Thursday, 3 April 2014

डॉ. मनमोहन सिंग: जागतिक स्तरावर भारताला अग्रेसर करणारे पंतप्रधान




आपल्या देशात सलग १० वर्षे किंवा दोन टर्म देशाचे नेतृत्व करण्याचे भाग्य लाभलेले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग ह्यांची नावे घ्यावी लागतील.
२००४ ते २०१४ अशी १० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ह्यांच्या वाट्याला आली.

२००४ च्या निवडणुकीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाजपेयी सरकारचा पराभव करून काँग्रेस प्रणीत  UPA ने देशाची सूत्रे ताब्यात घेतली आणि २००९ मध्ये निर्णायक यश मिळवून दुसर्यांदा सरकार स्थापन केले.

२००४ मध्ये वाजपेयींसारखे लोकप्रिय पंतप्रधान आणि फील गुड, शायनिंग इंडिया, इ. जाहिरातबाजी तेव्हाही असूनदेखील लोकांनी काँग्रेस मध्ये विश्वास दाखविला. अडवाणींच्या नेतृत्वाला तर २००९ मध्ये देशातील जनतेने स्पष्टपणे नाकारले.

केंद्रात आघाड्यांचे सरकार स्थापन करून ते चालवायची मानसिकता ह्या काळात कॉंग्रेसने स्वीकारली हे देखील अत्यंत महत्वाचे आहे.

NDA सरकारच्या काळात१९९९-२००४ देशातील प्रगती आणि UPA  सरकारच्या काळात २००४-२००९ मध्ये झालेली प्रगती हि वार्षिक सकल उत्पन्नाच्या (GDP) आलेखावरून स्पष्ट होते.

२००९-२०१४ मध्ये देखील प्रगतीचा आलेख उंचावला परंतु जगभरातील मंदीचा फटका  देखील देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला हे मान्य करावे लागेल. परंतु जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडत असतानाही भारत टिकून राहिल्याचेही दिसून येईल.

मनमोहन सिंग ह्यांनीच नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री असताना देशाला मुक्त अर्थव्यवस्थेचा मार्ग खुला करून दिला होता. त्याच मार्गावर जागतिक स्तरावर भारताला अग्रेसर करण्याचे महत्वपूर्ण कार्य पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ह्यांनी आपल्या १० वर्षाच्या कारकिर्दीत पार पाडले.

अत्यंत मितभाषी आणि संवेदनशील व्यक्तिमत्वाच्या ह्या कर्तबगार पंतप्रधानाला टीकेचे लक्ष्य विरोधकांनी केले ते केवळ कॉंग्रेसला लक्ष्य करण्यासाठी!

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ह्यांचे योग्य मूल्यमापन भारतीय जनतेनेच करायला हवे.

No comments:

Post a Comment