Thursday, 3 April 2014

देशात जर कुणाची लाट कधीकाळी होती तर ती एकाच व्यक्तीची- इंदिरा गांधींची!

आपल्या देशात आजवर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांत एखादी 'लाट' असल्याने कोणा एका पक्षाला दणदणीत विजयी बहुमत अलीकडे तरी कधीही मिळाले नाही.
ह्या देशात जर कुणाची लाट कधीकाळी होती तर ती एकाच व्यक्तीची- इंदिरा गांधींची! स्वातंत्र्योत्तर भारतातील एकमेव नेता!




१९८४ साली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जी लाट उसळली तेव्हा कॉंग्रेसने विक्रमी ४१६ जागा जिंकल्या.
१९८० साली जनता पार्टीचे अयशस्वी सरकार गडगडल्यावर इंदिरालाटेमध्ये कॉंग्रेसला ३७४ जागांचे प्रचंड बहुमत मिळाले होत
१९७१ साली इंदिरा गांधींच्या लाटेमध्ये 'गरिबी हटाव' च्या घोषणेत कॉंग्रेसने ३५२ जागा जिंकून बहुमत मिळविले.

१९७७ मध्ये देशात आलेल्या  'इंदिरा हटाव' च्या लाटेत काँग्रेस १५३ जागा मिळून पराभूत झाली. वादग्रस्त आणीबाणी आणि जयप्रकाशजींचे नेतृत्व ह्यामुळे विरोधकांनी एकत्र येउन स्थापन केलेल्या जनता पार्टीला २९८ जागांचे बहुमत मिळाले.  एका अर्थान तीही इंदिरा गांधींचीच (विरोधी) लाट होती असे म्हणावे लागेल.

इंदिरायुगानंतर म्हणजे १९८९ पासूनच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाची किवा नेत्याची कोणतीही लाट कधीही असल्याचे दिसत नाही. एकाच पक्षाला निर्विवाद बहुमत मिळण्याचे दिवसही इंदिरायुगाच्या अस्तानंतर इतिहासजमा झाले आणि आघाड्यांची खिचडी सरकारे अस्तित्वात आली.

सध्याच्या निवडणुकीतील मोदींची हवा किंवा मोदींची लाट हे तर निव्वळ थोतांड आहे.

No comments:

Post a Comment