गेल्या
१० वर्षात हि जी अत्याधिक हिंस्त्र मानसिकता समाजात निर्माण झाली आहे
त्याला समाजातील तथाकथित नवश्रीमंत आणि अभिजनवर्ग जबाबदार आहे.
प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्यमवर्ग आणि नवश्रीमंत वर्ग ह्या UPA सरकारच्या काळात झपाट्याने पुढे आला. औद्योगीकरण, मल्टीन्याशनल्स, इन्फ्रास्ट्रक्चर, कन्स्ट्रकशन, एन्टरटेनमेंट, हौस्पीटालिटी अशा नवनवीन क्षेत्रामध्ये मोठमोठी गुंतवणूक होऊन रोजगार-धंद्याच्या संधी उपलब्ध झाल्याने एक फार मोठा वर्ग कनिष्ठ मध्यमवर्गातून मध्यमवर्गात सरकल्याचे चित्र आहे. सहावा वेतन आयोग आल्याने सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रातही हे नवश्रीमंतीचे संक्रमण दिसून येते.
ह्याचे आपण बहुजन-अभिजन अभिसरण असेही समाज शास्त्रीय भाषेत वर्णन करू शकतो.
परंतु हा जो नव अभिजन वर्ग समजत निर्माण झाला आहे त्याची मानसिकता ह्या १० वर्षात कोणत्या दिशेने गेली? ज्या काँग्रेस सरकारच्या काळात आपले सामाजिक उत्थान झाल्याचे त्यानाही दिसत आहे त्याबद्दल त्यांचे विचार काय आहेत? ह्याचे उत्तर अत्यंत नकारात्मक आहे. काँग्रेस सरकारला ठामपणे नाकारण्याची भूमिका घेऊन हाच नवश्रीमंत वर्ग आज मोदींच्या पाठीमागे उभा राहिल्याचे दिसते. म्हणजेच कॉंग्रेसची धर्म-निरपेक्षता अमान्य करून भाजपची धर्माधारित हिंदुराष्ट्रवादी भूमिका त्यांनी सोयीस्कर रित्या स्वीकारलेली दिसते. त्याचे प्रतिबिंब सोशल मिडीयावर आपल्याला पाहायला मिळते.
हा नव्या मध्यमवर्गाचा अत्यंत प्रभाव शाली असलेलेला वर्ग अशा प्रकारे लाभार्थी असूनही असंतुष्ट आणि म्हणून लोभार्थी होऊन जी नकारात्मक भूमिका समाजात घेत आहे त्याचे परखड विश्लेषण जेष्ठ पत्रकार विचारवंत कुमार केतकर ह्यांनी एका चर्चासत्रात केले आहे.
समाजशास्त्राप्रमाणे बहुजन-अभिजन हे जे अभिसरण होत असते त्यातून घडलेला जो अभिजनवर्ग आहे त्याने बहुजन वर्गापुढे आपल्या कर्तुत्वाने, विचाराने आदर्श निर्माण करावा जेणेकरून बहुजन वर्ग त्यांना अनुसरून वाटचाल करू शकेल; तरच ते अभिसरण यशस्वी होते.
अर्थातच हे नवे अभिसरण लौकिकार्थाने यशस्वी दिसत असले तरी ते सामाजिक दृष्ट्या अयशस्वी आणि धोकादायकही आहे असे म्हणवे लागेल.
प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्यमवर्ग आणि नवश्रीमंत वर्ग ह्या UPA सरकारच्या काळात झपाट्याने पुढे आला. औद्योगीकरण, मल्टीन्याशनल्स, इन्फ्रास्ट्रक्चर, कन्स्ट्रकशन, एन्टरटेनमेंट, हौस्पीटालिटी अशा नवनवीन क्षेत्रामध्ये मोठमोठी गुंतवणूक होऊन रोजगार-धंद्याच्या संधी उपलब्ध झाल्याने एक फार मोठा वर्ग कनिष्ठ मध्यमवर्गातून मध्यमवर्गात सरकल्याचे चित्र आहे. सहावा वेतन आयोग आल्याने सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रातही हे नवश्रीमंतीचे संक्रमण दिसून येते.
ह्याचे आपण बहुजन-अभिजन अभिसरण असेही समाज शास्त्रीय भाषेत वर्णन करू शकतो.
परंतु हा जो नव अभिजन वर्ग समजत निर्माण झाला आहे त्याची मानसिकता ह्या १० वर्षात कोणत्या दिशेने गेली? ज्या काँग्रेस सरकारच्या काळात आपले सामाजिक उत्थान झाल्याचे त्यानाही दिसत आहे त्याबद्दल त्यांचे विचार काय आहेत? ह्याचे उत्तर अत्यंत नकारात्मक आहे. काँग्रेस सरकारला ठामपणे नाकारण्याची भूमिका घेऊन हाच नवश्रीमंत वर्ग आज मोदींच्या पाठीमागे उभा राहिल्याचे दिसते. म्हणजेच कॉंग्रेसची धर्म-निरपेक्षता अमान्य करून भाजपची धर्माधारित हिंदुराष्ट्रवादी भूमिका त्यांनी सोयीस्कर रित्या स्वीकारलेली दिसते. त्याचे प्रतिबिंब सोशल मिडीयावर आपल्याला पाहायला मिळते.
हा नव्या मध्यमवर्गाचा अत्यंत प्रभाव शाली असलेलेला वर्ग अशा प्रकारे लाभार्थी असूनही असंतुष्ट आणि म्हणून लोभार्थी होऊन जी नकारात्मक भूमिका समाजात घेत आहे त्याचे परखड विश्लेषण जेष्ठ पत्रकार विचारवंत कुमार केतकर ह्यांनी एका चर्चासत्रात केले आहे.
समाजशास्त्राप्रमाणे बहुजन-अभिजन हे जे अभिसरण होत असते त्यातून घडलेला जो अभिजनवर्ग आहे त्याने बहुजन वर्गापुढे आपल्या कर्तुत्वाने, विचाराने आदर्श निर्माण करावा जेणेकरून बहुजन वर्ग त्यांना अनुसरून वाटचाल करू शकेल; तरच ते अभिसरण यशस्वी होते.
अर्थातच हे नवे अभिसरण लौकिकार्थाने यशस्वी दिसत असले तरी ते सामाजिक दृष्ट्या अयशस्वी आणि धोकादायकही आहे असे म्हणवे लागेल.
No comments:
Post a Comment