Friday, 30 December 2016

प्रिय रवीशजी...

प्रिय रवीशजी

पता चला कि आप आहत है कि क्यू सोशल मीडियापे आलोचक मोदीजी को चौराहेपे जुते मारने कि बात कर रहे है जबकी मोदीजीके भाषण में जूते का ज़िक्र हि नहीं है. प्रधानमंत्री के लिए ऐसे अभद्र शब्द का उपयोग गलत हि है लेकिन मुझे नहीं लगता कि विरोधकभी 'ट्रोल' बनते जा रहे है.
आपकी बात सही है कि प्रधानमंत्री का बयान अलोकतांत्रिक और सामंती है. हलाकी सोशल मीडियाकि जुतेवाली आलोचना का उगम भी वहींपे है. जहाँ प्रधानमंत्रीजी खुदको चौकीदार कहते है और चौराहे पे सजा देने कि बात करते है.

उनकी अभद्र और हिंसक राजनैतिक भाषाकि बडी लंबी लिस्ट है. जैसेकी मुझे फांसी दे दो..., मुझे थप्पड मार दो..., मुझे लात मार दो..., मुझे गोली मार दो..., मुझे जिंदा जलादो..., इ. इ. इ.
हां, ये सभी हमारे आदरणीय प्रधानमंत्री के हि पिछले अढाई सालके वक्तव्य है. भला चौराहे पे खडा करके और क्या सजा हो सकती है ? उनकीहि लिस्ट कि कोईभी सजा दिजिये या जुते मारिये, क्या फरक पडता है? उनकी अपनी लिस्ट में शायद 'जुते मारने' का बयान ना हो, लेकिन क्या इसे शॉर्ट पब्लीक मेमरीपे छोडना उचित नहीं होगा?

आलोचना का स्तर सामंती है या अलोकतांत्रिक है ये भी सही हो सकता है लेकिन उनकी भाषास्तर का इतिहास कुछ ऐसा रहा है कि जो बोया है वही तो फल पा रहे है ना?

Thursday, 29 December 2016

नोटबंदीतल्या ओव्या

फकीर म्हणे आतां ।
उरलो चाबुकापुरता ॥१॥

सेवक म्हणे आतां ।
उरलो जळणापुरता ॥२॥

Monday, 12 December 2016

भारतीय संरक्षण व्यवस्थेतील भ्रष्ठाचार

"भारतीय संरक्षण क्षेत्राची एकूण उलाढाल लक्षात घेता दरवर्षी साधारण दोन हजार कोटी डॉलरचा भ्रष्टाचार या क्षेत्रात होतो, असे ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या संघटनेने दाखवून दिले आहे."
(आजचा लोकसत्ता अग्रलेख )
सरकारने देशातला काळापैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदीचा निर्णय राबविला असे सांगितले जाते. किमान १ लाख कोटी काळा पैसा चलनातून बाद होईल वगैरे अंदाज वर्तविला जात होता. हा फायदा निश्चलनीकरणाच्या निर्णयातून उद्भवलेल्या आर्थिक अनागोंदीतून होणाऱ्या नुकसानापेक्षा क्षुल्लक आहे, असेही एव्हाना सिद्ध झाले आहे आणि सरकारच्या एकूणच ढिसाळ आर्थिक नियोजनाविषयक अकलेचे जाहीर धिंडवडे निघाले आहेत. असो. त्यानिमित्ताने आणखी काही मार्ग सरकारला सुचवायला हवेत. लोकसत्तेच्या आजच्या अग्रलेखात देशाच्या संरक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारविषयक काही माहिती दिली आहे. हा एक मार्ग सरकारला सुचवायला हरकत नाही. 

काळापैसा खणून काढण्याचे अन्य मार्ग:

१. भारतीय संरक्षण व्यवस्थेतील भ्रष्ठाचार: दरवर्षी सुमारे एक लाख कोटी ते दीड लाख कोटी रुपये एवढा काळापैसा भारताच्या संरक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारातून तयार होतो. इथे एक सर्जिकल स्ट्राईक केला तर काळा पैसा खणून काढण्याच्या सरकाराच्या प्रयत्नांना काही निश्चित यश सहज मिळू शकते.
असे काही आणखी सरकारी क्षेत्रातील मार्ग सुचवायला हरकत नाही. सरकारने नोटबंदीसारखे स्वतः:च्या अक्कलेचे धिंडवडे निघू न देता आणि अगदी सहज स्वतः:च्याच घरातून हि स्वच्छता मोहीम राबवायला काय हरकत आहे ?

Friday, 25 November 2016

नोटबंदीची क्षणचित्रे

ऑफिसच्या खालच्या मजल्यावर बॅंक ऑफ बडोदा... तिथे रोजची तळमजल्यापासून पहिल्या मजल्यावर जिन्यावरून कॉरिडॉर मधून अस्ताव्यस्त पसरलेली लाईन... शेकडो बायाबापडे दिवसभर ताटकळत उभे... मधेच गलबला वाढतो, आवाज टिपेला पोहोचतात...रांगेतली भांडणं ...पुन्हा साळसूद सावरासावर... बॅंकमॅनेजर बाई म्हणजे ब्युरोक्रसीचा नमुना आहे...साडेतीनला व्यवहार बंद... एक शिपाई इमानेइतबारे दरवाजात उभा राहून गर्दी कंट्रोल करायचा निष्फळ प्रयत्न अविश्रांत करतोय... बाजूच्या कंपनीमधला शिपाई कापसेसुद्धा तिथे पोलिसिंगची हौस भागवून घेतो...गर्दीतल्या एकेकाला सरळ करायचा विडाच उचललाय पट्ठ्याने... पहिल्या दोनतीन दिवसांची हजारोंची रांग गेलं दहा दिवस शेकड्यावर येऊन स्थिरावलीय, इतकाच नोंद घेण्यासारखा फरक... मागे बँकेला सुट्टीच्या दिवशी रविवारी सोसायटीच्या सोयीसुविधा म्हणजे सुरक्षा, पाणी तसेच लाईटवाल्या साहेबांशी संपर्क साधून पॉवर वगैरे व्यवस्था लावून दिली...साहेबांचे पैसे लाईनशिवाय बदलून दिले गेले... तीनचार दिवसाआधी रांगेतल्या एकाकडून २७००० रुपयाची रोकड घेऊन रांगेतला दुसरा देशभक्त पळालाय...त्याला सोसायटीच्या सीसीटीव्हीतून शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न निष्फळ झालाय...
(नोटबंदीच्या डायरीच्या पानातून )

Tuesday, 22 November 2016

कथित निश्चलनीकरणाचे फॅक्ट्स अँड फिगर्स


कथित निश्चलनीकरणाचे फॅक्ट्स अँड फिगर्स पाहता आतापर्यंत आलेल्या रिपोर्ट्समधून खालीलप्रमाणे माहिती समोर आली आहे.

  • भारतातील १६.२४ लाख कोटी रुपयांच्या चलनापैकी ८६% चलन (सुमारे १४ लाख कोटी) हे ५०० व १००० च्या नोटांच्या स्वरूपात.
  • (मार्च २०१६ मध्ये ५०० रुपयांच्या १५७० कोटी नोटा तर १००० रुपयांच्या ६३२ कोटी नोटा)
  • ह्या नोटा नव्याने (५००, १०००, २०००, १००, इ. स्वरूपात) छापण्यासाठी सुमारे १ वर्षापर्यंतचा कालावधी लागू शकतो. भारतीय चलन छपाईची मासिक क्षमता सुमारे ३०० कोटी नोटा.) 
  • पैकी ५.४४ लाख कोटी १५ दिवसांत आजपर्यन्त बँकेत जमा.(३१ डिसेंबर पर्यंत किती व्हाईट चलन जमा होईल आणि किती काळापैसा ते सिद्ध होईल.)
  • भारतातील ९०% पेक्षा जास्त (कदाचित ९७% by व्हॉल्युम ) व्यवहार कॅशच्या स्वरूपात.
    (हे स्मार्ट व्यवहार करणाऱ्या १०% मध्यमवर्गाला कसे समजवायचे?)
  • फक्त ६% काळापैसा कॅशच्या स्वरूपात.
    (बाकी ९४% चे काय ?)
  • 'फेक करन्सी'चे प्रमाण ४०० कोटी म्हणजे ०.०२८ %  (१४,१८० बिलियन ५००-१००० नोटांच्या निश्चलनीकरणाच्या) इतकेच. 
  • काळय़ा पैशाची समांतर अर्थव्यवस्था भारतात एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या २२.२ % (२२५० अब्ज रुपये) सुमारे २.२५ लाख कोटी!
  • भारतातील केवळ ३०% लोकसंख्या बँकिंगशी जोडलेली (forget डेबिट कार्ड्स, ATM & इंटरनेट बँकिंग). ग्रामीण भागात बँकिंग परिस्थिती आणखी विपरीत. त्यात जिल्हा बँकांवर सरकारची बंदी!
    (सुमारे ८०% भारतीयांच्या व्हाईट पैशाचे रूपांतरण कसे व्हायचे? त्यासाठी दैनंदिन ४००० ते ४५०० ते २००० अशी मर्यादा आहेच.)
  • देशात बँकांच्या १,३४,००० शाखा आणि २,१५,००० एटीएम यंत्रे आहेत...अगदी एखाद्या बँक शाखेत किंवा एटीएम यंत्रासमोर तरी रोज ११ कोटी लोकांना नोटा बदलण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहावे लागले. त्याचा उत्पादनावर व उत्पादनशीलतेवर काय परिणाम झाला असेल?... नोकरी करणाऱ्या लोकांपकी ३३% रोजंदारी कामगार आहेत. त्यांची संख्या अंदाजे १५ कोटी आहे. अचानक त्यांना काम मिळणे बंद झाले. त्यांना कामावर ठेवणाऱ्यांकडे पैसे नव्हते... - माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम
    (रांगेत उभे राहणाऱ्या कोट्यावधी लोकांचे लाखो कोटी मॅन-अवर्स वाया चाललेत... ह्याचे अर्थकारण कोण तपासणार?)
  • २०१५ मध्ये फक्त १.३५ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली जो सात वर्षातला नीचांक आहे- मा. राष्ट्रपती
    ( आधीच मंदीच्या आर्थिक संकटात सापडलेल्या रोजगारनिर्मितीचे पुढे काय होणार?)
  • एकट्या राजस्थानमध्ये निश्चलनीकरण निर्णयाच्या २ महिन्यांत उद्योगक्षेत्रात १ लाख कोटींचा तोटा अपेक्षित आहे- अनुराग शर्मा, Federation of Rajasthan Trade and Industry (Forti)
    (भारतात एकूण अर्थव्यवस्थेला किती लाख कोटींचा मोठा फटका बसेल???)
(...संकलित... This information is a collection of facts and figures available from few articles published over last 15 days of Demonitization. )

Wednesday, 9 November 2016

आमच्या बॅचच्या गेटटुगेदरची गोष्ट.


आमच्या  बॅचच्या गेटटुगेदरची गोष्ट.

1991. लोकनायक जयप्रकाश विद्यालय अगरवाडी शाळेची आमची 10 विची बॅच. आज बरोब्बर 25 वर्षे पूर्ण झाली. म्हणजे रौप्यमहोत्सवच... बरीच वर्षे आज भेटू उद्या भेटू म्हणता तसाच मागे पडलेला हा योग. तो आज जुळून आला. 6 नोव्हेंबर 2016... व्हाट्सएप च्या ग्रुपच्या माध्यमातून सारेजण एकत्र आले आणि ह्या स्नेहसंमेलनाची तयारी झाली. 1985 ते 1991 अशी जी सहा वर्षे ह्या मित्रमैत्रिणींसोबत गेली ती आयुष्यातली सर्वोत्तम 6 वर्षे आहेत असं माझे ठाम मत आहे. किंबहुना मी स्वतः:ला त्याच सहा वर्षातला आजही समजतो.

सफाळ्याच्या माहेर  रिसॉर्टवर हे संमेलन पार पडले. कार्यक्रमाची काहीएक रूपरेषा आखली होती. पण पंचवीस वर्षांनी पहिल्यांदाच भेटत असल्याने मनोगते व्यक्त करताना पूर्ण दिवसहि अपुरा पडला आणि तरीही हा एक अविस्मरणीय असा कार्यक्रम घडून गेला.

विनोद, चेतन, उमेश हे आमचे जिवलग मित्र ह्या पंचवीस वर्षात काळाच्या पडद्याआड निघून गेलेत. सुरुवातीला त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून सर्व मित्रमैत्रिणींनी श्रद्धांजली वाहिली.

आमच्या वर्गमैत्रिणींपैकी फक्त 11 जणी उपस्थित होत्या. पण त्यातली गम्मत अशी कि त्यांचा तो आवाज , हसणं-खिदळणं ईतके ओरिजिनल होतं कि जणू 25 वर्षांपूर्वीचा आमचा वर्ग भरलाय कि काय असा माहोल तयार झाला होता. विद्या, रत्नप्रभा, वंदना, तृप्ती, सुनंदा, मेघना, प्रतिभा, रोशन, हरिता, हंसा, वंदना, प्रणोती, इत्यादी मैत्रिणी त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे येऊ शकल्या नाहीत. पण आलेल्या 11 जणींनी किल्ला व्यवस्थित लढविला. कारण एकतर आमच्या ह्या वर्गात मुले विरुद्ध मुली असा उभा सनातन संघर्ष होता. अर्थात आता तो अस्तित्वात नाही... :)

मुली जवळजवळ सर्वच जणी पदवीधारक आहेत आणि साधारणतः: एकाच प्रकारच्या जीवनशैलीत मग्न झाल्याचे चित्र आहे.
जयंती (जयू) शिक्षण पूर्ण करून सध्या गृहिणीची जबाबदारी पार पडतेय.
माधवी एका शाळेची मुख्याध्यापिका आहे आणि अलीकडेच तिला शिक्षणक्षेत्रातील एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (y)
रेखा तिचं  शिक्षण पूर्ण करून सध्या आपल्या गृहिणीचा रोल निभावत आहे. तिच्या सौंदर्याच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा बंटीने उलगडून काढल्या. :)
मेघा सुद्धा आपले शिक्षण पूर्ण करून सध्या गृहिणीच्या भूमिकेत रममाण झालीय.
तनुजा शिक्षिका आहे आणि आपल्या संसारात रमलीय. प्रकृती ठीक नसतानाही ती आग्रहाने आली आणि ज्या हजर नव्हत्या त्यांची आता मोजून हजेरी घेतेय. :D
प्रीतीने शिक्षण पूर्ण झाल्यावर आधी एडिटिंग मध्ये आणि सध्या शिक्षणक्षेत्रात आपली कारकीर्द घडविली आहे.
अमिताने शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या कौटुंबिक जाबदारीत स्वतः:ला वाहून घेतलंय.
वैशालीने उच्च शिक्षणाचे आव्हान स्वीकारून ते पूर्णही केले व सध्या आमच्याच शाळेत शिक्षिका आहे. मीनाने स्वतः:चा व्यवसाय सुरु करून  तो यशस्वीरित्या चालवून दाखविला आणि आज ती सेवानिवृत्ती घेऊन घरी बसलीय हा एक रेकॉर्डच आहे.  संपूर्ण कार्यक्रमात मीना आजही तिच्या खास शैलीतल्या विनोदबुध्दीसह हशा पिकवीत राहिली, हेही ओरिजिनलच. :p
प्राची म्हणजे आमच्या वर्गातील अत्यंत मितभाषी शांत बाहुलीच. तिची निरागसता आजही इतकी हळवी कि तिच्या बिगशॉट फॅमिलीची ओळख शेवटी आमच्या सूत्रसंचालकाला स्वतः:हुन करून द्यावी लागली. :)
अस्मिता मुबंईत नोकरी करतेय आणि सर्वात उशिरा का होईना पण ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून आली. म्हणून तिला अध्यक्षीय भाषणाची जबाबदारी दिली गेली. :D   तिनेहि आपल्या त्याच लाघवी आवाजात मूळच्या लकबीसह सर्वांचा विश्वास सार्थ ठरविला. :)
दुपारी एकत्र जेवण करताना कधीकाळी शाळेतली वनभोजने आठवून गेली. आमच्या मैत्रिणी एकत्र टेबलवर हसतखेळत इतक्या एन्जॉय करीत होत्या कि हे संमेलन सर्वार्थाने यशस्वी झाल्याची ती पावतीच जणू!


शाळेतील दोन आघाडीचे विद्यार्थी म्हणून समीर आणि माझा उल्लेख होत असे. शाळेनंतरच्या काळातील उच्चशिक्षणासाठीचा संघर्ष आणि नोकरी-व्यवसाय ह्यामध्ये आपापल्या क्षेत्रात केलेली धडपड ऐकण्यासारखी होती. समीर रसायनशास्त्रातील पदवीधर असून त्याने टेक्स्टाईल आंतरराष्ट्रीय मार्केटिंग मध्ये स्वतः:चा जम बसविला आहे. माझा स्वतःचा प्रोसेस ऑटोमेशन मध्ये व्यवसाय आहे. आम्हा दोघांच्या शालेय जीवनातील अभ्यासातील स्पर्धेच्या आठवणींना सर्व मित्रांनी पुन्हा उजाळा दिला. आजही समीर आणि राकेश ह्यांच्यातील दोन दशकांपूर्वीची ती स्पर्धा मित्रांनी आठवणीत कायम जपून ठेवली आहे हे अचंबित करणारे होते. पुन्हा पुन्हा त्या स्पर्धेचा उल्लेख ह्या भेटीत अनेक मित्रांनी केला. समीरने एका मार्कांसाठी गणिताच्या मिस्त्रीसरांशी घातलेला वाद माझ्या स्मरणात नाही, समीरच्याही नसेल. पण आमच्या मित्रांनी त्या स्मृती जपलेल्या आहेत. आमच्यातले जे आज शिक्षणक्षेत्रात आहेत ते राकेश-समीरच्या अभ्यासाच्या आणि चढाओढीच्या कथा आजहि त्यांच्या विद्यार्थ्यांना ऐकवितात, हे मात्र खूप थोर आहे ! :)

बंटीने (हरेंद्र) एकूणच संमेलनाच्या आयोजनात सिंहाचा वाटा उचलला. त्याचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाहून आमच्या मैत्रिणींना आदेश भाऊजींची आठवण झाली, नव्हे 'आदेश बांदेकरच बंटीची कॉपी करतो' हेहि प्रतिमने आवर्जून नमूद केले. :) बंटीच्या मनोगतातून एकेकाळी वर्गातील मागच्या बेंचवर बसणाऱ्या खोडकर प्रवर्गातील आमच्या मित्राला पुढील शिक्षणासाठी किती संघर्ष करावा लागला हे समजले. शिक्षक व्हायची त्याची मनीषा पूर्ण झाली नाहीच; पण त्या संघर्षाच्या काळात परिस्थितीसमोर  आपल्या प्रेमसंबंधाचाही त्याग करावा लागला, हे चुटपुट लावणारे होते. पण आज तो त्यावर मात करून उसरणी गावाचा सरपंच झाला आहे आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे, हे त्याचे यश अभिमानास्पद आहे!

शिक्षक होण्याची इच्छा असलेला उल्हास आज एका सीए फर्म मध्ये यशस्वी कारकीर्द घडवतोय. शिक्षणक्षेत्रात येण्याचं त्याचं स्वप्न होतं. पण मुलाखतीत ठाणे जिल्ह्याची माहिती इंग्रजीत वर्णन करायला सांगणाऱ्या कुणा एका अधिकाऱ्याने ते पायदळी तुडविले होते. आपल्या शिक्षणक्षेत्रात कसले येडxx कलाकार भरले आहेत, त्याचं हे उदाहरण. कारण इंग्रजी हा काही उल्हासचा विषय नव्हता. पण उल्हासाचे सुरुवातीचे भाषण आणि मनोगत ह्या दोन्हीमध्ये त्याचे प्रेझेंटेशन केवळ पाहण्यासारखे होते.

एकूणच देश बंटी आणि उल्हास ह्या दोन उत्तम शिक्षकांना मुकला, एवढंच.  :(

वेढीचा अरुण पाचवीपासून ते दहावीपर्यंत माझ्याच बेंचवर बसत असूनही त्याला 25 वर्षानंतर मी ओळखू शकलो नाही हे विस्मयकारक होते. अपंगत्वार मात करून आज तो गावातल्या ग्रामपंचायतीत संगणक ऑपरेटरची नोकरी करतो. सरकारी नोकरी मिळाली नाही हा त्याच्या मनातला सल त्याने व्यक्त केला. परंतु आजहि अरुण आमच्यासोबत त्याच जिद्दीने सामील आहे, ह्यातच मला एक  प्रेरणादायी यशोगाथा दिसली. अरुणच्या व्हीलचेयरसोबत पळणाऱ्या मुलांपैकी वेढीचा दीपक उपस्थित नव्हता.

दीपेश म्हणजे शाळेतला एक भन्नाट उपद्व्यापी कलाकार. :)  दीपेशच्या जीवनातील चढउतार आणि त्यातून आज त्याने प्राप्त केलेले सुयश हेदेखील श्रवणीय होते. आमच्या व्हाट्सएप ग्रुपची स्थापना करण्यात त्याचा पुढाकार आहे. त्याचा रिअल इस्टेट आणि सामाजिक क्षेत्रातला चढता आलेख वाखाणण्याजोगा आहे.

दीपेश सोबतच आठवीत आमच्या वर्गात आलेला दुसरा एक एडवणकर म्हणजे संजय. त्याने आल्या आल्या कोणाकोणाला कोणत्या टोपण नावाने चिडवीत त्याचा घोष लावला होता. :D  कदाचित त्याचा सर्वात ज्यास्त फटका त्याला बसला असावा. ;) तसेच कधीतरी आमची झालेली भांडणे, मारामाऱ्या वगैरेच्या स्मृती त्याने उजळून काढल्या. सध्या तो त्याच्या आवडीच्या रेफ्रिजरेशन क्षेत्रात उद्योग करतो. त्याचं क्रिकेटर होण्याचे मनोरथ अपूर्ण राहिले तरी आज तो एमसीएचा पंच म्हणून क्रीडाक्षेत्रात कार्यरत आहे, हे काही कमी नाही.

सफाळ्याचा प्रशांत म्हणजे वर्गातील स्टार कलाकार. प्रशांत आमच्या वर्गात तसा उशिराच  आला आणि तेवढ्यातच सफाळे रेल्वे स्टेशनांवरून त्याचं अपहरण झाल्याची आठवण निघालीच. त्यातून त्याने  स्वतःच सुटका करून घेतली होती आणि योगायोगाने 'किडनॅप्प्ड' नावाचा एक धडा त्यावर्षी इंग्रजी पुस्तकांत होता...  त्याच्यासारख्या  व्हायब्रण्ट माणसाने एकाच नोकरीत टिकून राहणे म्हणजे नवलंच. :) पण आज तो कारकिर्दीत यशस्वी आहे. प्रीतमसह,  तो व इतर मित्र मिळून विरारमध्ये समाजकार्यातही अग्रेसर आहेत, हे उल्लेखनीय.

प्रीतम, प्रशांत, निलेश, जयप्रकाश हे आमचे चटाळे गावचे शिलेदार. जयप्रकाश शिक्षक आहे आणि त्यासाठी अत्यंत विपरीत स्थितीही त्याने शिक्षणासाठी दिलेला  स्फूर्तिदायक लढा ऐकला. प्रशांत एसटीत नोकरीला आहे आणि आपल्या वडिलांच्या सफाळे बाजारातील दुकानाचे रूपांतर एक मोठ्या शोरूम मध्ये करण्याचा त्याचा मानस आहे. निलेश आणि प्रीतम दोघेही सरकारी नोकरीत सुस्थित आहेत. निलेश आणि त्याच्या  पत्नीने मिळून कॅटरिंग चा व्यवसायही भरभराटीस आणला आहे. राजेशनाना माझा जिगरी दोस्त काही घरगुती कारणामुळे येऊ शकला नाही. तसेच अमोल, संदीप, विपीन, उपेंद्र, प्रवीण, रविकांत, उमेश, मनोज असे अनेक चटाळेमधले सवंगडी ह्यानिमित्ताने आठवले. ते पुढच्या वेळी नक्कीच भेटतील अशी आशा आहे.

धर्मा फक्त 10 वि पर्यंत शिकू शकला आणि पुढे गार्डनिंगच्या कामात गुंतून गेला. वनखात्याचा आलेला कॉल त्याच्या आईने झोपडीच्या झावळीत ठेवला आणि बाहेरगावी गेलेला धर्मा परत आला तोपर्यंत ती संधी हुकली होती, हे नेहमीच्या हसतमुख स्टाईलमध्ये धर्मा बोलून गेला. पण हे अत्यंत वेदनादायी होतं... :(

अनिल सुद्धा शिक्षण सोडून नोकरीच्या मागे लागला आणि सध्या आपल्या कुटुंबासह समाधानाचे आयुष्य जगतोय. अनिल, धर्मा इत्यादी तत्कालीन तगड्या मित्रांच्या भरवश्यावर आमच्या  'अ' वर्गाचा स्पोर्ट्समध्ये शाळेत निभाव लागत असे, हे मान्यच करावे लागेल!

तिघऱ्याचा महेश सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांच्या एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यभार संभाळतोय. हे प्रशंसनीयच आहे. विळंगीचा अजय रेल्वेमध्ये नोकरी करतोय आणि नेहमीप्रमाणे आनंदीच दिसला.

अंबोड्याच्या सुधीर तांबेची भेट राहून गेली. तसेच विळंगीचा अनिल, तिघऱ्याचे परशुराम व नीलकंठ,  आगरवाडीतील गणेश, नीलकंठ, हंजारीमल, मनोहर व कमलेश, नगाव्याचा किशोर, उसरणीचा रमेश, डोंगऱ्याचा संतोष, वेढीचा दीपेश, खार्डीचे संदीप-विलास, दातिवऱ्याचे किशोर, सुरेश व विलास, दांडाखाडीचा अस्लम, मायखोपचे रघुनाथ व अनिल,  इत्यादी मित्र काही कारणांनी संमेलनाला येऊ शकले नाहीत. पण ह्या संमेलनाच्या यशानंतर हे सवंगडी पुढल्या वेळी नक्कीच भेटतील अशी खात्री आहे.

भूषण आयटी क्षेत्रात सॉफ्टवेअरमध्ये अग्रेसर आहे. कॉमर्सचा विद्यार्थी असूनही त्याने सेल्फस्टडीच्या जोरावर आयटी क्षेत्रात मोठी भरारी मारलीय, ती प्रेरणादायी आहे. काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडियातून समाजकार्य करण्याची त्याची मनीषा आहे.

प्रतिम सुद्धा आयटी क्षेत्रातच  इन्फ्रास्ट्रक्चर आणि हार्डवेअर क्षेत्रातील तज्ञ  आहे. सध्या एका बँकेचा  आयटी मॅनेजर असून शक्यतो लवकर निवृत्त होऊन जास्तीत जास्त वेळ गावाकडे देऊन काही भरीव समाजकार्य करण्याच्या विचारात आहे.

सुधीर आमच्याच शाळेत अध्यापक आहे . तसेच शिक्षणक्षेत्रातील समुपदेशनामध्ये एक उत्कृष्ट व्याख्याता म्हणून त्याचा नावलौकिक आहे.  राजेश हा आणखी एक मित्र आमच्या शाळेतच शिक्षक म्हणून कार्यरत आहे, पण तो काही कारणाने हजर राहू शकला नाही.

सुभाषने अनेक अडचणींवर मात करून आणि आपला नोकरीधंदा सांभाळून स्वतः:चे प्रेमप्रकरणही यशस्वी करून दाखविले. अर्थात त्यासाठी प्रसंगी कराटे-कुंगफू वगैरे शिकायची तसदी घेतली हेदेखील थोर आहे! ;) आपली बायको 'बसून राहू नये' म्हणून तिला एका पाठोपाठ एक असं चारपाच वेगवेगळे करियर क्लासेस लावून देण्याची त्याची आयडियाहि भन्नाटच! :D

उसरणीच्या हेमंतने स्वतः:चा व्यवसाय उभा केला आहे आणि अर्थातच त्यात तो खूप समाधानी दिसला. विपेंद्र सुद्धा कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यबस्थापक पदावर कार्यरत आहे. त्याची शाळेतली सुम्म लव्ह स्टोरी आणि त्यासाठीचा 13 वर्षाचा प्रदीर्घ प्रतीक्षा काळ, हा एक नमुनाच!  :)

शाहआलम शेवटच्या बेंचवर बसणार आमचा मित्र. अत्यंत सुस्वभावी आणि मेहनती माणूस.  आज आखातीदेशात कुवैत इथे स्वतः:चा फर्निचरचा व्यवसाय यशस्वीरीत्या चालवतोय. म्हणजे तो आमच्या बॅचचा अनिवासी भारतीय उद्योगपतीच! शाहआलम कुवैतसे (y) :D

बंटीच्या आदेश बांदेकर फेम सूत्रसंचलनामध्ये सुभाष आणि संजयने मनोगत व्यक्त करणाऱ्यांना  काही मार्मिक प्रश्न  विचारून,  खोचक टिप्पण्या करून लै मजा आणली. :) उदाहरणार्थ, प्रीती म्हणाली कि तिला कोणी ओळखेल कि नाही अशी शंका होती. त्यावर सुभाषने लगेच "तुला कदाचित ओळखले नसते पण तुझ्या गालावरच्या खळ्या (त्याच्या शब्दांत 'खड्डे') कसे विसरणार?"  अशी कोटी केली आणि एकंच हास्यकल्लोळ उडाला. :D

संध्याकाळी सर्वांना आपल्या घरी सोडण्याची व्यवस्था पार पडल्यावर उरलेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी व्यवस्थापकीय समितीचे मेंबर्स श्रमपरिहारासाठी 'बसले'. ;)  तेव्हा '91's 90s' ;) नावाची एक कोअर कमिटी बनवून  पुढील संमेलनाच्या रूपरेषा ठरविण्यासाठी लवकरच काही बैठका घेण्याचा निर्णय रात्री उशिरा जाहीर करण्यात आला ! ;) :) :D 


35 मित्र मैत्रिणींची मनोगते ऐकताना 91 नंतरचा 25 वर्षांचा काळपट समोर उलगडत होता.
25 वर्षे...? काळ कसा झर्रर्रकन निघून गेला हे सर्वांनाच कोड्यात टाकणारे होते. उदाहरणार्थ, तनुजा म्हणाली कि तिचा मुलगा आठवीत आहे, म्हणजे 13 वर्षांचा झालाय. पण मी तर तिच्या लग्नाला फक्त पाच-सहा वर्षांपूर्वीच गेलो होतो कि काय असेच आज वाटतेय. हा 25 वर्षांचा मध्यबिंदु पकडला तरी आधीची निम्मी वर्षेही तशीच झपाट्याने पळून गेली. सर्वजण फोटोसाठी एकत्र जमले तेव्हा मात्र कधीकाळी ताडमाड भासणारे धर्मा आणि अनिल उंचीने कमी झाले कि काय असे वाटावे , इतका फरक इतरांच्या उंचीत नक्कीच पडल्याचे जाणवले, हाच काय तो काळाचा महिमा! :D

एकूणच साऱ्यांच्या मनोगतातून पुढच्या शिक्षणातील संघर्ष, नोकरी-धंद्यातील धडपडी, चढउतार, यश-अपयश ह्यांचा धागा समान जोडलेला दिसला. वैयक्तिक आयुष्यातही अनेकांनी चढउतार अनुभवले. काही प्रेमप्रकरणे फलद्रुप झाली तर काही काळाच्या ओघात मागे पडली. त्यातले काही वीरमहारथी सपाटून आपटले तर काही सुमडीतकोंबडी मैदान मारून गेले. ;)  कुणाची लग्नें उशिरा झाली तर कुणाची झटपट 10 वि 12 वि मधेच, तर कुणाचे संसार मोडून ते पुन्हा उभे राहिलेत.... कुणाची मुलं कॉलेजात तर कुणाची अजून नर्सरीत... कुणाच्या जीवनात शेवटच्या क्षणापर्यंत टोकाची पातळी गाठली गेली. पण त्या अंतिम रेषेला स्पर्श करून ते सुखरूप  परतले. (y)  आमचे तीन मित्र मात्र त्या रेषेपलीकडे कायचमचे मार्गस्थ झाले, त्यांच्या स्मृती नेहमीच हुरहूर लावतील.  :( 
...परंतु ह्या जीवनसंघर्षातून तावून सुलाखून आज प्रत्येकजण ताठ मानेने आयुष्याच्या लढ्याला पुरून उरलाय, एवढेच काय ते खरे! आमच्या मित्रमैत्रिणींच्या जीवनानुभवांची 35 समृद्ध पाने... यशापयशाचे माप प्रत्येकाच्या पदरात कमीअधिक प्रमाणात पडले असेल, परंतु एक मात्र निश्चित कि प्रत्येकाचे पाय आजही जमिनीवरच ठाम आहेत. ... आणि 25 वर्षांनीही मैत्रीचा हा धागा अधिक प्रगल्भ आणि व्यापक करीत त्याला सामाजिक जाणिवेचा आशय देण्याचा मानस सर्वांचाच आहे हे अधिक महत्वाचे. पुन्हा एकदा शाळेत 'माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण' असा निबंध लिहायची वेळ आलीच तर ह्या स्नेहसंमेलनावर तो लिहिला जाईल, नाही का?

तुम्ही जिंकलंत रे मित्रांनो आणि मैत्रिणींनो! 91 बॅच रॉक्स...! (y) (y) (y)

Saturday, 29 October 2016

बलिप्रतिपदा हा बळीराजाचा उत्सव..

 बलिप्रतिपदा हा बळीराजाचा उत्सव...महान असुर संस्कृतीचा पुरातन उत्सव. त्याचा आढावा घेणारा हा एक लेख.

आजही ग्रामीण भागात जिथे सांस्कृतिक आक्रमण फारसे घडलेले नाही अशा दुर्गम आगरी खेड्यातील बलिप्रतिपदा कशी असते? त्याचे हे चित्रण आधी समजून घ्या...
भल्या पहाटे घरोघरी बळीपूजेची लगबग चालू होते. प्रत्येक घरातील केरकचरा जमा करून तो टोपलीत भरून रात्रीच तयार असतो. गावातील उत्साही मुलेदेखील अंघोळी करून कचरा नेऊन टाकायला घरोघर फिरतात. त्यांच्यासाठी फटाके, पैसे, खाऊ टोपलीसोबत तयार असतो. घरातील गृहिणी त्यापैकी एका मुलाला बोलावून आणते आणि तो कचरा घेऊन बाहेर पडतो. त्यावेळी त्या ठरलेल्या ओळी त्याच्या तोंडातून बाहेर पडत असतात...
"आरजो पिरजो
खैन जाय, खोकला जाय
आप जाय, ताप जाय
बळीराज्य... "

हा असा बळीमहिम्याचा उद्घोष करीत गावातील मुले गल्ल्याबोळातुन घराघरातून कचरा जमा करून तो गावाबाहेर जमा करतात. सकाळी प्रत्येक घराच्या पायरीजवळ महात्मा बळीची पूजा मंडळी जाते. त्यासाठी एका मोठ्या तांब्या पितळेच्या कलशात नारळ ठेवून त्याला हळदी कुंकू वाहिले जाते. त्यावर तीन काड्या रोवून त्यात रोजाची (झेंडू) फुले खोवली जातात. खाली नवे कापड मांडलेले असते. चारी बाजूला शेणाचे चार गोळे मांडून त्यातदेखील रोजाची फुलांच्या काड्या रोवून सुशोभित केले जातात. सभोवती पणत्या तेवत असतात. सोबत लामणदिवा वगैरे असेल तर उत्तम. त्यात रांगोळीची आरास एकूणच बळीपूजेची शोभा वाढवते.

शेतकरी कृषक आगरी समाज आपल्या पुरातन संस्कृतीच्या ह्या महान सम्राटाला बळीराजाला ह्या बलिप्रतिपदेच्या दिवशी मनाचा मुजरा करतो. दुसरीकडे घरातील सारी हत्यारे अवजारे, कोयते-कुऱ्हाडी-विळे इ. बाहेर काढून त्याची पूजा होते. त्यांना साफसूफ करून गेरूची लालशेंदरी बोटे लावून शस्त्रपूजा सिद्ध होते... बैल हा तर शेतकऱ्यांचा जीव कि प्राण. त्याला देखील बळी उत्सवात मनाचे स्थान आहे. बैलांना छान सजवून आणि त्यांच्या शिंगे गेरूच्या लालशेंदरी रंगाने रंगवली जातात. घराच्या बाजूला एव्हाना पेंढा वगैरे पेटवून आग लावलेली असते. त्यावरून लहानथोर सारे उड्या मारून एकप्रकारे अग्निपूजाही पार पडत असतात. ह्या आगीवरून उड्या मारण्याच्या परंपरेत बैलांचाहि समावेश असतोच! नव्या वर्षाचा स्वागताचा हा असा एकूण कार्यक्रम असतो. त्यात बळीराजाच्या महात्म्याचे अनन्यसाधारण असे स्थान आहे.

तर असा हा पुरातन परंपरेतील बळीउत्सव. आपल्या महान बळीराजा सम्राटाची हजारो वर्षे घराघरातून जपलेली स्मृती. म्हणजेच बलिप्रतिपदा. महान असुर संस्कृतीचा उत्सव. कार्तिक शु. प्रतिपदा ही बळीच्या स्मृतिप्रीत्यर्थ बलिप्रतिपदा म्हणून साजरी केली जाते.  तसेच  बळीराजा  आपल्या प्रजेला भेटावयास पृथ्वीवर परत येतो म्हणून आश्विन महिन्याच्या शुक्लपक्षात केरळमध्ये 'ओणम्' नावाचा सण साजरा केला जातो.

आता जरा ह्याचे सांस्कृतिक दृष्ट्या विश्लेषण पाहूया...

दशावतारात किंवा पुराणातील कथा म्हणते कि बळी नावाचा बलाढ्य, प्रजाहितदक्ष आणि दानशूर राजा होता. त्याने सारी पृथ्वी जिंकली आणि स्वर्गदेखील त्याच्या अधिपत्याखाली गेला . तेव्हा सारे देव विष्णूकडे गेले आणि विष्णूने बटू वामनाचा अवतार घेऊन बळीराजाकडे तीन पावलांची भूमी मागितली. हे दान देऊ नये म्हणून शुक्राचार्य झारीत जाऊन बसले होते. पण दानशूर बळीने वामनाला दान दिले आणि त्याने दोन पावलांत पृथ्वी आणि आकाश व्यापले. तिसरे पाऊल बळीराजाच्या शिरावर ठेवून त्याला पाताळात धाडले अशी हि पुराणकथा. पुराणकारांचे मिथ्थककथा बनविण्याचे आणि त्यातून आपली विचारधारा लादण्याचा हव्यास लक्षात घेतला तरी बळीराजा श्रेष्ठ महायोद्धा सम्राट होता आणि त्याच्या राज्यात  प्रजा अत्यंत सुखी होती, हे स्पष्ट दिसते.

आता बळीराजाचा साधारण इतिहास आणि भूगोल पाहू या. बळी हा प्रल्हादाचा नातू व विरोचनाचा मुलगा होय. प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपूचा नरसिंह अवतारात आणि काका हिरण्याक्ष ह्याचा वराह अवतारात  विंष्णूने संहार केला अशीही पुराणकथा आहे. ते दोघेदेखील महाबलाढ्य आणि पृथ्वी व स्वर्ग ह्यांवर सत्ता गाजविणारे होते, हे पुराणकथाकारही मान्य करतात. बळीचा पुत्र बाणासुर ह्याची कन्या उषा हिचा विवाह कृष्णाचा नातू अनिरूद्धशी झाला होता. ह्या साऱ्या असुर राजांना शंकराने वर देऊन अपराजित बनविले होते असे पुराणे म्हणतात. म्हणजेच ते सारे असुर राजे हे शिवभक्त होते, लिंगपुजक किंवा मूर्तिपूजक होते हेदेखील दिसते. ते यज्ञविरोधक किंवा यज्ञविध्वंसक होते हे देखील  स्पष्ट आहे. ह्याचमुळे वैदिक धर्मीय ह्या असुरांच्या विरोधात होते. कारण वैदिक धर्मात मूर्तिपूजा, लिंगपूजा मान्य नाही आणि शिवशंकर हा त्यांचा देव नाही. त्यामुळे देव-असुर संघर्ष जो वैदिक साहित्यात दिसतो तो अर्थातच असुरविरोधी सांस्कृतिक संघर्ष आहे, असुर संस्कृतीला बदनाम करणारा आहे, हे सिद्ध होते.

बळीची घटना भृगूकच्छमध्ये (भडोच) घडली म्हणजे तो तेथीलच असावा असा एक अंदाज वर्तवला जातो व त्रिपाद भुमीची घटना घडल्यावर तो केरळात गेला असेही मानण्यात येते. महाबलीपुर ही त्याची राजधानी होती.  केरळमधील लोक आजही बळीला आपला राजा मानतात. कन्याकुमारीच्या दक्षिणेस कित्त्येक कोसांवर समुद्रात घुसलेल्या भुशिरावर बळीची राजधानी होती व नैसर्गिक उत्पातात महान बळीची राजधानी समुद्रात बुडाली असे उल्लेख प्राचीन तमिळ वाड्मयात येतात. शतपथ ब्राह्मणात वर्तमानकालीन देश म्हणून प्राच्य देश व लोकांचा उल्लेख येतो. निर्वासित वैदिक लोक भारतात आले तेंव्हा ते कुरु-पांचाल विभागात वसले व धर्मप्रचार  सुरु केला. प्राच्य देशात असूरांची राज्ये असून ते यज्ञ करत नाहीत व  त्यांचे स्वत:चे पुरोहित असल्याने वैदिकांनी प्राच्य त्याज्ज्य मानली. हा प्राच्य देश म्हणजे आजचे बिहार व त्यापलीकडील पुर्वेचा प्रदेश. वैदिकांना तेंव्हा तो भुगोल माहितच नव्हता. महाभारतात या भागांतेल अंग, वंग, कलिंगादि पाच राज्यांचा उल्लेख आला आहे व ही पाचही राज्ये बळीच्या त्याच नांवाच्या पुत्रांनी स्थापन केली असा उल्लेख आहे. त्यामुळे या प्रदेशाला "बालेय क्षेत्र" असे नांव होते. त्यामुळे असूर ही कविकल्पना न मानता ती खरीच वेगळ्या संस्कृतीची माणसेच होती असे मानावे लागते. असे प्राचीन संस्कृतीचे अभ्यासक आणि संशोधक संजय सोनवणी म्हणतात.

थोडक्यात असुर हे लिंगपुजक शिवभक्त असून प्राचीन भारतात त्यांचे सामर्थ्यशाली व लोकप्रिय राज्य अस्तित्वात होते एवढेच तात्पर्य निघते. हे असुर वैदिकधर्मियांना, यज्ञपूजकाना  थारा देत नसल्याने त्यांच्यात असलेला सांस्कृतिक संघर्ष पुराणकथांमध्ये प्रतिबिंबित झाला आहे, एवढेच.

असुर नावाचा जो महान वंश जगभर प्रसिद्ध आहे त्या 'असुर' शब्दालाही  ह्या संघर्षात बदनाम करून  टाकले गेले. असुर संस्कृतीचे अवशेष आज जगभर विखुरले आहेत. 'असिरीयन' संस्कृती अभ्यासून पहाता तेथील सर्व राजे स्वत:ला अभिमानाने असुर म्हणवून घेत असत. 'असुर' नावाचे शहर आजही अस्तित्वात आहे. झोरोष्ट्रीयान (पारशी) धर्मात अहूर (असुर) माझ्दा हे मुख्य दैवत मानले आहे.
भारतातही असुर संस्कृतीचा प्रचंड प्रभाव आहे. हिरण्यकश्यप, महिषासुर, रावण, बळी, नरकासुर ह्या असुरांचा पराक्रम तर देव-देवतानाहि पुरून उरला होता. खुद्द वैदिकांच्या ऋग्वेदात इंद्र, वरुण इत्यादी त्यांच्या देवताना 'असुर' अशा आदरार्थी नावाने संबोधिले आहे. नंतरच्या काळात मात्र  'असुर' वंश जाणीवपूर्वक बदनाम  केला गेला! ज्या बळीराजाची आपण आजही दरवर्षी पूजा करतो आणि "बळी राज्य येवो" अशी भल्या पहाटे गर्जना करतो त्या बळीराजाला विष्णूचा वामन अवतार पाताळात धाडतो किंवा त्याचा संहार करतो अशी वैदिक कथा रचून बळीचे महात्म्य भ्रष्ट करण्याचा प्रयत्न झाला हेच दिसून येते.

"बळी आजहि सर्व भारतीयांचा अधिराज आहे. त्याचा कोणी खून केला, पाताळात गाडले वगैरे वैदिकांनी आपले माहात्म्य वाढवण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. पण त्या वामनाची कोणी पुजाही करत नाही. बळीराजावर एकही महाकाव्य नाही. बळीचे पुराणही नाही. नाटक-खंडकाव्येही नाहीत. वामनाच्या नांवे मात्र संपुर्ण पुराण आहे, पण या देशात तो काही केल्या वंदनीय झाला नाही. बळीएवढी अपार लोकप्रियता भारतीय जनमानसात कोणाचीही नाही हेही वास्तव आहे. एवढी कि दिवाळीचा नुसता एक दिवस त्याला दिला आहे असे नव्हे तर नववर्षारंभच बळीच्याच नांवाने होतो. सात चिरंजीवांपैकी त्याला एक मानले जाते. हा एक चमत्कार आहे. असूर संस्कृतीचे अवशेष बळीच्या स्मृतीने कालजेयी ठेवले आहेत.  किंबहुना बळीराजा हा भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप बनून बसला आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही." ह्या संजय सोनवणींच्या विश्लेषणाशी मी सहमत आहे. 

अर्थात, वामनाने बळीराजाला पाताळात धाडले किंवा विष्णूने वामनावतार घेऊन बळीराजाला ठार केले वगैरे केवळ भाकडकथा आहेत. वैदिकांनी असुर संस्कृतीवर केलेले सांस्कृतिक पोथीहल्ले इतकेच त्याचे स्वरूप. सामान्य लोकांनी मात्र आजवर हजारो वर्षे परंपरेतून आपल्या पुरातन संस्कृतीचे आणि महान बळीराजाच्या स्मृतींचे जे जतन करून ठेवले आहे, त्यापुढे वैदिक पोथीपुराणे ह्यापुढे टिकणार  नाहीत, हेच स्पष्ट होते.  तसेच " आमच्या पुर्वजांचा पराभव झाला होता" वगैरे न्यूनगंड जोपासने हे सुद्धा  चुकीचे आहे. देव -असूर युद्धे ही काल्पनिक भासली तरी ती एका सांस्कृतिक संघर्षाची प्रतीकरुपे आहेत. वैदिक-देव संस्कृती व अवैदिक-असूर संस्कृतीतील युद्धे फक्त रणात लढली गेली नाहीत तर साहित्यातुनही कशी लढली गेली याचे प्रत्यंतर येते... युद्धात जय कोणाचाही होवो, लेखणीत जो जिंकतो तोच कसा जिंकतो हेही दिसून येते... पण प्रत्यक्षात कोण अजिंक्य ठरले हे आपण आज जी 'बळीसंस्कृती' जपतो त्यावरुनही समजून येतेच !

सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा आणि 'बळीचे राज्य पुन्हा येओ'  हि सदिच्छा!

राकेश पाटील, खार्डी.

Thursday, 25 February 2016

मराठेशाही, राज्याभिषेक आणि कट-कारस्थाने

संभाजी राजांच्या हत्येतील वैदिक -अवैदिक किंवा वैदिक-शाक्त हा संदर्भ संजय क्षीरसागर ह्यांनी उलगडून दाखविला आहे. त्यावर प्रतिक्रिया:

शून्यातून स्वराज्य :

शिवचरित्र म्हणजे स्वराज्यनिर्मितीसाठी प्राणपणाने लढलेले अठरापगड जातीचे मराठे आणि त्यांचे नेतृत्व करणारा एक युगपुरुष राजा अशी अलौकिक रचना आहे. बाजीप्रभू(१६६०) मुरारबाजी(१६६३)तानाजी(१६७०) प्रतापराव(१६७४) असे एकाहूनएक सरस जानकुर्बान मराठे स्वराज्याच्या कार्यसिद्धीसाठी अखंड संघर्षरत दिसतात. स्वत: शिवराय अफझल(१६५९), शाईस्ता(१६६५), आग्रा(१६६६) सारख्या नाट्यमय प्रकरणात आघाडीवर संघर्षात आहेत. ह्या लष्करी व्यवस्थेपलीकडे राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, महसुल-करव्यवस्था आदि दैनंदिन कारभारात फड-कारकुनी सांभाळणारे अंमलदार वगैरे देखील स्वराज्य-समर्पित आणि म्हणून रयतेचे राज्य अशी लोकप्रियता. ह्या सुवर्णकाळाचा साधारणत: शिवराज्याभिषेक हा महत्वाचा म्हणजे शेवटचा टप्पा असल्याचे दिसते. नेताजी पालकरांचे बंड हा एक अपवाद परंतु त्याचे पैलूही इतरत्र संबधित आहेत.

कटकारस्थानांचा काळ :

राज्याभिषेकाला झालेला विरोध. वैदिकांनी शुद्र म्हणून शिवरायांना केलेला विरोध सर्वश्रुत आहे. त्यातून काशीचे गागाभट्ट किंवा क्षत्रियकुलावतंस म्हणून राजस्थानहून आणलेली वंशावळ आणि तरीही निश्चलपुरी गोसावींनी केलेला शाक्त अभिषेक....(१६७४)
नंतर महाराज दक्षिण दिग्विजयात १६७६ ते १६७८ पर्यंत असताना रायगडावर संभाजीराजे आणि महाराणी सोयराबाई व अष्टप्रधान ह्यांच्यातील बेबनाव सुस्पष्ट आहे. महाराजांनी संभाजीराजे शृंगारपुर इथे प्रभानवल्लीच्या सुभ्यावर नेमणूक करून तिढा सोडविण्याचा(?) प्रयत्न केला. त्या परिस्थितीत युवराज संभाजीराजे बंड करून दिलेरखानाला जाऊन मिळाले. हे आणखी एक कृष्णकारस्थान.
ह्याआधी शिवाजी राजांवर एकदा विषप्रयोग झाल्याचा उल्लेख सापडतो. त्याचा आळ युवराजांवर आलेला... त्याआधी अण्णाजी दत्तो ह्यांच्या नात्यातील एका स्त्रीच्या चरित्राचा आळ... कारस्थानांची मालिकाच. 'दोषी कोण? कट कुणाचा? लक्ष्य कोण?' हे मुद्दे काहीही असले तरी कटकारस्थानांना प्रचंड वेग आल्याचे इथे स्पष्ट होते. ह्या आप्तस्वकीयांच्या कटांची मालिका इतकी गंभीर कि प्रत्यक्ष स्वराज्याची वाटणी करून संभाजीराजांना जिंजीचे स्वतंत्र राज्य देऊ पाहणारे हतबल महाराज!...
महाराज १६८० मध्ये ऐन पन्नाशीत निवर्तले आणि त्यांच्या देहाला भडाग्नी देण्याचे कारस्थान झाले. इथेही महाराजांवर विषप्रयोग झाल्याचे उल्लेख सापडतात. संभाजीराजांचा अभिषिक्त अधिकार डावलून परस्पर राजारामाला मंचकारोहण करण्यात आले. अण्णाजी दत्तो मोरोपंत पिंगळे आदि अष्टप्रधान मंत्री संभाजीराजांवर पन्हाळ्यावर चालून गेले.

महान सरनौबत हंबीरराव मोहिते: खणखणीत राजनिष्ठेचा एकमेवाद्वितीय खंदा पाईक

केवळ सरलष्कर हंबीरराव मोहिते ह्यांच्या सच्च्या राजनिष्ठ भूमिकेमुळे हे कारस्थान उधळले गेले आणि अण्णाजी-मोरोपंत वगैरे स्वत:च कैदेत पडले. सरसेनापती हंबीरराव ठामपणे युवराज संभाजीराजे ह्यांच्या पाठीशी उभे राहिले. रक्ताची बहिण-भाचा आणि त्यांना सामील मंत्रीगण ह्यांच्या अभद्र युतीत सामील न होता, अडचणीत असलेल्या परंतु स्वराज्याचा निर्विवाद वारस असलेल्या शंभूराजांना स्पष्ट पाठींबा देऊन त्यांच्या विरोधकांना धडा शिकविणारा हा महान सरनौबत. त्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत औरंगजेबाशी झुंजीत संभाजी महाराजांना वरचढ ठेवणारा हा रणधुरंदर सेनानी.
ह्या काळात संभाजी राजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न झाला. नंतर संभाजीराजांचा आश्रित शहजादा अकबर ह्याच्या मार्फत सत्तांतराचा प्रयत्न झाला. ह्यावेळी संभाजीराजांनी सर्व कारस्थानी बंडखोरांना देहान्ताच्या शिक्षा दिल्या. स्वत: सोयराबाई कटात सामील असल्याने मृत्युमुखी पडल्या. ह्या धामधुमीच्या काळात संभाजीराजांची लष्करी बाजू मात्र औरंगजेबाला सर्व सामर्थ्याने सडेतोड जबाब देत होती. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे सरनौबत हंबीरराव मोहित्यांचा शर्थीचा पराक्रम आणि अनन्यसाधारण राजनिष्ठा. पूर्वार्धात ह्या कटाच्या घटना घडल्या तरी नंतर ५-६ वर्षे संभाजीराजे आणि हंबीरराव मोहिते ह्यांनी मराठेशाहीला स्थिरस्थावर केल्याचे दिसते. मराठ्यांना असा विजीगिषु सरलष्कर पुन्हा क्वचितच मिळाला. हंबीरराव धारातीर्थी पडले(१६८७) आणि तिथेच संभाजीराजांची विजयपताकाही भेलकांडू लागल्याचे दिसते.

पुन्हा कट-कारस्थाने-फितूरी:

प्रल्हाद निराजी आणि इतर कारकून मंडळीनी पुन्हा उचल खाल्ली आणि संभाजी राजांच्या जागी राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा कट उघड झाला. ह्याच काळात गणोजी शिर्के आणि इतर मराठे सरदार वतनदार औरंगजेबाच्या कच्छपि लागून स्वराज्याशी बंडखोरी करू लागले. औरंगजेब आदिलशाही-कुतुबशाही गिळंकृत करून सर्व शक्तीने शंभूराजांवर तुटून पडला. फितुरी, कट-कारस्थाने चरमसिमेवर पोहोचली आणि १८९ मध्ये संभाजीराजे आणि छन्दोगामात्य कविकलश संगमेश्वरी मुकर्रबखानाच्या कैदेत सापडले. तिथे रायगडावर संभाजी महाराजांना सोडविण्याचे कोणतेही गंभीर प्रयत्न न होता आणि संभाजीराजांना असहाय्य अगतिक मृत्युच्या तोंडी देऊन राजाराम महाराजांना गादीवर बसविण्यात धन्यता मानली गेली.

ह्यानंतर मराठ्यांचा इतिहास हा शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेपासून दूर दूर जात मोगलाई कट कारस्थानाच्या बंडखोरीच्या मालिकांचा इतिहास बनून गेलेला दिसतो. ह्याची सुरुवात मात्र स्वत: शिवाजीराजांच्या समक्ष राज्याभिषेकापासूनच झाल्याचे दिसते... कि राज्याभिषेक आणि त्यातील वैदिक-अवैदिक वादाची बीजेच ह्याला कारणीभूत आहेत, ह्यावर विचारविमर्श व्हायला हवा. एखादे अलौकिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी कित्येकांनी जीवाची बाजी लावावी, परंतु स्वप्नपूर्ती झाल्यावर मात्र त्यांनीच एकमेकाच्या जीवावर उठावे, हा मनुष्यधर्मच असावा कदाचित!

Friday, 12 February 2016

'A Lamb Lionised' ह्या निरंजन टकले लिखित लेखावरील अश्लाध्य टीकेचा प्रतिवाद

('A Lamb Lionised' हा निरंजन टकले लिखित लेख 'The Week' मध्ये प्रकाशित झाला आणि सावरकरभक्तांमध्ये निरर्थक खळबळ माजली. त्यातल्याच एका अंधसावरकरभक्ताने फेसबुक-ब्लॉगवरून शिवराळ टीकेचा अश्लाध्य गदारोळ उठवला... )
"बालिश बहु बायकांत बडबडला" असं मोरोपंतांनी बाळराजे उत्तराबद्दल आर्यावृत्तात महाभारतात लिहिलंय. त्यातला बालिश उत्तरबाळ सांप्रत फेसबुकवर बडबडला आहे. तर काय म्हणतात हे संशोधकबाळ ते थोडक्यात पाहू. थोडक्यात ह्यासाठी कि मोठेच्यामोठे ब्लॉग वॉलवर चिकटवायचे आणि रात्रीबेरात्री चारचार वाजेपर्यंत 'संशोधन' करून पुन्हा पुन्हा टाकत राहायचे , तेवढा रिकामचोट वेळ आपल्याला नाही बुवा.
मुद्दा क्र. १ : """निरंजन समर्थक फ़ुरोगाम्यांनि समजून घ्यावे कि कपूर आयोगासमोर अप्पा कासार आणि दामलेंचि साक्ष झालीच नव्हती. अजिबात नाही . हि शुद्ध थाप आहे . कपूर आयोग जो इंटर्नेट वर उपलब्ध आहे - त्यात साक्षिदारांचि लिस्ट आहे - त्यात कासार / दामले हि नावे नाहीत ."""
ह्या बहाद्दराने कपूर आयोग किती वाचला ते सोडा, नुसता चाळला असता तरी अप्पा कासार आणि दामले ह्याबद्दल कपूर आयोग काय म्हणतो ते सुस्पष्ट झाले असते. किंवा अगदी चटकन विकीपेडियावर जाऊन पाहिलं असतं तरी हा बालिशपणा झाला नसता. फक्त इंडेक्स वाचून आणि साक्षीदारांची लिस्ट वाचून कपूर आयोगाबद्दल लिहिण्याचा भंपकपणा हे ब्लॉग्विरच करू शकतात. विकीपेदिया म्हणते " It (कपूर कमिशन) was provided with evidence not produced in the court; especially the testimony of two of Savarkar's close aides - Appa Ramachandra Kasar, his bodyguard, and Gajanan Vishnu Damle, his secretary.
स्वत: कपूर आयोग दामले आणि कासार ह्यांच्या साक्षीपुराव्याबद्दल काय म्हणतेय ते पृष्ठ क्र. २९४,३००,३१७, ३१८ इत्यादी पानांवर थोडी तसदी घेतली तर सहज पाहता येईल. ती पाने इथे जोडली आहेत.
म्हणून निरंजन टकले आपल्या लेखात लिहितात ,"Gajanan Vishnu Damle, Savarkar’s private secretary, and Appa Kasar, his bodyguard, deposed before the commission and accepted their knowledge of Savarkar’s involvement in the conspiracy to kill Gandhi. "
मुद्दा क्र. २ : """पण निरंजन टकल्यांनि तारीख बदलली - कारण त्यांना त्याच्या मालकांनी भाडोत्री निष्कर्ष काढण्यासाठी कामावर ठेवले आहे . जो आयोग सावरकर मेल्यानंतर काम सुरु करतो तो कपूर आयोग टक्ल्यांनि एक वर्ष अलिकडे खेचला आहे !!या शेळी लेखात टकले लिहितात "The report, however, came too late. Savarkar died on February 26, 1966, weeks after he stopped taking food and medicines. " लेखकाचे उद्देश इथेच स्पष्ट होतात. रिपोर्ट उशिरा आला असे त्याला म्हणायचे आहे. वस्तुत: सावरकरांना फासावर चढवायची टकल्याची संधि हुकली ती रिपोर्ट उशिरा आला म्हणून नाही . तर टकल्याने तारीख चुकवली म्हणून !""'
हा बालीशपणाचा अत्यंत मनोरंजक असा पुरावा आहे बरं. इथे अगदी शब्दाशब्दातून बालिश उत्तरबाळ कसा बायकांत बडबडला आहे त्याची कल्पना येईल. कोणतही भक्त माणूस मानसिकदृष्ट्या किती पंगु असतो आणि आपल्या अराध्यावर झालेल्या टीकेने मानसिक संतुलन बिघडून घेतो त्याचा हा उत्तम नमुना.
निरंजन टकले लिहितात... "On March 22, 1965, a commission of inquiry was set up, with former Supreme Court judge J.L. Kapur as its chairman, to investigate the conspiracy in Gandhi’s assassination."
ह्यात भडकून जाण्यासारखं काहीच नाही. कारण आयोग त्याच तारखेला गांधींहत्येच्या कटाच्या चौकशीसाठी स्थापन झाला. पाठक हे मंत्री झाल्याने पाठक आयोगाच्या जागी कपूर आले आणि त्याचे नाव तेवढे कपूर आयोग झाले. हि सामान्य कार्यपद्धत आहे. आमच्या उत्तरबाळाने साक्षीदारांची लिस्ट बघताना वेडेपिसे न होता त्यात पुरेसे लक्ष घातले असते तर त्यातच पाठक कमिशनने १९६५ साली केलेले तपासकाम सहज दिसले असते. मुळात गांधीहत्येतेले गुन्हेगार १९६४ साली सुटले आणि तेव्हा झालेल्या, सभा त्यातलि आक्षेपार्ह विधाने आणि त्यातून उसळलेला जनक्षोभ ह्या पार्श्वभूमीवर पाठक(कपूर) आयोग स्थापन झाला. त्याचा सावरकरांच्या निधनाशी बादरायण संबंध जोडण्याची बलीशबुद्धी असले भक्तगणंगच करू जाणेत. म्हणजे थापा कोण मारतंय ते अगदी सुस्पष्ट आहे.
बाकी कोलू, माफीनामे ह्याबद्दल वगैरे बऱ्याच थापा किंवा भूलथापा किंवा बालिश बडबड कितीही होऊ शकते. मूर्खपणाला मर्यादा नसते असे म्हणतात. त्यामुळे आणखी खोलात जाऊन उत्तरबाळाच्या बालिश चिखलफेकीबद्दल जास्त चिखल उडवण्यात काही मतलब नाही.
त्यापेक्षा नैमिषांरण्यातील शार्दुलविक्रिडीत बगळ्याची कथाच बरी , नाही का? (ती लवकरच येत आहे..)






 ह्यावर अर्थातच संशोधक महाशय चिडले आणि धमक्या, अपशब्द वगैरे थयथयाट वगैरे भडीमार सुरु झाला.
 त्यावर आपली प्रतिक्रिया:

 इथे दोनच मुद्दे मांडलेत, ते सोडून फालतू अर्वाच्च भाषेत वेडगळ कमेंट केल्यात संशोधक पंडितांनी त्या महाशयांना त्यावर काल बाहेर असल्याने विस्तृत लिहू शकलो नव्हतो.
कपूर आयोगासमोरील दामले-कासार ह्यांच्या साक्षीपुराव्याबद्दल ह्या महाशयाने साक्षीदारांच्या लिस्टमध्ये त्यांची नावे नाहीत असं संशोधन केल. पण कपूर आयोगाने ह्या दोघांच्या साक्षी पुरावे म्हणून स्वीकारले आहेत आणि तसे उल्लेख असलेली कपूर आयोगाची पानेच इथे पोस्ट केली. त्यावर मात्र हा भाऊ काही बोलायला तयार नाही.

कपूर आयोग आणि पाठक आयोग हे वेगवेगळे आणि म्हणून टकले ह्यांनी तारीख मुद्दाम चुकवून सावरकरांना फाशी व्हावी अशी कल्पना व्यक्त केल्याचा तर जावईशोध फारच भन्नाट लावला. हा ठार वेडाच असावा कि काय असे कायच्या काय लिहून हा मोकळा होतो. त्या साक्षीदारांच्या लिस्ट मध्ये काही साक्षीदारांच्या नावाखाली पाठक कमिशन समोर किती तारखेला साक्ष झाली त्याच्या नोंदी आहेत. ते उघड्या डोळ्यांनी पाहणारा माणूस शुद्धीवर असेल तर असली वक्तव्ये खचितच करणार नाही.

वरील दोनच मुद्दे मी मांडले आहेत , त्यावर एकही शब्द न बोलता हा सावरकरभक्त थेट आपल्या सुसंकृत भाषेत माझ्या आणि टकले ह्यांच्या पित्यांना इथे चर्चेत उद्धृत करू लागला. आता ह्याचा बाप कोण , किती ते आमच्यासारख्यांनी लिहिणे योग्य नाही. पण तरीही अशाच एका पुरोगामी सेक्युलर डावे इत्यादींच्या बापाविषयी राळ उठवणार्या एका खुळ्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
असली अर्वाच्च भुंकणारी जमात... ह्यांच्या पेकाटात वैचारिक लाथा घातल्या कि "वाचवा... धावा..." असं त्यांच्या बिचाऱ्या ब्लॉगवाचकांच्या नावाने केकाटत पळतात. आधीच समर खडस ह्यांच्या वॉलवर काही महिन्यांपूर्वी पुरोगामी, डावे ह्यांच्यावर बेमतलब शिवराळ गरळ ओकणाऱ्या वाचाळ विराला चांगलाच धडा शिकविला होता. हा त्याचाच नवा वामनावतार जो घाबरून सेनेच्या नावाने केकाटलाय. दुर्दैवाने सैनिक सध्या विवेकी झाल्यात म्हणे (नाहीतर त्यांनी आंदोलन केले असते वगैरे)
मुद्दे संपले कि ह्यांना गुद्द्यासाठी मात्र इतरांची आठवण होतेच.


 निरंजन टकले ह्यांनी त्यांच्यावर टीका करणार्यांना कोर्टात जाण्याचे खुले आव्हान दिले आहे. आपला प्रत्येक शब्द सिद्ध करण्याची जबादारी त्यांनी घेतलीय. पण वाचाळविराना ते नको , फक्त वितंडवाद घालायचं आहे. राज कुलकर्णी ह्यांच्या पोस्टवर श्री. टकले ह्यांनी सविस्तर मुद्दे मांडले आहेत. त्यावर फक्त अर्वाच्च शब्दांत पुन्हा चिखलफेक करण्या व्यतिरिक्त काहीही उत्तर नाही. लोकांची थोबडे फोडू पाहणारे वीर कोणतीही प्रतिक्रिया आजवर देण्यात असमर्थ. टकले ह्यांच्या लेखातील काही अडचणीच्या भासणाऱ्या जागा पकडून त्याच्या अनुषंगाने काहीतरी हाणामारी करीत सुटला ह्यापलीकडे काहीही निष्पन्न झालेलं नाही. होय, टकले ह्यांच्या लेखातील काही शुद्धलेखनाविषयक शब्दयोजनेच्या, वाक्यरचनेच्या वगैरे चुका संशोधक वीरांनी दाखवून दिल्यात हे त्यांचे कर्तुत्व मान्यच करायला हवे. 

ह्या सावरकरभक्तांची अडचण कशी ओळखायची तर त्यासाठी एक व्यवच्छेदक लक्षण आहे ते म्हणजे सावरकर सिद्ध करण्यासाठी हि मंडळी कधी शिवाजी महाराज , कधी नेताजी सुभाषबाबू, रासबिहारी बोस आणि सध्या बाबासाहेब आंबेडकर पर्यंत कुणाचाही आपल्या खोट्यानाट्या थियरिमधे हटकून आधार घेतातच, त्याशिवाय ते पंगु असतात जणू. हा वाचाळवीर आधारासाठी लाला लजपतराय ते भगतसिंग पर्यंत गेलाय, हे विशेष. टकले ह्यांच्या लेखावर टीका करण्याच्या वेडापायी फाळणीच्या किंवा द्विराष्ट्रवादाच्या निर्णयासाठी ह्याने लाला लजपतराय ह्यांना वेठीस धरल्याने त्यावर "मग गांधीजींना सावरकरभक्त किंवा गोड्सेवादी लोकांनी कोणत्या कारणासाठी ठार केले?" हा सवाल संजय सोनवणी ह्यांनी उपस्थित केला तर त्यावर बहाद्दराकडे आजवर कोणतेही उत्तर नाही. एकही मुद्द्यावर उत्तर नाही आणि आता म्हणे इस्लामवर काम चालू आहे. काय डोंबलं लिहिणार हा, जिथे साधे मुद्दे प्रतिवाद करता येत नाही. उगाच पळवाटा काढायच्या.

कीव तरी किती करायची? कधी मदर तेरेसावर थुंकतो, कधी साने गुरुजींवर घसरतो, कधी दत्तप्रसाद दाभोल्कारांवर चढतो. आणि म्हणे मी नास्तिक, मी दाभोलकरप्रेमी ..मी अमक्या मी ढमक्या. मी देशासाठी यांव केलं , मी संविधानप्रेमी. दुसरीकडे लोकांवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करायची, कुणाचा बाप काढायचा, कुणाचं श्राद्ध घालायचं ... उगाच नोकरी धंद्याची काळजी व्यक्त करायची...उगाच मारायची/मरायची भाषा करायची...सारे रडगाणे मल्टीपल डिसऑर्डर... हि सडकी मानसिकता एक्स्पोज करणे गरजेचे होते, म्हणून हा खटाटोप.