(कट्टरतावाद आणि धर्मांध दहशतवाद ह्यावर शाश्वत इलाज गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने शक्य असल्याचे म्हणतात. पण तो मार्ग त्या महात्म्याच्या रक्ताच्या थारोळ्यातील देहावरून जातो, हे देखील लक्षात घ्यावे लागेल!)...ह्या पोस्टवरील एका चर्चेतून.
गांधी २५-३० वर्षे अहिंसाआंदोलन, सत्याग्रह, सविनय कायदेभंग, असहकार, चलेजाव इत्यादी बरेवाईट काहीतरी काम करीत होता. सर्वधर्मसमभाववादी काँग्रेस टिळकांच्या नंतर गांधीच्या नेतृत्वाखाली देशभर आंदोलन पेटविण्यात यशस्वी झाली.
जे क्रांतिकारक ह्या काळात क्रांतीच्या यज्ञात आहुती देते झाले , उदा. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, अशफाकउल्लाखान तसेच सुभाषचंद्र बोस ह्यापैकी कुणीही हिंदुत्ववादी नव्हते.
तेव्हा हिंदू राष्ट्रावाले कोणते कार्य करीत होते ? कि त्या काळात पुण्यभू पितृभूसाठी करण्यासारखे काहीच नव्हते? ब्रिटीश सत्तेविरुद्ध ह्या लोकांची उदासीनता हीच त्यांच्या विचारसरणिचि मर्यादा आणि पराभव दोन्ही स्पष्ट करते.
हिंदुराष्ट्राच्या गप्पा मारणाऱ्या वीरांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात किती योगदान दिले ? राष्ट्रभक्त म्हणविता तर ब्रिटीश सत्तेविरुद्ध किती लढे उभारले? अहिंसा मान्य नव्हती तर सशस्त्र क्रांतीचे किती उठाव केले? एखाद्या जुलमी ब्रिटीश अधिकाऱ्याच 'वध' केला का? किती गोळ्या इंग्रज सत्तेवर झाडल्या? किती गोळ्या छातीवर झेलल्या? कि हिंदुत्वाचे आणि हिंदू राष्ट्राचे फक्त शाब्दिक पोकळ बुडबुडे काढण्यातच त्यांनी धन्यता मानली?
स्वा. सावरकरांच्या अंदामान्पूर्व क्रांतीकाळातील सहकारी देखील हिंदुत्वाचा विचार करीत नव्हते. मुळातच अंदमानातून स्वत:ची सुटका करून घेतल्यानंतर सावरकरांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली. म्हणजेच हिंदुत्ववादि सावरकर क्रांतिकारक म्हणून निवृत्त होऊन बसले होते.
एकूणच हिंदुत्वाचा विचार मांडणारी विचारधारा क्रांतिकार्यात देखील उदासीन आणि स्वातंत्र्य लढ्यापासून देखील फटकूनच राहिली. मग गांधी जो एका मार्गाने ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढला त्यावर टीका करण्याचा अधिकार कोणी दिला?
गांधीवर गोळी झाडणाऱ्यानि एखादी गोळी ब्रिटीश सत्तेवर झाडली असती किंवा स्वत: काही बलिदान स्वातंत्र्यलढ्यात दिलं असतं तर कदाचित त्यांच्या गांधीहत्येच्या भूमिकेचा विचार करता आला असता. म्हणून गांधीहत्या हि निव्वळ अतिरेकी, कट्टरतावादी, जात्यंध, धर्मांध स्वरुपाची दहशतवादी कारवाई ठरते.
कित्येकांचा गांधी केवळ गोडसे पुरताच मर्यादित
राहिला आहे हेच खरे..!!! हे खरंही असेल.
पण कित्येकांची राष्ट्रभक्ती किंवा धर्माभिमान नथुराम पुरती मर्यादित आहे त्याचे काय?
तुमचा मुद्दा तसा बरोबर आहे कि काही क्षुद्र मनोवृत्तींच्या विकृत विचारांच्या क्षुल्लक लोकांचा राज्यसभेत प्रचार करायची गरज नव्हती.
पण तरीही नथुराम अतिरेकी नव्हता कारण अतिरेकी समोरून हल्ला करीत नसतात वैगैरे लंगडी समर्थने पटत नाहीत. "त्याचे कृत्य निंदनीय म्हणा वा धिक्कारार्ह पण तो अतिरेकी नव्हता" तर मग तो होता तरी कोण? देशभक्त ??? ज्याचा शौर्यदिन कि कायतरी म्हणे साजरा केला जातो?
तो स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हल्ला असल्याचे जगभर मान्य आहे, ते नाकारून बदलणार आहे काय? जे आहे ते आहे. सत्य किंवा वास्तव एकदा स्वीकारले कि मग पुढे जाता येते. नाहीतर भूतकाळातच साचून राहून डबकं होतं. माणसाने प्रवाही असावं. पुरोगामी असावं.
पण कित्येकांची राष्ट्रभक्ती किंवा धर्माभिमान नथुराम पुरती मर्यादित आहे त्याचे काय?
तुमचा मुद्दा तसा बरोबर आहे कि काही क्षुद्र मनोवृत्तींच्या विकृत विचारांच्या क्षुल्लक लोकांचा राज्यसभेत प्रचार करायची गरज नव्हती.
पण तरीही नथुराम अतिरेकी नव्हता कारण अतिरेकी समोरून हल्ला करीत नसतात वैगैरे लंगडी समर्थने पटत नाहीत. "त्याचे कृत्य निंदनीय म्हणा वा धिक्कारार्ह पण तो अतिरेकी नव्हता" तर मग तो होता तरी कोण? देशभक्त ??? ज्याचा शौर्यदिन कि कायतरी म्हणे साजरा केला जातो?
तो स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हल्ला असल्याचे जगभर मान्य आहे, ते नाकारून बदलणार आहे काय? जे आहे ते आहे. सत्य किंवा वास्तव एकदा स्वीकारले कि मग पुढे जाता येते. नाहीतर भूतकाळातच साचून राहून डबकं होतं. माणसाने प्रवाही असावं. पुरोगामी असावं.
जगातील यच्चयावत विचारी लोक गांधीचे नाव घेऊन अहिंसेच्या मार्गावर चालतात. जगभर सर्वधर्मीय गांधीवादी त्यांचे काम यथाशक्ती करतात. तसंही काही टूक्कार कट्टरतावाद्यांनी सूर्यावर थुंकल्याने तो काही झाकोळत नाही. तरीही समस्त गांधीविरोधकांनी अफगानिस्तान, पाकिस्तान मध्ये जाऊन त्यांच्या अखंड हिंदुस्तानच्या पवित्र कार्याला वाहून घ्यायला काय हरकत आहे?
("क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.." असं समर्थ म्हणाले होते.)
गांधीची अहिंसा स्वातंत्र्योत्तर काळात काश्मीर आणि हैद्राबाद मध्ये
लष्करी कारवाई करताना कुठे आड आली? गांधीएवढा कुशल आणि यशस्वी राजकारणी
इंग्रजांनी तरी त्यांच्या सातासमुद्रावरील साम्राज्यात पाहिला होता काय?
पण काळ बदललाय...
अतिधोकादायक दंगलग्रस्त भागात पायी निशस्त्र फिरणारे गांधी आजही उभे राहतील. "मी सेक्युरिटी घेतली तर माझ्या कार्यकर्त्यांचे काय होईल" म्हणून आजही कुणी दाभोळकर निर्भयपणे रक्ताच्या थारोळ्यात पडेल.
पण काळ बदललाय...
इतिहासात गांधीचा मारेकरी कितीही वेषांतर करून किंवा शारीरिक बदल करून आला असेल तरी त्याच्या मुसक्या आवळल्यावर फासासमोर धोतरातच विधी उरकता झाला असेल.
पण, आज दाभोळकरांच्या मारेकऱ्याचा मागमूसही लागत नाही.
पण, पेशावरात आठवी-अ च्या वर्गात घुसलेला मारेकरी स्वत:लाच बॉम्बसह उडवतो.
काळ हा असा बदललाय...
..
पण काळ बदललाय...
अतिधोकादायक दंगलग्रस्त भागात पायी निशस्त्र फिरणारे गांधी आजही उभे राहतील. "मी सेक्युरिटी घेतली तर माझ्या कार्यकर्त्यांचे काय होईल" म्हणून आजही कुणी दाभोळकर निर्भयपणे रक्ताच्या थारोळ्यात पडेल.
पण काळ बदललाय...
इतिहासात गांधीचा मारेकरी कितीही वेषांतर करून किंवा शारीरिक बदल करून आला असेल तरी त्याच्या मुसक्या आवळल्यावर फासासमोर धोतरातच विधी उरकता झाला असेल.
पण, आज दाभोळकरांच्या मारेकऱ्याचा मागमूसही लागत नाही.
पण, पेशावरात आठवी-अ च्या वर्गात घुसलेला मारेकरी स्वत:लाच बॉम्बसह उडवतो.
काळ हा असा बदललाय...
..
अभ्यास नसलेला ब्लॉग
ReplyDeleteअभ्यासूनी प्रकटावे हे बरे
अभ्यास नसलेला ब्लॉग
ReplyDeleteअभ्यासूनी प्रकटावे हे बरे