 'निकष' लावणारा माणूस खेळाडूंना कसा चालेल? भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने कोहली आणि त्याचे इतर सहकारी खेळाडू महत्वाचे आहेत. कोच, व्यवस्थापक वगैरे लोक्स काय, येतील आणि जातील...


Kumble's resignation is a smart game plan by Kohli & Co. through the champions Trophy final for his 'intimidating' ways of coaching although board & coach selector's backed him again after his appointment last year though he was not qualifying the requirements!?

 Rohit Sharma, Mohammed Shami & Shikhar Dhawan are fit now and playing in Vijay Hazare Tophy.
Murli Vijay is not fit & Abhinav Mukund's has been exposed, however Anil Kumble's strange southindian logic says that first choice unfit players will have to prove their fitness in the same (not one day) format!!!
BULLSHIT

  •   कोणी म्हणतो सिलेक्शनची गॅरंटी असेल तरच 'कोच' साठी अर्ज भरतो. कोणी 'कोच' जाताजाता फेसबुकच्या धोबीघाटावर केकाटून जातो. 'कोचगिरीचे' हे फुकट चोचले.
  • कोहली म्हणतो खेळाडू म्हणू आदर आहे पण नियमानुसार ड्रेसिंगरूमधल्या गोष्टी चव्हाट्यावर आणणार नाही. (ये हुई ना बात!)
  • दरम्यान तथाकथित कोच अथवा मॅनेजर किंवा डायरेक्टर शिवाय भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर खेळतोय.
  • एखादाच 'कोच' असतो जो केनियाच्या नवख्या टीमला वर्ल्डकपच्या सेमीफायनलपर्यंत नेण्याची कामगिरी करून दाखवतो. बाकी 'गाडिखालून चालणाऱ्या कुत्र्याला आपणच गाडी हाकतोय कि काय असा फुकाचा रुबाब असतो' , अशी काहीशी म्हण आहे मराठीत...

  •   रवीशास्त्री कॉमेंट्री बॉंकसमधेच बरा. त्याची जशी कोच म्हणून पात्रता नव्हती तेवढीच ती कुंबळेचीही नव्हती. पण आपले अव्यावसायिक माजी खेळाडू समितीवर असल्यावर प्रोफेशनल निर्णय कसा होणार? त्यामुळे कुंबळेची निवड करून ह्या समितीने शास्त्रीला फलंदाजीसाठी प्रशिक्षक म्हणून नेमण्याची सूचना बीसीसीआयला केली, जी धुडकावली गेली, हे छान झाले. शास्त्री, तुझी टीम डायरेक्टर म्हणून कारकीर्द फार देदीप्यमान वगैरे नाही. तू कॉमेंट्री बॉंकसमधेच बरा.

  • अनिल कुंबळे नक्की कोणता बॉलर होता ते कधी त्याला किंवा क्रिकेटलाही समजलं नाही. त्याचा बॉल कधी लेगस्पिन झालाच नाही म्हणून त्याला क्रिकेतपंडित गुगली वगैरे म्हणत असावेत. पण तो बहुदा मध्यमगती गोलंदाज होता आणि ज्यास्त न धावता बॉल फेकायचा. ह्या क्रिकेटच्या पुस्तकाबाहेरच्या बॉलिंगमुळे त्याला भारतीय खेळपट्ट्यावर स्पिनर समजून खेळणारे बॅट्समन खोऱ्याने बळी पडले व तो गावस्कर म्हणतो तसा महान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध झाला . तो मूळचा फलंदाजच होता चुकून त्याला बॉलर आणि त्यात लेगस्पिनर असे लेबल लागलं ज्याचा कधीही बॉल लेगस्पिन झाला नाही असा महान लेगस्पिनर म्हणजे अनिल कुंबळे होय.

Saturday, 17 June 2017

त्या फॅन्ड्रीतल्या देशाचा... इतिहास...

इतिहास...
एक उकिरडा अनादिअनंत
कधीही कितीही फुंकावा
कुणीही कसाही फुंकावा
दोन वर्षांपूर्वीच्या क्लिपा काढून
पुन्हा नव्याने फुंकावा
इसपूर्व २५०० वगैरे वर्षांपूर्वीचाहि फुंकावा
अनैतिहासिक बिनपुराव्याचा इतिहास
उलट्यासुलट्या जेनेटिकल मॉडेलांतून फुंकावा
उध्वस्त हागंदारीचा इतिहास
डुक्करांसह माणसें जगतात
त्या फॅन्ड्रीतल्या देशाचा... इतिहास...

Monday, 5 June 2017

'हमीभाव' : राजकारण

तर ह्या सगळ्या गदारोळात काल कुणीतरी आपल्या कृषिप्रधान भारत देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार ह्यांची मुलाखत दाखविली. त्यात त्यांनी 'हमीभाव' ह्या आजच्या गाजणाऱ्या मुद्द्यावर काही मते मांडली. मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा शेतमालाला किमान हमीभाव म्हणजे सरकारने जाहीर केलेला तो भाव कि त्याच्यापेक्षा शेतमालाची किंमत खाली घसरली तर सरकारने स्वतः बाजारात उतरून त्या हमीभावाने शेतमालाची खरेदी करावी जेणेकरून हमीभावापेक्षा बाजारभाव खाली घसरूच नये.

...आणि आपले सेटलमेंटवाले शेतकरी नेते व अभ्यासू फडणवीस सरकार शेतकऱ्यांना काय आश्वासन देतात ? कि हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्यांवर आम्ही खटले भरू! पवारसाहेब म्हणाले तुमची जबाबदारीच आहे हमीभावाने तूर खरेदी करून बाजारभाव कंट्रोल करणे. तुम्ही खटले बिटले काय भरता?
आधी अशी परिस्थिती उद्भवलीच नव्हती त्यामुळे आताच्या सरकारने आधीच्या कोणत्याही सरकारपेक्षा रेकॉर्ड तूर खरेदी केली वगैरे भूलथापांना काहीच अर्थ नाही. 


तर एकूण सध्याची अभ्यासाची पातळीच इतकी घसरलीय कि हे असे मूलभूत प्रश्न उभे राहतात. . भुईमूग नक्की कुठे बाजतो जमिनीच्यावर कि खाली ? इथपासून अभ्यासाचा गमभन सुरु करावा लागेल कि काय असा काळ आहे . 'हमीभाव' हा तर मॅट्रिकच्या गणिताचा पेपर लांबच राहिला, काय?


जाऊद्या, त्यापेक्षा अजित पवारांची फाईल हा विषय किती सोप्पा असतोय!