Tuesday, 12 September 2017

विस्मृतीतल्या स्मृती इराणींचा अनाठायी राहुलविरोध

स्मृती इराणींचेहि कधीकाळी सोशल मीडियावर मोदींसारखेच भक्तगण अस्तित्वात होते. आठवा, त्यांचे ते संसदेतले भाषण, जे कित्येक लाखो लोकांनी व्ह्यू केले म्हणून रवीशकुमार सारखे पत्रकार देखील स्तिमित झाले होते. पण इराणींच्या मते देशद्रोही वगैरे असलेल्या जेएनयूच्या एका सामान्य चाईल्ड कन्हैय्या कुमारच्या भाषणाने ती अभिनयकौशल्याची हवा गायब व्हायला वेळ लागला नाही आणि स्मृतीबाईंना मानव संसाधन मंत्रालयातून त्यांच्या जगप्रसिद्ध 'येल' पदवीसह काढून वस्त्रोद्योग (टेक्स्टाईल) मंत्रीपदी जेव्हा बसविले गेले तेव्हा ती हकालपट्टी किंवा पदावनती असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. त्यांच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत शिक्षण मंत्रालयाच्या बेक्कार अवस्थेबद्दल बोलायचे तर शिक्षण मंत्रालयाची स्मृतीबाईंच्या काळात झाली तशी बदनामी कोणत्याही देशात कधीही झाली नसावी! बाईंच्या काळात वस्त्रोद्योगाची गेल्या वर्षभरात मुख्यतः: नोटबंदीमुळे जी वाताहत झाली आहे, तीदेखील केवळ भयावह आहे. पण त्याचे बक्षीस म्हणून कि काय बाईंना अलीकडे मोदीसरकारात माहिती आणि प्रसारण मंत्रिपदाची एक्स्ट्रा झूल चढवली गेली. असो.

कॅलिफोर्नियात राहुल गांधींनी स्वतःच जे घराणेशाहीवर आणि पराभवासाठी काँग्रेसचा अहंकार व जनतेशी तुटलेल्या संवादाबद्दल भाष्य केले, त्यातला स्पष्टवक्तेपणा, सच्चाई, संवेदनशीलता कोणत्या विद्यापीठात विकत मिळणार, स्मृतीबाई? बाईंनी कधीतरी त्यांच्या काळातील मानव संसाधन मंत्रालयातील भानगडी, त्यांच्या दिल्ली-येल विद्यापीठाच्या पदव्या, नोटबंदीचे कापड उद्योगावरील दुष्परिणाम, नॉनडायनॅस्ट मोदींच्या सरकारच्या नोटबंदीबाबतच्या कोलांट्याउड्या ह्यांवर सुद्धा एखादी पत्रकार परिषद घेऊन स्क्रिप्टसह ओपन डिबेटचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?

No comments:

Post a Comment