'नोटबंदीचा पोपट मेलाय' हे शेवटी रिझर्व्ह बँकेनेच जाहीर केलं , भले वर्षभर उशिरा का असेना...
'जीएसटीचा बोजवारा उडालाय' हे कोणीही टॅक्स भरणारा सहज सांगेल. अगदी कुणी मोदीवादी सीएसुद्धा !
'देशाची अर्थव्यवस्था गडगडली आहे' हे जे आम्ही गेले दोनेक वर्षभर बोंबलतोय.. तेच आज देशाचा अर्थमंत्री जाहीर कबुल करतोय !
क्रेडिट कार्डाच्या स्टेट्मेंट्मधे लेटपेमेंट फी ७५० रु. , इंटरेस्ट चार्जेस रु. ६४४ आणि त्यावर प्रत्येकी १८% जिएसटी रु. २५१ (१३५ + ११६ )आकारला होता. म्हणून कस्टमर केअरला फोन करून रिव्हर्सल संबंधी बोललो. तर हो ना करत पलीकडच्या ताईंनी लेटपेमेंट फी व इंटरेस्ट चार्जेस ह्याचे रिव्हर्सल करून दिले. पण जिएसटी रिव्हर्सल होणार नाही म्हणाल्या. आम्हाला जीएसटी रिव्हर्सल करता येत नाही वगैरे. मुळात आता लेटपेमेंट फी आणि इंटरेस्ट चार्जेस ह्या दोन्ही गोष्टी मी देत नाही तर त्यावर म्हणजे रु. शून्य लेटपेमेंट फी व इंटरेस्ट चार्जेस वर मी १८% जीएसटी रु. २५१ मात्र कसा भरायचा? त्या ताईंना म्हणालो कि आता ह्यासाठी मोदी सरकारला फोन करू कि काय ? तर त्या 'ऍज यु विष' म्हणाल्या. असो.
देशातील घसरत्या आर्थिक, औद्योगिक आणि रोजगाराच्या परिस्थितीविषयी चिदंबरम सारखे अर्थतज्ञ् सातत्याने दोन-तीन वर्षे वस्तुनिष्ठ विश्लेषण करीत आहेत. पण त्याची दखल घ्यायचे सोडा , उलट अशा विरोधकांना धडा शिकवायची उफराटी सुलतानी वृत्ती भाजपाची आहे.
'जीएसटीचा बोजवारा उडालाय' हे कोणीही टॅक्स भरणारा सहज सांगेल. अगदी कुणी मोदीवादी सीएसुद्धा !
'देशाची अर्थव्यवस्था गडगडली आहे' हे जे आम्ही गेले दोनेक वर्षभर बोंबलतोय.. तेच आज देशाचा अर्थमंत्री जाहीर कबुल करतोय !
क्रेडिट कार्डाच्या स्टेट्मेंट्मधे लेटपेमेंट फी ७५० रु. , इंटरेस्ट चार्जेस रु. ६४४ आणि त्यावर प्रत्येकी १८% जिएसटी रु. २५१ (१३५ + ११६ )आकारला होता. म्हणून कस्टमर केअरला फोन करून रिव्हर्सल संबंधी बोललो. तर हो ना करत पलीकडच्या ताईंनी लेटपेमेंट फी व इंटरेस्ट चार्जेस ह्याचे रिव्हर्सल करून दिले. पण जिएसटी रिव्हर्सल होणार नाही म्हणाल्या. आम्हाला जीएसटी रिव्हर्सल करता येत नाही वगैरे. मुळात आता लेटपेमेंट फी आणि इंटरेस्ट चार्जेस ह्या दोन्ही गोष्टी मी देत नाही तर त्यावर म्हणजे रु. शून्य लेटपेमेंट फी व इंटरेस्ट चार्जेस वर मी १८% जीएसटी रु. २५१ मात्र कसा भरायचा? त्या ताईंना म्हणालो कि आता ह्यासाठी मोदी सरकारला फोन करू कि काय ? तर त्या 'ऍज यु विष' म्हणाल्या. असो.
देशातील घसरत्या आर्थिक, औद्योगिक आणि रोजगाराच्या परिस्थितीविषयी चिदंबरम सारखे अर्थतज्ञ् सातत्याने दोन-तीन वर्षे वस्तुनिष्ठ विश्लेषण करीत आहेत. पण त्याची दखल घ्यायचे सोडा , उलट अशा विरोधकांना धडा शिकवायची उफराटी सुलतानी वृत्ती भाजपाची आहे.
मानस Pagar, Ashish मेटेे, ब्रह्मदेव चट्टे, Shrenikनरदे, Yogesh वागज, सचिन कुंभार आणि इतर मित्रांना ज्या नोटीस भाजप सरकारने पाठवल्या आहेत त्यामागची मानसिकता काही वेगळी नाही.
आदिमायेच्या नवरात्रीच्या उत्सवादरम्यान बनारस हिंदू विद्यापिठातील विद्यार्थिनीवर लाठीमार केला जातो. तोही आंदोलन करणाऱ्या महिलांवर पुरुष पोलिसांकडून... दुर्गापूजेच्या निमित्ताने मोदींचा नऊ दिवस कडक उपवास वगैरे असतो. बरं हे बनारस म्हणजे 'बेटी बढाव बेटी पढाव' 'सेल्फी विथ डॉटर' वगैरे स्त्रीशक्तीचे अहोरात्र उत्सव साजरे करणाऱ्या प्रधानमंत्री मोदींचा जगप्रसिद्ध मतदारसंघ. तिथली ती मोदींची गंगामैय्याची प्रसिद्ध आरती वगैरे वगैरे. तिथले राज्यसरकारही अस्सल हिंदू राष्ट्रभक्त वगैरे वगैरे असलेल्या कुणा योगी आदित्यनाथाचें! यूएन मध्ये आदरणीय सुषमाजीसुद्धा स्त्रीशक्तीबद्दल "पक्षपात से पीडित महिलाये समान अधिकारकि मांग कर रही है...महिला सशक्तीकरण....बेटी बढाव बेटी पढाव...जेंडर इक्वालिटी" वगैरे वगैरे कायकाय भाषण झोडताना पाकड्याना "हमने आयआयएम, आयआयटी बनायें, डॉक्टर बनाये, पाक ने आतंकवादी बनायें " वगैरे वगैरे सुनावतात.
पण प्रश्न पडतो कि हे 'बनारस' 'हिंदू' विद्यापीठ पाकिस्तानात आहे कि काय?
सुषमाजी एक भाषण बनारस हिंदू विद्यापीठपरभी बनता है ...कमसेकम कुछ ट्विट तो किजीये मोदीजी!
... आणि हा सारा तमाशा तुघलकी मोदीसरकारच्या हैरतंगेझ कारभारामुळे झाला आहे, म्हणून त्यांच्यावर विरोधक सातत्याने टीका करताहेत. सुरुवातीला बीफबंदी- गोवंशहत्याप्रतिबंध-अखलाक-गोरक्षक, रोहित वेमुला-जेएनयू-कन्हैया, असहिष्णुता-पुरस्कारवापसी, प्राचीन सर्जरी-वैदिक विमान, अशा विवादांमध्ये ट्रोलवाल्यांच्या सोबतीने हिरहिरीने लढणाऱ्या सरकारला त्यातून बाहेर पडून वाढती बेरोजगारी, औद्योगिक मंदी, शेतकऱ्यांची दुरावस्था ह्या समस्यांकडे डोळे उघडून पाहायला वेळच कुठे होता?
त्यानंतर आली मोदींची ब्रेनचाईल्ड असलेली नोटबंदी आणि वर्षभर त्या दुष्परिणामांने हेलपाटलेली अर्थव्यवस्था सध्या आगीतून फुफाट्यात पडावी तशी जिएस्टीच्या करदहशतवादाच्या कचाट्यात सापडली आहे.
वास्तविक किती मोठी ऐतिहासिक संधी मोदींना मिळाली होती! देशाच्या इतिहासात तीन दशकांनंतर आणि आठ लोकसभांच्या निवडणुकांनंतर एकाच पक्षाचे तब्बल २८०च्या वर खासदार निवडून देऊन देशाच्या जनतेने मोदींना बहुमताचे रेकॉर्डब्रेक मँडेट दिले होते. मोदींच्या ऐतिहासिक बहुमताची तुलना अगदी पंडित नेहरू , इंदिरा गांधी आणि राजीव गांधी ह्यांच्या काळातील बहुमताशीच होऊ शकते. अलीकडच्या मनमोहनसिंग, नर्सिंहराव, वाजपेयी, व्हीपीसींग, मोरारजी ह्यांना प्रधानमंत्री म्हणून कधी स्वपक्षीय बहुमताचा असा पाठिंबा मिळाला नव्हता. तसेच मोदींच्या बहुमताची ऐतिहासिकता आणखी महत्वपूर्ण ठरते कारण त्यांचे बहुमत हे एकविसाव्या शतकातल्या आधुनिक भारताच्या आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या महत्वाच्या टप्प्यातील आहे आणि म्हणून मोदींचे ऐतिहासिक बहुमत केवळ एकमेवाद्वितीयच!
पण दरमहिना मन्कीबात, इव्हेंटमय जाहिरातबाजी, भाषणमय विदेशदौरे किंवा गेलाबाजार योगदिन- स्वच्छता-मेकिन-स्टार्टप ह्यापलीकडे मोदींचे आणि त्यांच्या सरकारचे अस्तित्व आहे काय? इतिहास ऐतिहासिक मँडेटवाल्या मोदींची नोंद त्यांच्या ऐतिहासिक ब्लँडरसाठी घेईल.
हो, विकासाचा पोपट मेला आहे...होय, मोदींचा फुगा फुटला आहे... काय म्हणायचंय?
आदिमायेच्या नवरात्रीच्या उत्सवादरम्यान बनारस हिंदू विद्यापिठातील विद्यार्थिनीवर लाठीमार केला जातो. तोही आंदोलन करणाऱ्या महिलांवर पुरुष पोलिसांकडून... दुर्गापूजेच्या निमित्ताने मोदींचा नऊ दिवस कडक उपवास वगैरे असतो. बरं हे बनारस म्हणजे 'बेटी बढाव बेटी पढाव' 'सेल्फी विथ डॉटर' वगैरे स्त्रीशक्तीचे अहोरात्र उत्सव साजरे करणाऱ्या प्रधानमंत्री मोदींचा जगप्रसिद्ध मतदारसंघ. तिथली ती मोदींची गंगामैय्याची प्रसिद्ध आरती वगैरे वगैरे. तिथले राज्यसरकारही अस्सल हिंदू राष्ट्रभक्त वगैरे वगैरे असलेल्या कुणा योगी आदित्यनाथाचें! यूएन मध्ये आदरणीय सुषमाजीसुद्धा स्त्रीशक्तीबद्दल "पक्षपात से पीडित महिलाये समान अधिकारकि मांग कर रही है...महिला सशक्तीकरण....बेटी बढाव बेटी पढाव...जेंडर इक्वालिटी" वगैरे वगैरे कायकाय भाषण झोडताना पाकड्याना "हमने आयआयएम, आयआयटी बनायें, डॉक्टर बनाये, पाक ने आतंकवादी बनायें " वगैरे वगैरे सुनावतात.
पण प्रश्न पडतो कि हे 'बनारस' 'हिंदू' विद्यापीठ पाकिस्तानात आहे कि काय?
सुषमाजी एक भाषण बनारस हिंदू विद्यापीठपरभी बनता है ...कमसेकम कुछ ट्विट तो किजीये मोदीजी!
... आणि हा सारा तमाशा तुघलकी मोदीसरकारच्या हैरतंगेझ कारभारामुळे झाला आहे, म्हणून त्यांच्यावर विरोधक सातत्याने टीका करताहेत. सुरुवातीला बीफबंदी- गोवंशहत्याप्रतिबंध-अखलाक-गोरक्षक, रोहित वेमुला-जेएनयू-कन्हैया, असहिष्णुता-पुरस्कारवापसी, प्राचीन सर्जरी-वैदिक विमान, अशा विवादांमध्ये ट्रोलवाल्यांच्या सोबतीने हिरहिरीने लढणाऱ्या सरकारला त्यातून बाहेर पडून वाढती बेरोजगारी, औद्योगिक मंदी, शेतकऱ्यांची दुरावस्था ह्या समस्यांकडे डोळे उघडून पाहायला वेळच कुठे होता?
त्यानंतर आली मोदींची ब्रेनचाईल्ड असलेली नोटबंदी आणि वर्षभर त्या दुष्परिणामांने हेलपाटलेली अर्थव्यवस्था सध्या आगीतून फुफाट्यात पडावी तशी जिएस्टीच्या करदहशतवादाच्या कचाट्यात सापडली आहे.
वास्तविक किती मोठी ऐतिहासिक संधी मोदींना मिळाली होती! देशाच्या इतिहासात तीन दशकांनंतर आणि आठ लोकसभांच्या निवडणुकांनंतर एकाच पक्षाचे तब्बल २८०च्या वर खासदार निवडून देऊन देशाच्या जनतेने मोदींना बहुमताचे रेकॉर्डब्रेक मँडेट दिले होते. मोदींच्या ऐतिहासिक बहुमताची तुलना अगदी पंडित नेहरू , इंदिरा गांधी आणि राजीव गांधी ह्यांच्या काळातील बहुमताशीच होऊ शकते. अलीकडच्या मनमोहनसिंग, नर्सिंहराव, वाजपेयी, व्हीपीसींग, मोरारजी ह्यांना प्रधानमंत्री म्हणून कधी स्वपक्षीय बहुमताचा असा पाठिंबा मिळाला नव्हता. तसेच मोदींच्या बहुमताची ऐतिहासिकता आणखी महत्वपूर्ण ठरते कारण त्यांचे बहुमत हे एकविसाव्या शतकातल्या आधुनिक भारताच्या आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या महत्वाच्या टप्प्यातील आहे आणि म्हणून मोदींचे ऐतिहासिक बहुमत केवळ एकमेवाद्वितीयच!
पण दरमहिना मन्कीबात, इव्हेंटमय जाहिरातबाजी, भाषणमय विदेशदौरे किंवा गेलाबाजार योगदिन- स्वच्छता-मेकिन-स्टार्टप ह्यापलीकडे मोदींचे आणि त्यांच्या सरकारचे अस्तित्व आहे काय? इतिहास ऐतिहासिक मँडेटवाल्या मोदींची नोंद त्यांच्या ऐतिहासिक ब्लँडरसाठी घेईल.
हो, विकासाचा पोपट मेला आहे...होय, मोदींचा फुगा फुटला आहे... काय म्हणायचंय?
No comments:
Post a Comment