Wednesday, 27 September 2017

भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र- माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा ह्यांनी मोदीसरकारच्या अर्थविषयक ज्ञानाचा सुंदर आढावा घेतला आहे. सिन्हा स्वतः: भाजपच्याच वाजपेयी सरकारमधले अर्थमंत्री असल्याने मनमोहन सिंग ह्यांच्याइतकेच किंबहुना कांकणभर अधिकच महत्वाचा त्यांचा हा अभिप्राय आहे. म्हणजे अगदी घरचा आहेर दिलाय. अरुण जेटलींची तर सालटीच सोलून काढलीत. कुणीतरी हे पूर्ण आर्टिकल छानपैकी मराठीत भाषांतरित करायलाच हवं. (लोकसत्ताने कदाचित टाळलंय ते..)

So, what is the picture of the Indian economy today?
तर भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र आज काय आहे? 

  • खाजगी गुंतवणुकीमध्ये गेल्या दोन दशकांतली विक्रमी घट झाली आहे.
  • औद्योगिक उत्पादन केवळ गडगडले आहे.
  • कृषीक्षेत्र संकटात आहे.
  • कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार देणाऱ्या बांधकाम उद्योगात प्रचंड उदासीनता आहे.
  • बाकीच्या सेवाक्षेत्रातही मंदि आहे.
  • निर्यातीमध्ये घट झाली आहे.
  • अर्थव्यवस्थेची सारी क्षेत्रे संकटात आहेत.
  • नोटबंदी भयंकर आर्थिक आपत्ती असल्याचे सिद्ध झाले आहे.
  • जिएसटीच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि खराब अंमलबजावणीमुळे उद्योगधंद्यांचा खेळखंडोबा झाला आहे व अनेक व्यवसाय बुडाले आहेत.
  • बाजारपेठेत नव्याने यणाऱ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संध्या उपलब्ध नाहीत आणि लाखोजणांचे अगणित रोजगार बुडाले आहेत.
  • अर्थव्यवस्थेचा विकास दर प्रत्येक तिमाहीत कमी होत चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ५.७ % इतका कमी झाला, जो गेल्या तीन वर्षातला नीचांक आहे.
  • सरकारचे प्रवक्ते म्हणतात कीं ह्या घसरणीला नोटबंदी जबादार नाही. त्यांचं खरं आहे. घसरण आधीच सुरु झाली होती...नोटबंदीने आगीत तेल ओतायचे काम केलं.
  • आणि कृपया लक्षात घ्या की सध्याच्या सरकारने जीडीपीची मोजणी करण्याची पद्धत २०१५ मध्ये बदलली होती, ज्यामुळे विकास दरात २०० बेसिस पॉइंटची वार्षिक संख्यात्मक वाढ झाली. खरंतर जीडीपीच्या जुन्या पध्दतीनुसार हा ५.७ % विकास दर प्रत्यक्षात ३.७ % किंवा त्यापेक्षाहि कमी आहे.
अर्थव्यवस्था उभारण्यापेक्षा त्यांचा विनाश करणे सहजशक्य असते.
 Economies are destroyed more easily than they are built.

No comments:

Post a Comment