पोस्टमार्टेम रिपोर्ट
विश्वचषकातील भारतीय संघाच्या पराभवाचे गुन्हेगार कोण, हा आजचा कळीचा मुद्दा आहे. एकही सामना न हरणारी टीम इंडिया तब्बल १०० धावांनी का पराभूत झाली? त्याची कारणे तपासून पहिली तर काही चुका स्पष्ट दिसून येतात.
यादव-शमिने १० षटकात ५० धावा देऊन वॉर्नरचा महत्वाचा बळी घेऊन छान सुरुवात केली. पण नंतरच्या गोलंदाजांनी (अश्विन, जडेजा, मोहित) २० षटकांत फक्त गोलंदाजीच्या पाट्या टाकल्या. मधल्या ओव्हर्समध्ये जेव्हा फलंदाज आक्रमक नसतात तेव्हा आपल्या वाट्याच्या ओव्हर्स खपवून बाजूला होणारे गोलंदाज काय कामाचे ? ३५व्या षटकात परत येउन यादवने स्मिथचा बळी घेतला तोपर्यंत ओस्ट्रेलियाच्या २०० धावा फलकावर लागल्या होत्या. उर्वरित १५ षटकांत ते हाणामारी करून धावांचा डोंगर रचणार हे स्पष्टच दिसत होते.
तसेच फलंदाजीत रोहित आणि शिखरने छान सुरुवात करून दिल्यावर आणि तद्नंतर शिखर, विराट, रोहित हे स्टार फलंदाज पाठोपाठ बाद झाल्यावर रैना, जडेजा हि लोअरमिडलऑर्डर राहणे-धोनीसोबत उभी राहिली नाही. हा भारतीय संघातील ठळक लूपहोल होता, जो आजच्या महत्वाच्या सामन्यात उघडा पडला.
साखळी फेरीतील सामन्यात आपल्या टीम मधले हे कच्चे दुवे बदलण्याची गरज होती. सुरुवातीचे सामने जिंकल्यानंतर आणि क्वार्टरफायनलमध्ये जागा पक्की झाल्यांवर आपल्याकडे दोन सामने उपलब्ध होते. त्यात हि कमजोर कडी बदलता आली असती. हि कमजोर कडी म्हणजे रवींद्र जडेजा होता, हे स्पष्ट होते. एकतर फिरकी गोलंदाज म्हणून तो प्रभावी ठरत नव्हता आणि फलंदाज म्हणून त्याच्याकडून कामगिरीची अपेक्षाही नव्हती. संघ जिंकत असल्याने हि कमजोरी उघड होत नव्हती आणि ते छुपं ठेवण्यातच संघव्यबस्थापनाने चूक केली.
इंडिया क्वार्टरफायनलमध्ये पोहोचली तोपर्यंतची कामगिरी पाहता जी धोक्याची घंटा वाजत होती ती कुणी लक्षात घेतलि नाही. भारताची फलंदाजी मुख्यत: रोहित, धवन, कोहली ह्या स्टार फलंदाजांवर अवलंबून आहे. त्यातला एकहीजण खेळला तर आपली धावसंख्या चांगला आकार घेते. पण ते जर लवकर तंबूत परतले तर आपली तळाची फलंदाजी कशी ढेपाळते ते वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाले होते. मोजक्या धावांचे आव्हान असूनही रैना, जडेजा हे मधल्या फळीतले फलंदाज खेळपट्टीवर उभे राहू शकले नाहीत. उसळत्या चेंडूवर त्यांची फलंदाजी अक्षरश: उघडी पडताना आपण नेहमी पाहतो. अर्थात, पुढच्या बाद फेरीत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया ह्या मातब्बर संघांसमोर त्यांची काय अवस्था होईल त्याचा विचार करता, संघात काही बदल अपेक्षित होते.
पहिले चार फलंदाज आणि यादव, शमी हे द्रुतगती गोलंदाज हि आपली बलस्थाने आहेत. कर्णधार धोनी स्वत: एक वादातीत शक्तीस्थान आहेच. पण भारतीय संघात एक चेन्नई सुपरकिंग्स नावाचा उपसंघ आहे. धोनी आणि त्याचे शिलेदार (अश्विन, जडेजा,रैना, मोहित) हा तो उपसंघ. पैकी अश्विन सध्या बरी स्पिन टाकत होता. मोहित शर्मा मूळ संघात नव्हता, तरीही तो मिळालेल्या संधीचे सोने करीत होता. रैनादेखील खेळपट्ट्या फलंदाजीस पोषक असल्याने चांगली कामगिरी करीत होता.
पण प्रश्न होता जडेजाच्या लोअर मिडलऑर्डर फलंदाजीचा आणि पाचव्या गोलंदाजाचा. हि संघातील कमजोर कडी होती. परंतु त्या उपसंघाचा आपसात किती विश्वास असतो ते जडेजाने जेव्हा रिव्ह्यू मागितला तेव्हा दिसले. धोनीला खात्री नसूनही केवळ जाडेजाच्या आग्रहाखातर त्याने तो रिव्ह्यू कसा घेतला ते पाहता, चेन्नई सुपरकिंगच्या खेळाडूंसाठी संघाला दुय्यम महत्व दिले जाते कि काय, अशी शंका घ्यायला जागा आहे.
खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल तर जडेजाची स्पिन अयशस्वी ठरल्याने जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला खेळविणे गरजेचे होते. किंवा खेळपट्टी जर तेज गोलंदाजीला पोषक असेल तर भुवनेश कुमारला चौथ्या बॉलरच्या स्वरुपात संघात घेऊन आक्रमणाची धार वाढविता आली असती. तसंही गेल्या दोन वर्षातील तो भारताचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज असूनही त्याला दुर्लक्षित ठेवून काय साध्य झाले? किंवा बिन्नीला संधी देवून त्याच्या फलंदाजीचाही तळाला फायदा करून घेत आला असता. किवा कदाचित इशांत शर्माच्या जागी बदली खेळाडू घेतला गेल तेव्हाच अनफिट जाडेजाच्या जागी युवराजसिंगचा विचार करण्याची संधी होती, ती संघ-व्यवस्थापनाने दवडली. इथेही सीएसके कनेक्शन संघाच्या आड आले असंच दिसून येईल. आज जेव्हा एक विकेट लवकर पडल्यावर ओस्ट्रेलियाने १८० धावांची मोठी भागीदारी केली तेव्हा भुवि किंवा अक्षरसारखा विकेटटेकिंग गोलंदाज महत्वपूर्ण ठरला नसता काय?
तसेच रैना हाणामारीच्या षटकांत निर्णायक फटकेबाजी करू शकतो. पण चार विकेट लवकर पडल्या तर वरच्या क्रमांकावर त्याची हतबलता पाहता एक्स्ट्रा फलंदाज खेळवून रैनाला खालच्या क्रमांकावर आणणे गरजेचे होते. मग आपल्याला पाचव्या क्रमांकावर रायुडूला घेऊन आणि रैनाला सहाव्या क्रमांकावर पाठवून फलंदाजीची खोली वाढवता आली असती का? ते दोघे मिळून १० षटके टाकतील तर ते शक्य झाले असते. तसंही रैनाने मागच्या एक सामन्यात एकट्यानेच १० षटके टाकली होती. म्हणजेच आज गरज असताना रायुडूच्या स्वरुपात आपल्याला पाचव्या क्रमांकावर एक विश्वासार्ह फलंदाज मधल्या फळीत मिळाला असता आणि रैना तळाला सहाव्या क्रमांकावर धोनीसोबत मोठे फटके खेळू शकला असता.
असे असताना भूवीच्या स्विंग वर विश्वास का ठेवला नाही ? किंवा अक्षर पटेलच्या प्रभावी फिरकीचा ऑप्शन का वापरला गेला नाही? किंवा बिन्नीच्या अष्टपैलू खेळाचा पर्याय का चाचपडून पहिला नाही?
खरंतर रायुडूच्या रूपाने एक अधिक फलंदाज घेऊन रैना आणि इतरांच्या गोलंदाजीचा पर्याय सर्वाधिक उपयुक्त ठरला नसता?
पण बादफेरीत पोहोचल्यावरही उर्वरित दोन सामन्यात वरीलपैकी कोणताही बदल न करून संघव्यवस्थापनाने नक्की काय साधले? ह्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आहे आणि ते म्हणजे भारतीय संघावर असलेला अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा. जी टीम जिंकतेय तिच्यात मुळीच बदल करायचा नाही, ह्या सुपरस्टीशनच्या आहारी कोण गेले होते, ते स्पष्ट व्हायला हवे. आपले आजीमाजी दिग्गज खेळाडूदेखील ह्या अंधविश्वासाच्या जाळ्यात पूर्वापार फसलेले असतात. ह्या सुपरस्टीशनच्या प्रभावामुळेच संघात आवश्यक बदल केले गेले नाहीत, असंच दिसते. संधी असूनही तसा प्रयोगदेखील केला गेला नाही.क्रिकेट हा माईंडगेम, प्रेशरगेम , टेम्परामेंटगेम वगैरे असतो. पण व्यावसायिकता सोडून आपला संघ असा अंधश्रद्धाळू बनला. मग तिथे प्रोफेशनल ओस्ट्रेलियाच्या पुढे असल्या भोंगळ संघाचा कसा निभाव लागणार? अर्थात टीम इंडियाचे संघव्यवस्थापन म्हणजेच कर्णधार धोनी, रविशास्त्री, आदि तज्ञमंडळी ह्या पराभवाचे खरे गुन्हेगार आहेत.
विश्वचषकातील भारतीय संघाच्या पराभवाचे गुन्हेगार कोण, हा आजचा कळीचा मुद्दा आहे. एकही सामना न हरणारी टीम इंडिया तब्बल १०० धावांनी का पराभूत झाली? त्याची कारणे तपासून पहिली तर काही चुका स्पष्ट दिसून येतात.
यादव-शमिने १० षटकात ५० धावा देऊन वॉर्नरचा महत्वाचा बळी घेऊन छान सुरुवात केली. पण नंतरच्या गोलंदाजांनी (अश्विन, जडेजा, मोहित) २० षटकांत फक्त गोलंदाजीच्या पाट्या टाकल्या. मधल्या ओव्हर्समध्ये जेव्हा फलंदाज आक्रमक नसतात तेव्हा आपल्या वाट्याच्या ओव्हर्स खपवून बाजूला होणारे गोलंदाज काय कामाचे ? ३५व्या षटकात परत येउन यादवने स्मिथचा बळी घेतला तोपर्यंत ओस्ट्रेलियाच्या २०० धावा फलकावर लागल्या होत्या. उर्वरित १५ षटकांत ते हाणामारी करून धावांचा डोंगर रचणार हे स्पष्टच दिसत होते.
तसेच फलंदाजीत रोहित आणि शिखरने छान सुरुवात करून दिल्यावर आणि तद्नंतर शिखर, विराट, रोहित हे स्टार फलंदाज पाठोपाठ बाद झाल्यावर रैना, जडेजा हि लोअरमिडलऑर्डर राहणे-धोनीसोबत उभी राहिली नाही. हा भारतीय संघातील ठळक लूपहोल होता, जो आजच्या महत्वाच्या सामन्यात उघडा पडला.
साखळी फेरीतील सामन्यात आपल्या टीम मधले हे कच्चे दुवे बदलण्याची गरज होती. सुरुवातीचे सामने जिंकल्यानंतर आणि क्वार्टरफायनलमध्ये जागा पक्की झाल्यांवर आपल्याकडे दोन सामने उपलब्ध होते. त्यात हि कमजोर कडी बदलता आली असती. हि कमजोर कडी म्हणजे रवींद्र जडेजा होता, हे स्पष्ट होते. एकतर फिरकी गोलंदाज म्हणून तो प्रभावी ठरत नव्हता आणि फलंदाज म्हणून त्याच्याकडून कामगिरीची अपेक्षाही नव्हती. संघ जिंकत असल्याने हि कमजोरी उघड होत नव्हती आणि ते छुपं ठेवण्यातच संघव्यबस्थापनाने चूक केली.
इंडिया क्वार्टरफायनलमध्ये पोहोचली तोपर्यंतची कामगिरी पाहता जी धोक्याची घंटा वाजत होती ती कुणी लक्षात घेतलि नाही. भारताची फलंदाजी मुख्यत: रोहित, धवन, कोहली ह्या स्टार फलंदाजांवर अवलंबून आहे. त्यातला एकहीजण खेळला तर आपली धावसंख्या चांगला आकार घेते. पण ते जर लवकर तंबूत परतले तर आपली तळाची फलंदाजी कशी ढेपाळते ते वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाले होते. मोजक्या धावांचे आव्हान असूनही रैना, जडेजा हे मधल्या फळीतले फलंदाज खेळपट्टीवर उभे राहू शकले नाहीत. उसळत्या चेंडूवर त्यांची फलंदाजी अक्षरश: उघडी पडताना आपण नेहमी पाहतो. अर्थात, पुढच्या बाद फेरीत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया ह्या मातब्बर संघांसमोर त्यांची काय अवस्था होईल त्याचा विचार करता, संघात काही बदल अपेक्षित होते.
पहिले चार फलंदाज आणि यादव, शमी हे द्रुतगती गोलंदाज हि आपली बलस्थाने आहेत. कर्णधार धोनी स्वत: एक वादातीत शक्तीस्थान आहेच. पण भारतीय संघात एक चेन्नई सुपरकिंग्स नावाचा उपसंघ आहे. धोनी आणि त्याचे शिलेदार (अश्विन, जडेजा,रैना, मोहित) हा तो उपसंघ. पैकी अश्विन सध्या बरी स्पिन टाकत होता. मोहित शर्मा मूळ संघात नव्हता, तरीही तो मिळालेल्या संधीचे सोने करीत होता. रैनादेखील खेळपट्ट्या फलंदाजीस पोषक असल्याने चांगली कामगिरी करीत होता.
पण प्रश्न होता जडेजाच्या लोअर मिडलऑर्डर फलंदाजीचा आणि पाचव्या गोलंदाजाचा. हि संघातील कमजोर कडी होती. परंतु त्या उपसंघाचा आपसात किती विश्वास असतो ते जडेजाने जेव्हा रिव्ह्यू मागितला तेव्हा दिसले. धोनीला खात्री नसूनही केवळ जाडेजाच्या आग्रहाखातर त्याने तो रिव्ह्यू कसा घेतला ते पाहता, चेन्नई सुपरकिंगच्या खेळाडूंसाठी संघाला दुय्यम महत्व दिले जाते कि काय, अशी शंका घ्यायला जागा आहे.
खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल तर जडेजाची स्पिन अयशस्वी ठरल्याने जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला खेळविणे गरजेचे होते. किंवा खेळपट्टी जर तेज गोलंदाजीला पोषक असेल तर भुवनेश कुमारला चौथ्या बॉलरच्या स्वरुपात संघात घेऊन आक्रमणाची धार वाढविता आली असती. तसंही गेल्या दोन वर्षातील तो भारताचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज असूनही त्याला दुर्लक्षित ठेवून काय साध्य झाले? किंवा बिन्नीला संधी देवून त्याच्या फलंदाजीचाही तळाला फायदा करून घेत आला असता. किवा कदाचित इशांत शर्माच्या जागी बदली खेळाडू घेतला गेल तेव्हाच अनफिट जाडेजाच्या जागी युवराजसिंगचा विचार करण्याची संधी होती, ती संघ-व्यवस्थापनाने दवडली. इथेही सीएसके कनेक्शन संघाच्या आड आले असंच दिसून येईल. आज जेव्हा एक विकेट लवकर पडल्यावर ओस्ट्रेलियाने १८० धावांची मोठी भागीदारी केली तेव्हा भुवि किंवा अक्षरसारखा विकेटटेकिंग गोलंदाज महत्वपूर्ण ठरला नसता काय?
तसेच रैना हाणामारीच्या षटकांत निर्णायक फटकेबाजी करू शकतो. पण चार विकेट लवकर पडल्या तर वरच्या क्रमांकावर त्याची हतबलता पाहता एक्स्ट्रा फलंदाज खेळवून रैनाला खालच्या क्रमांकावर आणणे गरजेचे होते. मग आपल्याला पाचव्या क्रमांकावर रायुडूला घेऊन आणि रैनाला सहाव्या क्रमांकावर पाठवून फलंदाजीची खोली वाढवता आली असती का? ते दोघे मिळून १० षटके टाकतील तर ते शक्य झाले असते. तसंही रैनाने मागच्या एक सामन्यात एकट्यानेच १० षटके टाकली होती. म्हणजेच आज गरज असताना रायुडूच्या स्वरुपात आपल्याला पाचव्या क्रमांकावर एक विश्वासार्ह फलंदाज मधल्या फळीत मिळाला असता आणि रैना तळाला सहाव्या क्रमांकावर धोनीसोबत मोठे फटके खेळू शकला असता.
असे असताना भूवीच्या स्विंग वर विश्वास का ठेवला नाही ? किंवा अक्षर पटेलच्या प्रभावी फिरकीचा ऑप्शन का वापरला गेला नाही? किंवा बिन्नीच्या अष्टपैलू खेळाचा पर्याय का चाचपडून पहिला नाही?
खरंतर रायुडूच्या रूपाने एक अधिक फलंदाज घेऊन रैना आणि इतरांच्या गोलंदाजीचा पर्याय सर्वाधिक उपयुक्त ठरला नसता?
पण बादफेरीत पोहोचल्यावरही उर्वरित दोन सामन्यात वरीलपैकी कोणताही बदल न करून संघव्यवस्थापनाने नक्की काय साधले? ह्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आहे आणि ते म्हणजे भारतीय संघावर असलेला अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा. जी टीम जिंकतेय तिच्यात मुळीच बदल करायचा नाही, ह्या सुपरस्टीशनच्या आहारी कोण गेले होते, ते स्पष्ट व्हायला हवे. आपले आजीमाजी दिग्गज खेळाडूदेखील ह्या अंधविश्वासाच्या जाळ्यात पूर्वापार फसलेले असतात. ह्या सुपरस्टीशनच्या प्रभावामुळेच संघात आवश्यक बदल केले गेले नाहीत, असंच दिसते. संधी असूनही तसा प्रयोगदेखील केला गेला नाही.क्रिकेट हा माईंडगेम, प्रेशरगेम , टेम्परामेंटगेम वगैरे असतो. पण व्यावसायिकता सोडून आपला संघ असा अंधश्रद्धाळू बनला. मग तिथे प्रोफेशनल ओस्ट्रेलियाच्या पुढे असल्या भोंगळ संघाचा कसा निभाव लागणार? अर्थात टीम इंडियाचे संघव्यवस्थापन म्हणजेच कर्णधार धोनी, रविशास्त्री, आदि तज्ञमंडळी ह्या पराभवाचे खरे गुन्हेगार आहेत.
No comments:
Post a Comment