Friday, 19 September 2014

भाजपचा सेनेला 'अल्टीमेटम'

अल्टीमेटम? आणि तोही सेनेला?? आज बाळासाहेब हयात असते तर भाजपेयींची एवढी हिम्मत झाली असती का?
खरं तर, उद्धव ठाकरेंचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आल्यावर बाकीच्यांनी गप्पगुमान त्यांचा पाठीशी उभे राहायला हवे होते. ठाकरे घराण्यातील व्यक्तीने मुख्यमंत्री पदाची अपेक्षा करणे हीच एक ऐतिहासिक घटना आहे. महायुतीत सर्वानुमते ह्या निर्णयाचे स्वागत व्हायला हवे होते. नव्हे, तो ठाकरे घराण्याचा कर्तुत्वसिद्ध हक्कच आहे!
पण इथे कमळाबाईने गादीसाठी आपली घोडी दामटवली. बरं, जी घोडी पुढे केलीत त्यांचं कर्तुत्व काय? फक्त सेनेच्या मतदारांनी वर्षानुवर्षे पोसलेली हि बांडगुळे...

बाळासाहेब असते तर त्यांनी गर्जना केली असती कि महाराष्ट्रात जो निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ. दिल्लीवाल्या अतिशहाण्यांची घुसखोरी इथे सहन करणार नाही!
शिवसेना हि महाराष्ट्राच्या अस्मितेची, मराठी माणसाच्या आत्मसन्मानाची ओळख आहे. त्या स्वाभिमानासाठी दिल्लीतील 'अवजड' जोखड झुगारून द्यायची वेळ आली आहे.
भाजपच्या धर्मांध राजकारणापायी शिवसेनेची आजवर फरफटच अधिक झाली. मराठी माणसाचा मुद्दाहि दुरावला आणि जे खांद्यावर बसून मोठे झाले ते आता कानात xxx आहेत.

सेनेने पुन्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा लाऊन धरावा. "पालघरमधील काँग्रेसने मंजूर केलेला सरकारी प्रकल्प ('नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोस्टल पोलिसिंग') मोदीसरकारने गुजरातमध्ये का पळविला?" ह्या आणि अशा मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांच्या मुद्द्यावर लढा उभा करावा.
नव्हे, तेच त्यांचे आद्यकर्तव्य आणि तो त्यांचाच निसर्गदत्त अधिकारही आहे. इतर राष्ट्रीय पक्षांना स्वाभाविकपणे हे मराठी माणसाच्या अस्मितेचे शिवधनुष्य पेलणे शक्य नाही.

अवघा महाराष्ट्र ढवळून लढवावा. मराठी माणूस खंबीरपणे पाठीशी उभा राहील.

अरे, आवाsssssssssssssssssज कोणाचा........!

No comments:

Post a Comment