18/12/2013 (फेसबुक पोस्ट)
देशातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलून गेली कि काय असे सुखद वातावरण तयार झाले आहे.
अण्णा हजारे कुठलाही झगमगाट न करता राळेगणला उपोषण करतात.
गर्दी नाही, देशभक्तीपर गाणी नाहीत, टोप्या-झेंडे नाहीत, घोषण-गर्जना नाहीत, सिलीब्रेटी नाहीत!
उपोषणाला सरकार त्वरित प्रतिसाद देते. लोकपाल बिल राज्यसभेत मांडते. काँग्रेस, राहुल गांधी कमालीची पोझीटीव भूमिका घेतात.
राज्यसभेत भाजप संपूर्ण सहकार्याची भूमिका काय घेते आणि बिल एका दिवसात पास पण होते!
इमानदारी कि भी कोई हद होती है भाई!
गेल्याच वर्षी ह्याच्या अगदी उलटे चित्र देशभर होते.
जंतरमंतर कि रामलीला वरच्या टीम अण्णा चे अद्भुत देशव्यापी आंदोलन.
कॉंग्रेस च्या कपिल सिब्बल, मनीष तिवारी ह्यांची सत्तेची उद्दाम माजोरडी वक्तव्ये.
तब्बल १३ दिवस ताणलेले ऐतिहासिक उपोषण.
रामदेव-अग्निवेश ह्यांचे घुमजाव आणि अण्णा-केजरीवाल ची काहीशी दुराग्रही, हेकेखोर भाषा !
शेवटी कोन्ग्रेस, भाजप सहित सर्व विरोधी पक्षांनीहि अण्णांच्या तोंडाला पाने पुसली आणि लोकपाल नेहमीच्या राजकीय कुट नीतीने बारगळले !
मग आता अचानक हे अद्भुत परिवर्तन सर्वच स्तरावर का दिसून येत आहे? ह्या बदलाचे रहस्य काय आहे?
अर्थातच आम आदमी पार्टीचे दिल्ली निवडणुकीतील गौरवशाली यश हेच ते रहस्य आहे.
कॉंग्रेस चे समजू शकतो कि त्यांनी चार राज्यात सपाटून मार खाल्ला आहे म्हणून त्यांची अक्कल ठिकाणावर आली आहे.
परंतु टीम अण्णा आणि भाजप ह्यांचे खरे कौतुक करायला हवे.
अण्णा आंदोलनातून बाहेर पडलेल्या केजरीवाल ने जो भीम पराक्रम गाजवला त्यामुळे टीम अण्णाला लोकपाल सदृश्य काहीतरी यश आपल्या पदरात पडणे हि काळाची गरज ठरली. त्यातून हा समजूतदारपणा , शहाणपण आला नसेल तर नवलच!
चार राज्यात कॉंग्रेसला चारी मुंड्या चित करूनही दिल्लीतील आम आदमी पार्टी च्या धडाक्यासमोर भाजपची हि पुरती भंबेरी उडून गेली. केजरीवाल खरा हिरो ठरला, मोदी नव्हे! निवडणुकीचा संपूर्ण फोकस, श्रेय आम आदमी पार्टीने हिरावून घेतल्याने सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी गोची कमळाबाईची झाली. सांप्रत काळी लोकपाल ला विरोध करून आम आदमीच्या विषाची परीक्षा नको हा व्यवहारी सल्ला त्यांच्या चाणक्यांनी पक्षाला दिलेला दिसतोय!
एकूणच झाडूवाल्यांचा दिल्लीतील जोर का झटका धीरे से सबको लग रहा है !
भारतीय जनता सुद्न्य आहे आणि लोकशाहीचाच विजय निश्चीत आहे!
देशातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलून गेली कि काय असे सुखद वातावरण तयार झाले आहे.
अण्णा हजारे कुठलाही झगमगाट न करता राळेगणला उपोषण करतात.
गर्दी नाही, देशभक्तीपर गाणी नाहीत, टोप्या-झेंडे नाहीत, घोषण-गर्जना नाहीत, सिलीब्रेटी नाहीत!
उपोषणाला सरकार त्वरित प्रतिसाद देते. लोकपाल बिल राज्यसभेत मांडते. काँग्रेस, राहुल गांधी कमालीची पोझीटीव भूमिका घेतात.
राज्यसभेत भाजप संपूर्ण सहकार्याची भूमिका काय घेते आणि बिल एका दिवसात पास पण होते!
इमानदारी कि भी कोई हद होती है भाई!
गेल्याच वर्षी ह्याच्या अगदी उलटे चित्र देशभर होते.
जंतरमंतर कि रामलीला वरच्या टीम अण्णा चे अद्भुत देशव्यापी आंदोलन.
कॉंग्रेस च्या कपिल सिब्बल, मनीष तिवारी ह्यांची सत्तेची उद्दाम माजोरडी वक्तव्ये.
तब्बल १३ दिवस ताणलेले ऐतिहासिक उपोषण.
रामदेव-अग्निवेश ह्यांचे घुमजाव आणि अण्णा-केजरीवाल ची काहीशी दुराग्रही, हेकेखोर भाषा !
शेवटी कोन्ग्रेस, भाजप सहित सर्व विरोधी पक्षांनीहि अण्णांच्या तोंडाला पाने पुसली आणि लोकपाल नेहमीच्या राजकीय कुट नीतीने बारगळले !
मग आता अचानक हे अद्भुत परिवर्तन सर्वच स्तरावर का दिसून येत आहे? ह्या बदलाचे रहस्य काय आहे?
अर्थातच आम आदमी पार्टीचे दिल्ली निवडणुकीतील गौरवशाली यश हेच ते रहस्य आहे.
कॉंग्रेस चे समजू शकतो कि त्यांनी चार राज्यात सपाटून मार खाल्ला आहे म्हणून त्यांची अक्कल ठिकाणावर आली आहे.
परंतु टीम अण्णा आणि भाजप ह्यांचे खरे कौतुक करायला हवे.
अण्णा आंदोलनातून बाहेर पडलेल्या केजरीवाल ने जो भीम पराक्रम गाजवला त्यामुळे टीम अण्णाला लोकपाल सदृश्य काहीतरी यश आपल्या पदरात पडणे हि काळाची गरज ठरली. त्यातून हा समजूतदारपणा , शहाणपण आला नसेल तर नवलच!
चार राज्यात कॉंग्रेसला चारी मुंड्या चित करूनही दिल्लीतील आम आदमी पार्टी च्या धडाक्यासमोर भाजपची हि पुरती भंबेरी उडून गेली. केजरीवाल खरा हिरो ठरला, मोदी नव्हे! निवडणुकीचा संपूर्ण फोकस, श्रेय आम आदमी पार्टीने हिरावून घेतल्याने सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी गोची कमळाबाईची झाली. सांप्रत काळी लोकपाल ला विरोध करून आम आदमीच्या विषाची परीक्षा नको हा व्यवहारी सल्ला त्यांच्या चाणक्यांनी पक्षाला दिलेला दिसतोय!
एकूणच झाडूवाल्यांचा दिल्लीतील जोर का झटका धीरे से सबको लग रहा है !
भारतीय जनता सुद्न्य आहे आणि लोकशाहीचाच विजय निश्चीत आहे!
No comments:
Post a Comment