गोवंशहत्याबंदीच्या फतव्यावरील चर्चेतून ...
गावी माझ्याही घरात बैल होते. बैलगाडीला जुंपणारे आणि शेतात नांगर ओढणारे बैल. खूप प्रेमाने जोपासलेली बैलजोडी. म्हसा, घोटी अशा लांबच्या बाजारातून बैल हौसेने खरेदी करून आणले जात. दुधदाती, दोनदाती, चारदाती अशा प्रकारचे आणि तत्सम अनेक गुण-दोष पारखून बैलांचे सौदे होत असत. आमचे अण्णा बैल ह्या विषयातले मनस्वी जाणकार. वर्षभरात फक्त घरच्या शेतीसाठी वापरल्याने आमचे बैलदेखील देखणे, धष्टपुष्ट राहत. शेजारच्या गावातून हौशी लोक ते बैल पाहण्यासाठी येत.
एकदा असाच आमचा एक बैल शेजारच्या गावी विकला गेला. तांबड्या-पांढऱ्या (तांबाबाळा) रंगाचं उमदं जनावर. सुडौल शिंगे. त्याचा आम्हाला आणि त्यालाही खूप लळा लागला होता. त्याचा नवा मालक बैलगाडी घेऊन गावात आला तर हा गाडी खेचत घेऊन घरी येई. नित्यनेमाने त्या गावातून पळून तो आमच्या घरी येई. आमच्या ह्या पाहुण्याचा मग सणच साजरा होई. जो तो त्याला शक्य असेल ते खायला प्यायला देई. आई त्याला सुपात तांदूळ खायला देईल तर बाबा त्याला तेल पाजत. कुणीतरी पेंढा आणून त्याच्या पुढ्यात टाकी तर कुणी त्याला पेंड खायला घाली. असा सोहळा चालत असताना त्याचा मालक धापा टाकत येई. ह्याने तोडलेला दोर (दावे) हातात घेऊन तो आला कि पुन्हा निरोपाचा हृदयद्रावक प्रसंग उभा राही. कित्येक वर्षे न चुकता तो पाहुणा घरी येतच राहिला...
पण ह्याच बैलांच्या खुरांमध्ये जेव्हा रोग होऊन किडे पडतात तेव्हा त्याची किती निगा राखावी लागते? पावसाळ्यात त्या बैलांच्या गोठ्यातून मच्छर डासांचा प्रादुर्भाव होतो, तेव्हा रात्रीतून कितीदा उठून धूर करून त्यांची काळजी घायवी लागते? त्यांच्या रोजच्या चारावैरण, पाण्यासाठी किंवा गोठ्यातून शेण काढून स्वच्छता ठेवण्यासाठी, उन्हाळा असो कि पावसाळा, किती मेहनत घ्यावी लागते? (अत्यंत जिकीरीचे आणि तेवढेच खर्चिक असणारे हे बैलांचे लोढणे मी अलीकडे मोठ्या शिताफीने किंवा निष्ठुरपणे काढून टाकायला लावले...)
पण ह्याच बैलांना बडवण्याचा 'अमानुष' कार्यक्रम कुणी पहिला असता तर... किंवा त्यांची शिंगे छाटण्याचा 'रक्तरंजित हिंस्त्र' प्रसंग अनुभवला असता तर... संवेदनशील वर्गाच्या जीवाचा थरकाप होईल. आणखी किती कायदे करावे लागतील? शेतकरी दिवाळीत बैलांना अग्नीवरून उड्या मारायला लावतो, म्हणून काही लोक त्या अंधश्रद्धेच्या नावाने पोस्ट टाकतात. पण शेतकरी पोटच्या अपत्याप्रमाणेच आपल्या गुराढोरांवर प्रेम करतो. दिवाळीत स्वत:हि बैलांच्या सोबत आगीवरून उड्या मारतो. सणासुदीला बैलांच्या शिंगाना गेरुचा (का होईना!) रंग लावून, स्वत:च्या सोबत त्यानाही सणासुदीत सामावून घेतो, हे कुणी लक्षात घेत नाही.
गावात आमच्या शेजारी एक नथू राहत असे. त्याचा गुरेढोरे पाळायचा धंदाच होता. बाहेरच्या गावातील लोकही त्याच्याकडे गाई ठेवत असत. गाय व्याली कि नथुला ठरलेले पैसे देऊन ते गाई घेऊन जात, अशा प्रकारचा धंदा चाले. सदैव अठरा विश्वे दारिद्र्यात नांदणाऱ्या नथूच्या गोठ्यात दुधदुभत्यांची कधीच कमी नसे! कधीतरी नथूसुद्धा एखाद दुसरी गाय कसायला विकत असे. त्यामुळे आमच्या संवेदनशील घरात नथूबद्दल असंतोष पसरत असे. नथुने असं निर्दयी कृत्य करायला नको अशी आमची ठाम समजूत होती.
पण नथुचि व्यथा काय असते, ते माझा मित्र शरद पाटीलच्या अस्सल ग्रामीण कृषीवल जीवनानुभवातून ऐका...
" कसायाच्या हातात हरण्याला देताना आबाच्या पोटात गोळाच आला होता. आबानं हरण्याचं कासरं खांद्याला लावलं कसायानं दिलेलं पैसं न मोजताच खिशात सारलं आणि घरची वाट चालायला आबानं सुरवात केली. अंधारून आलं होतचं,गाव तसं जवळचं होतं आबा पाय पण झपाझप उचलत होता पण वाट तुटता तुटतं नव्हती. मागचं सहा महिने असचं होतं होतं,बाजारात हरण्याला आबा घेवून यायचा....आणि संध्याकाळी परत त्याला घरला घेवून जायचा.
चित्र्या आणि हरण्या बैलजोडीनं आबाचं घर वर आणलं होतं. दोन वर्षापूर्वी घसारतीला गाडी उधळल्याचं निमित्त झालं..आणि चित्र्या हरण्याच्या पायांना दुखापती झाल्या. चित्र्या तीन चार महिन्यात दगावला पण हरण्या मात्र वाचला. पण त्याच्या पायाची दुखापतं त्याला खंगवत होती. आबाला आणि घरच्यांना ते हाल बघवतं नव्हते आणि हरण्याला बाजाराला न्यायला आबा तयार झाला पण कसायाच्या हातात कासरा द्यायला त्याचं मन धजावत नव्हतं. आठ दहा बाजार असेच गेले. आणि आज शेवटी हरण्याला कसायाकडं सोपवून आबा घरच्या रस्त्याला लागला.
वस्तीवर पोहचेपर्यंत आबाला रात्रीचे दहा वाजले होते. घरात शिरतानाच पायांच्या आवाजनं बाजवरं पडलेल्या तात्यांच्या हाथरूणात जरा हालचाल जाणवली. रोज नऊ साडे नऊ वाजता झोपणारा बा आज दहा वाजून गेलं तरी हाथरूणात कुशी बदलत पडून होता. आबाला कसंनुसचं वाटलं. सोप्यात पायतान काढून आबा आत गेला, बायको मदघरात कापडांच्या घड्या घालतं होती...,"येळ केला यायला..." असं काही तरी तीनं विचारलं असं आबाला वाटून गेलं. फक्त हम्म असा अस्पष्टसा हुंकार आबाच्या तोंडातनं बाहेर पडला.मोरीत जावून आबानं हातपाय धुतलं आणि कमरेला टाॅवेल गुंडाळून आबा बाहेर आला. बायकोच्या शेजारीचं तिच्या मांडीवर डोकं ठेवून आबाचा लेक,चिन्या झोपला होता. चिन्याच्या गालावर रडलेल्याच्या खूणा आबाला लांबून ही ओळखता आल्या,बायको ही मान खाली घालूनच कापडांच्या घड्या घालत होती. तिथूनचं आबाचं लक्ष स्वयंपाकघरात, चुलीकडं गेलं तर चुल थंड होती...काय झालं माहीत नाही. आबाला अचानक भरून आलं गळ्यातला हुंदका तसाच दाबून धरून आबा घराबाहेर आला आणि घराशेजारच्या सपरात येवून हरण्या उभा असायच्या रिकाम्या जागेकडे बघून हमसून हमसून रडू लागला....." (... Sharad Patil )
शोभेची भारी कुत्री घरात बाळगणाऱ्या शहरीवर्गाला गुरेढोरे पाळणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा कशी कळावी? ह्या संवेदनशील (!) वर्गाने धार्मिक श्रद्धेच्या भाकडकथा सांगाव्यात आणि त्यासाठी सरकारने कायद्याचे बडगे उगारावेत?
म्हणून प्रकाश झावरे पाटील सरांच्या पोस्टमाधील दाहक अगतिकता मनाला चटका लावून जाते:
" शेतकरी गाय विकत घेतो. संगोपनावर खर्च करतो. ती त्याची खाजगी मालमत्ता आहे. कोणत्याही धर्माची किंवा धर्म मार्तंडांच्या बापाची नाही. त्या मालमत्तेचा विनियोग करण्याचा हक्क त्याचा स्वत:चाच असणे नैसर्गिक न्यायाचे आहे. कोणत्याही धर्माचा संस्कृतीचा समाजाचा व शासनाचा त्यामधील हस्तक्षेप ही हुकुमशाहीच असेल.
तुमचे घर जुने पडके झाले तरी विक्रीच करता दिड शहाण्यांनो..! कारण ते तुम्ही विकत घेतलेले असते.
शेतकर्याला "दानधर्मात " गायींची प्राप्ती होत नाही. त्याला मोफत गायी द्या ..संगोपनाचा खर्च द्या तो त्या भाकड असल्या तरी सांभाळीलच..कसायाला विकणार नाही. तुमच्या सर्वांपेक्षा तो दयाळू आहे..
शेतकर्यांनो भारतीय वंशाच्या दिवसभरात घरदार खाऊन जास्तीत जास्त 2 ते 2.5 लिटर दूध देऊन 10 लिटर मुतणार्या गायी पाळू नका. बँकेतून कर्ज मिळवा विदेशी बिज असलेली " होस्टेन " गाय घ्या. किंवा म्हैस घ्या..आधुनिक शेळी पालन करा. शेती भाडोत्री यंत्रांनी करा. बैलांचा आग्रह धरु नका. पशुपालन प्रचंड खर्चिक आहे. कोणत्याही पाप पुण्याचा विचार न करता भाकड जितराबांना व त्यांच्या मवाली धर्मसंहितेला तुमच्या प्रपंचातून गचांडी मारा.
" गोहत्त्या बंदी " या मवाली निर्णयावरील शेवटची पोस्ट..!!" (...Prakash Zaware Patil)
गावी माझ्याही घरात बैल होते. बैलगाडीला जुंपणारे आणि शेतात नांगर ओढणारे बैल. खूप प्रेमाने जोपासलेली बैलजोडी. म्हसा, घोटी अशा लांबच्या बाजारातून बैल हौसेने खरेदी करून आणले जात. दुधदाती, दोनदाती, चारदाती अशा प्रकारचे आणि तत्सम अनेक गुण-दोष पारखून बैलांचे सौदे होत असत. आमचे अण्णा बैल ह्या विषयातले मनस्वी जाणकार. वर्षभरात फक्त घरच्या शेतीसाठी वापरल्याने आमचे बैलदेखील देखणे, धष्टपुष्ट राहत. शेजारच्या गावातून हौशी लोक ते बैल पाहण्यासाठी येत.
एकदा असाच आमचा एक बैल शेजारच्या गावी विकला गेला. तांबड्या-पांढऱ्या (तांबाबाळा) रंगाचं उमदं जनावर. सुडौल शिंगे. त्याचा आम्हाला आणि त्यालाही खूप लळा लागला होता. त्याचा नवा मालक बैलगाडी घेऊन गावात आला तर हा गाडी खेचत घेऊन घरी येई. नित्यनेमाने त्या गावातून पळून तो आमच्या घरी येई. आमच्या ह्या पाहुण्याचा मग सणच साजरा होई. जो तो त्याला शक्य असेल ते खायला प्यायला देई. आई त्याला सुपात तांदूळ खायला देईल तर बाबा त्याला तेल पाजत. कुणीतरी पेंढा आणून त्याच्या पुढ्यात टाकी तर कुणी त्याला पेंड खायला घाली. असा सोहळा चालत असताना त्याचा मालक धापा टाकत येई. ह्याने तोडलेला दोर (दावे) हातात घेऊन तो आला कि पुन्हा निरोपाचा हृदयद्रावक प्रसंग उभा राही. कित्येक वर्षे न चुकता तो पाहुणा घरी येतच राहिला...
पण ह्याच बैलांच्या खुरांमध्ये जेव्हा रोग होऊन किडे पडतात तेव्हा त्याची किती निगा राखावी लागते? पावसाळ्यात त्या बैलांच्या गोठ्यातून मच्छर डासांचा प्रादुर्भाव होतो, तेव्हा रात्रीतून कितीदा उठून धूर करून त्यांची काळजी घायवी लागते? त्यांच्या रोजच्या चारावैरण, पाण्यासाठी किंवा गोठ्यातून शेण काढून स्वच्छता ठेवण्यासाठी, उन्हाळा असो कि पावसाळा, किती मेहनत घ्यावी लागते? (अत्यंत जिकीरीचे आणि तेवढेच खर्चिक असणारे हे बैलांचे लोढणे मी अलीकडे मोठ्या शिताफीने किंवा निष्ठुरपणे काढून टाकायला लावले...)
पण ह्याच बैलांना बडवण्याचा 'अमानुष' कार्यक्रम कुणी पहिला असता तर... किंवा त्यांची शिंगे छाटण्याचा 'रक्तरंजित हिंस्त्र' प्रसंग अनुभवला असता तर... संवेदनशील वर्गाच्या जीवाचा थरकाप होईल. आणखी किती कायदे करावे लागतील? शेतकरी दिवाळीत बैलांना अग्नीवरून उड्या मारायला लावतो, म्हणून काही लोक त्या अंधश्रद्धेच्या नावाने पोस्ट टाकतात. पण शेतकरी पोटच्या अपत्याप्रमाणेच आपल्या गुराढोरांवर प्रेम करतो. दिवाळीत स्वत:हि बैलांच्या सोबत आगीवरून उड्या मारतो. सणासुदीला बैलांच्या शिंगाना गेरुचा (का होईना!) रंग लावून, स्वत:च्या सोबत त्यानाही सणासुदीत सामावून घेतो, हे कुणी लक्षात घेत नाही.
गावात आमच्या शेजारी एक नथू राहत असे. त्याचा गुरेढोरे पाळायचा धंदाच होता. बाहेरच्या गावातील लोकही त्याच्याकडे गाई ठेवत असत. गाय व्याली कि नथुला ठरलेले पैसे देऊन ते गाई घेऊन जात, अशा प्रकारचा धंदा चाले. सदैव अठरा विश्वे दारिद्र्यात नांदणाऱ्या नथूच्या गोठ्यात दुधदुभत्यांची कधीच कमी नसे! कधीतरी नथूसुद्धा एखाद दुसरी गाय कसायला विकत असे. त्यामुळे आमच्या संवेदनशील घरात नथूबद्दल असंतोष पसरत असे. नथुने असं निर्दयी कृत्य करायला नको अशी आमची ठाम समजूत होती.
पण नथुचि व्यथा काय असते, ते माझा मित्र शरद पाटीलच्या अस्सल ग्रामीण कृषीवल जीवनानुभवातून ऐका...
" कसायाच्या हातात हरण्याला देताना आबाच्या पोटात गोळाच आला होता. आबानं हरण्याचं कासरं खांद्याला लावलं कसायानं दिलेलं पैसं न मोजताच खिशात सारलं आणि घरची वाट चालायला आबानं सुरवात केली. अंधारून आलं होतचं,गाव तसं जवळचं होतं आबा पाय पण झपाझप उचलत होता पण वाट तुटता तुटतं नव्हती. मागचं सहा महिने असचं होतं होतं,बाजारात हरण्याला आबा घेवून यायचा....आणि संध्याकाळी परत त्याला घरला घेवून जायचा.
चित्र्या आणि हरण्या बैलजोडीनं आबाचं घर वर आणलं होतं. दोन वर्षापूर्वी घसारतीला गाडी उधळल्याचं निमित्त झालं..आणि चित्र्या हरण्याच्या पायांना दुखापती झाल्या. चित्र्या तीन चार महिन्यात दगावला पण हरण्या मात्र वाचला. पण त्याच्या पायाची दुखापतं त्याला खंगवत होती. आबाला आणि घरच्यांना ते हाल बघवतं नव्हते आणि हरण्याला बाजाराला न्यायला आबा तयार झाला पण कसायाच्या हातात कासरा द्यायला त्याचं मन धजावत नव्हतं. आठ दहा बाजार असेच गेले. आणि आज शेवटी हरण्याला कसायाकडं सोपवून आबा घरच्या रस्त्याला लागला.
वस्तीवर पोहचेपर्यंत आबाला रात्रीचे दहा वाजले होते. घरात शिरतानाच पायांच्या आवाजनं बाजवरं पडलेल्या तात्यांच्या हाथरूणात जरा हालचाल जाणवली. रोज नऊ साडे नऊ वाजता झोपणारा बा आज दहा वाजून गेलं तरी हाथरूणात कुशी बदलत पडून होता. आबाला कसंनुसचं वाटलं. सोप्यात पायतान काढून आबा आत गेला, बायको मदघरात कापडांच्या घड्या घालतं होती...,"येळ केला यायला..." असं काही तरी तीनं विचारलं असं आबाला वाटून गेलं. फक्त हम्म असा अस्पष्टसा हुंकार आबाच्या तोंडातनं बाहेर पडला.मोरीत जावून आबानं हातपाय धुतलं आणि कमरेला टाॅवेल गुंडाळून आबा बाहेर आला. बायकोच्या शेजारीचं तिच्या मांडीवर डोकं ठेवून आबाचा लेक,चिन्या झोपला होता. चिन्याच्या गालावर रडलेल्याच्या खूणा आबाला लांबून ही ओळखता आल्या,बायको ही मान खाली घालूनच कापडांच्या घड्या घालत होती. तिथूनचं आबाचं लक्ष स्वयंपाकघरात, चुलीकडं गेलं तर चुल थंड होती...काय झालं माहीत नाही. आबाला अचानक भरून आलं गळ्यातला हुंदका तसाच दाबून धरून आबा घराबाहेर आला आणि घराशेजारच्या सपरात येवून हरण्या उभा असायच्या रिकाम्या जागेकडे बघून हमसून हमसून रडू लागला....." (... Sharad Patil )
शोभेची भारी कुत्री घरात बाळगणाऱ्या शहरीवर्गाला गुरेढोरे पाळणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा कशी कळावी? ह्या संवेदनशील (!) वर्गाने धार्मिक श्रद्धेच्या भाकडकथा सांगाव्यात आणि त्यासाठी सरकारने कायद्याचे बडगे उगारावेत?
म्हणून प्रकाश झावरे पाटील सरांच्या पोस्टमाधील दाहक अगतिकता मनाला चटका लावून जाते:
" शेतकरी गाय विकत घेतो. संगोपनावर खर्च करतो. ती त्याची खाजगी मालमत्ता आहे. कोणत्याही धर्माची किंवा धर्म मार्तंडांच्या बापाची नाही. त्या मालमत्तेचा विनियोग करण्याचा हक्क त्याचा स्वत:चाच असणे नैसर्गिक न्यायाचे आहे. कोणत्याही धर्माचा संस्कृतीचा समाजाचा व शासनाचा त्यामधील हस्तक्षेप ही हुकुमशाहीच असेल.
तुमचे घर जुने पडके झाले तरी विक्रीच करता दिड शहाण्यांनो..! कारण ते तुम्ही विकत घेतलेले असते.
शेतकर्याला "दानधर्मात " गायींची प्राप्ती होत नाही. त्याला मोफत गायी द्या ..संगोपनाचा खर्च द्या तो त्या भाकड असल्या तरी सांभाळीलच..कसायाला विकणार नाही. तुमच्या सर्वांपेक्षा तो दयाळू आहे..
शेतकर्यांनो भारतीय वंशाच्या दिवसभरात घरदार खाऊन जास्तीत जास्त 2 ते 2.5 लिटर दूध देऊन 10 लिटर मुतणार्या गायी पाळू नका. बँकेतून कर्ज मिळवा विदेशी बिज असलेली " होस्टेन " गाय घ्या. किंवा म्हैस घ्या..आधुनिक शेळी पालन करा. शेती भाडोत्री यंत्रांनी करा. बैलांचा आग्रह धरु नका. पशुपालन प्रचंड खर्चिक आहे. कोणत्याही पाप पुण्याचा विचार न करता भाकड जितराबांना व त्यांच्या मवाली धर्मसंहितेला तुमच्या प्रपंचातून गचांडी मारा.
" गोहत्त्या बंदी " या मवाली निर्णयावरील शेवटची पोस्ट..!!" (...Prakash Zaware Patil)
No comments:
Post a Comment