Thursday, 3 April 2014

मिशन २०१४: UPA कि NDA ?

मा. शरद पवार साहेबानिदेखील भाजप क्रमांक १ चा पक्ष असेल असे विधान केले आहे. परंतु NDA ला बहुमत मिळत नाही हेदेखील त्यांनी सांगितले. मोदिसाहेब कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत जात नाहीत असा त्याचा अर्थ आहे.
पवार साहेबांच्या ह्या विधानाचे विश्लेषण आकडेवारीच्या हिशेबात खालीलप्रमाणे करता येईल.

भाजप: १४५-१५५
काँग्रेस: १४०-१५०
UPA : १९०-२००
NDA : १७०-१८०

UPA आघाडीतील राष्ट्रवादी (NCP) आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) ह्यांच्या महाराष्ट्र आणि बिहार मधील प्रत्येकी १५-२० अशा लक्षणीय यशामुळे UPA २००च्या घरात पोहोचत असल्याचे दिसते.

भाजपने जर राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात कॉंग्रेसचा क्लीन स्वीप केला तरच वरील विधान प्रत्यक्षात उतरू शकते हेदेखील लक्षात घ्यायला हवे. कॉंग्रेसने जर राजस्थान आणि मध्य प्रदेशात आपली शक्ती पणाला लावली तर मात्र भाजप १३०-१४० अशा क्रमांक २ वर फेकला जाईल हे निश्चित!

अशा परिस्थितीत कॉंगेस प्रणीत UPA आणि सपा, बसपा, डावी आघाडी, BjD, JDU, YSR, TRS, DMK , TMC , ई. स्थानिक पक्ष मिळून आघाडीचे सरकार बनवतील. धर्मनिरपेक्षता हाच मुद्दा लक्षात घेऊन मोदींच्या नेतृत्वाखालील सांप्रदायिकवादी भाजपला सत्तेपासून रोखाण्याचेच सर्वांचे प्रयत्न असतील. मोदींचे वादग्रस्त नेतृत्व हे भाजपच्या दृष्टीने अवघड जागेतले दुखणे ठरेल.
 

 विशेषत: कॉंग्रेसला जो फटका ह्या निवडणुकीत बसत आहे तो भाजपच्या प्रभावामुळे नव्हे तर कॉंग्रेसच्या स्वत:च्या धोरणात्मक चुकांमुळे बसत असल्याचे दिसून येते.

आंध्र प्रदेशात तेलंगण निर्मितीचे घोंगडे भिजत ठेवल्याने काँग्रेस अडचणीत आली. तत्पूर्वी जगन्मोहन रेड्डी ह्यांचे पिताश्री मुख्यमंत्री Y.S. राजशेखर रेड्डी ह्यांच्या अपघाती निधनानंतर आंध्रच्या नेतृत्वाविषयी घोळ घालून आणि जगन्मोहन कुटुंबियांना दुर्लक्षित ठेवल्याने काँग्रेस मध्ये उभी फुट पडून जगन्मोहन रेड्डींची YSR काँग्रेस अस्तित्वात आली. आज सिमान्ध्र मध्ये जगन्मोहन रेड्डी आणि चंद्राबाबू नायुडू अशी लढत असल्याने मागील निवडणुकीत ३३ जागा मिळवणारा काँग्रेस तेलंगाना मध्ये १०-१२ जागा मिळविण्याच्या खटपटीत अडकला आहे. कॉंग्रेसच्या मतविभाजनाचा फायदा तेलगु देसमला होऊन चंद्रबाबुना (NDA) १०-१५ जागांचे लक्षणीय यश मिळू शकते.

तमिळनाडूत द्रमुकच्या युतीमुळे मागी
निवडणुकीत ८ जागा कॉंग्रेसला मिळाल्या होत्या. परंतु द्रमुकने आघाडीतून अंग काढून घेतल्याने ह्यावेळी कॉंग्रेसला २-३ जागा मिळतील कि नाही अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे भाजप ने स्थानिक छोट्या-छोट्या पक्षांची आघाडी स्थापन करून ७-८ जागा (NDA)च्या खिशात घातल्याचे चित्र आहे.

राजस्थान मध्ये मागील निवडणुकीत २० जागा मिळवल्यानंतर आणि कॉंग्रेसचे अशोक गेहलोत सरकार असूनही कॉंग्रेसला राज्यसरकारच्या वादग्रस्त प्रतिमेमुळे फटका पडून राज्य सरकार गमवावे लागले. ह्या निवडणुकीतही कॉंग्रेसला नुकसान आणि भाजपला फायदा असेच चित्र दिसत आहे.

हिंदुत्वाच्या राजकारणाचे गड असलेल्या मध्य प्रदेश आणि गुजरात मध्ये मागील निवडणुकीत १२ आणि ११ जागा मिळाल्या होत्या परंतु इथे मात्र मोदींच्या प्रभावामुळे इथे कॉंग्रेसला मोठा फटका पडू शकतो.

उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये भाजपला काही जागा (३०-४०) मिळतील परंतु ओपिनियन पोल दाखवीत असल्याप्रमाणे ७०-८० जागा कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाहीत हेदेखील स्पष्ट झाले आहे.

युपी मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय लोक दल आघाडी १५-२० जागा जिंकू शकते. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष मिळून ४०च्या आसपास जागा जिकू शकतात. म्हणजेच भाजपला २०-२५ पर्यंत मजल मारता येईल.

बिहारमध्ये काँग्रेस-RLD -NCP अशी आघाडी झाल्याने सर्वाधिक जागा त्यांना मिळताना दिसतात. भाजप आणि JDU ह्यांच्या मतविभाजनाचा सरळ फायदा होऊन RLD १५-२० जागा खिशात घालेल.
JDU आणि भाजपला अनुक्रमे ६-८ आणि ८-१२ जागांवर समाधान मानावे लागेल.

छत्तिसगढ आणि झारखंड मध्ये देखील कॉंग्रेसला फायदा होऊन भाजपच्या जागा कमी होतील.
केरळ आणि कर्नाटकात कॉंग्रेसला फायदा होताना दिसतो.
महाराष्ट्रात काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी ३०-३५ जागी विजयी होण्यासारखी परिस्थती असल्याचे दिसते. विशेषत: राष्ट्रवादीच्या जगामध्ये लक्षणीय वाढ होताना दिसते.

पंजाब, हरयाणा, हिमाचल, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर तसेच आसाम, ईशान्य भारत इथे सर्वसाधारण परिस्थिती राहील असे चित्र आहे. बंगाल आणि ओरिसा मध्ये देखील परिस्थिती सर्वसाधारण राहील.

एकूणच देशातील चित्र हे भाजप आणि कॉंग्रेसमध्ये लढत असल्याचे दिसत असले तरी सरकार बनविण्याच्या दृष्टीने UPA आणि धर्मनिरपेक्षतावादी इतर पक्ष ह्यांनाच प्राधान्य असल्याचे लक्षात येईल.

No comments:

Post a Comment